शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

‘म्हैसाळ’च्या पाणी वापर संस्थांसाठी न्यायालयात : अजितराव घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:51 IST

सांगली : म्हैसाळ योजने चे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढकल सुरू असून, या प्रश्नावर आता उच्च न्यायालया त याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री ...

ठळक मुद्देश्रेयासाठी पाणी लांबत असेल, तर अ‍ॅडव्हान्समध्ये नारळ फोडून घ्या

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढकल सुरू असून, या प्रश्नावर आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत दिला.

दरम्यान, पाण्याचे श्रेय घेण्यासाठीच जर पाणी लांबविले असेल, तर अ‍ॅडव्हान्समध्ये नारळ फोडून घ्या. मात्र, शेतकºयांच्या भावनेशी खेळू नका, असे आवाहनही त्यांनी केले.घोरपडे म्हणाले की, १८ हजार कोटी रूपये खर्च झालेल्या म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण झाले, तर सहा लाखांवर हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बेरोजगारीचे प्रमाण ल क्षात घेता, पाण्यामुळे युवकांना चांगला रोजगार उपलब्ध होणार असताना, केवळ योग्य नियोजन केले नसल्याने आवर्तन लांबवून शेतकºयांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले आहे.

म्हैसाळ योजना चांगल्या पध्दतीने चालू ठेवायची असल्यास पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, कारण नसताना पाणी वापर संस्था स्थापण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत आहे. या संस्थांच्या माध्यमातून शेतकºयांना सहभागी करून घेतल्यास नियोजन सोपे होणार असल्याने, आता पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत.

पाणी वापर संस्थांच्या बांधणीसाठी राजकीय डावपेचातून अधिकाºयांकडून चालढकल सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही पर्याय निर्माण करा, मात्र पाण्याचे नियोजन करा, हीच आमची भूमिका असताना, यात राजकारण आणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी फळ मार्केटचे सभापती दीपक शिंदे, भारत डुबुले, जीवन पाटील, आबासाहेब पाटील, शंकरराव गायकवाड आदी उपस्थित होते.श्रेय घ्या, पण शेतकऱ्याला पाणी द्याघोरपडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेची संपूर्ण उभारणीच आपल्यासमोर झाल्याने व म्हैसाळपासून ते जतपर्यंत समोर उभे राहून कालव्यांची कामे करून घेतल्याने, मला कोणत्याही श्रेयाची गरज नाही. केवळ पाण्याचे श्रेय  घेण्यासाठी म्हणून जर पाणी लांबविले जात असेल, तर हे चुकीचे असून शेतकºयांच्या भवितव्याशी खेळले जात आहे. पाण्याचे श्रेय कुणीही घ्यावे, मात्र या भागाला पाणी द्यावे.म्हैसाळ योजनेला केंद्र सरकारच्या योजनेतून निधी मिळत आहे ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी, योजनेच्या प्रशासनाकडून चालू असलेले नियोजन पाहता वर्षभरात योजना पूर्ण होईल, असे वाटत नाही, असेही घोरपडे म्हणाले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली