शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

म्हैसाळ योजना वसंतदादा कारखाना चालविणार

By admin | Updated: June 2, 2016 01:14 IST

जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव : सुरुवातीला कळंबीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंतच्या योजनेसाठी आग्रही

 सांगली : शासनाकडून ज्यापद्धतीने धडक योजना ताब्यात घेऊन यशस्वीपणे कारखान्याने चालविल्या, त्याचपद्धतीने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हैसाळ योजना चालविण्यासाठी उत्सुक आहे. सुरुवातीला दुसऱ्या टप्प्यापर्यंतची म्हैसाळ योजना चालविण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती बुधवारी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेचा जेवढा वार्षिक खर्च आहे, तो आम्ही करण्यास तयार आहे. जेवढ्या योजनेची जबाबदारी कारखाना घेईल, तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून वसुली होईल. अन्य पिके व बागा असणाऱ्यांकडूनही वसुलीसाठी प्रयत्न केले जातील. ही योजना कारखान्यामार्फत चालविली गेली, तर योजनेच्या परिसरात किमान आठ हजार हेक्टर क्षेत्रात उसाचे जादा उत्पादन होऊ शकते. त्यामुळे कारखान्याला जादा ऊस मिळेल, शिवाय तो अन्य कारखान्यांसाठीही उपलब्ध होईल. त्यामुळे कारखान्याला हा फायदा होईल आणि योजनेच्या बिलाचे त्रांगडेही दूर होणार आहे. ही योजना बारमाही सुरू राहू शकते. सुरुवातीला दोन टप्प्यांपुरती आमची तयारी आहे. त्यानंतर पुढील सर्व टप्प्यांची जबाबदारी स्वीकारून कारखाना संपूर्ण योजनाच चालविण्यास घेऊ शकते. दुसऱ्या टप्प्यापर्यंतचे वीजबिल स्वतंत्र करावे, अशा मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला आहे. कारखान्यामार्फत ही योजना यशस्वीपणे चालविली जाऊ शकते. यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात जे शेतकरी वसंतदादा कारखान्यास ऊस घालतील, त्यांच्या योजनेचे संपूर्ण बिल कारखाना भरेल. वसंतदादा कारखाना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही या योजनेच्या माध्यमातून बदल घडवू. टेंभू योजनेचा काही भागही चालविण्यासाठी कारखाना तयार आहे. शासन निर्णयावर सर्व अवलंबून आहे. (प्रतिनिधी) शंभर वसंत बंधारे : उपक्रम राबविणार यंदा वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात शंभर वसंत बंधारे उभारण्यासाठी वसंतदादा कारखाना पुढाकार घेणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्या फंडातून काही कामे करावी लागतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न चालू झाले आहेत. कारखाना या उपक्रमासाठी पुढाकार घेणार आहे. समाजातील अन्य घटकांची मदत यासाठी घेतली जाणार आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली. असे आहे आर्थिक गणित कारखान्याच्या जवळच्या भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून उसाची मोठी उपलब्धता झाली, तर बाहेरील जिल्ह्यातील प्रतिटन दोन हजार रुपये अतिरिक्त खर्च करून ऊस आणण्याची वेळ येणार नाही. यातून कारखान्याचे सुमारे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. दुसरीकडे सध्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च योजना चालविण्यासाठी येणार आहे. शेतकऱ्यांवर बंधन नाही योजना चालविताना ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, पीक कोणते घ्यावे, याबाबतचे कोणतेही बंधन नसेल, मात्र वसंतदादा कारखान्याला ऊस दिल्यास त्याचा आर्थिक फायदा त्यांना होणार आहे. याशिवाय आगाऊ पैसे भरावे लागणार नाहीत.