शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

म्हैसाळ योजना वसंतदादा कारखाना चालविणार

By admin | Updated: June 2, 2016 01:14 IST

जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव : सुरुवातीला कळंबीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंतच्या योजनेसाठी आग्रही

 सांगली : शासनाकडून ज्यापद्धतीने धडक योजना ताब्यात घेऊन यशस्वीपणे कारखान्याने चालविल्या, त्याचपद्धतीने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हैसाळ योजना चालविण्यासाठी उत्सुक आहे. सुरुवातीला दुसऱ्या टप्प्यापर्यंतची म्हैसाळ योजना चालविण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती बुधवारी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेचा जेवढा वार्षिक खर्च आहे, तो आम्ही करण्यास तयार आहे. जेवढ्या योजनेची जबाबदारी कारखाना घेईल, तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून वसुली होईल. अन्य पिके व बागा असणाऱ्यांकडूनही वसुलीसाठी प्रयत्न केले जातील. ही योजना कारखान्यामार्फत चालविली गेली, तर योजनेच्या परिसरात किमान आठ हजार हेक्टर क्षेत्रात उसाचे जादा उत्पादन होऊ शकते. त्यामुळे कारखान्याला जादा ऊस मिळेल, शिवाय तो अन्य कारखान्यांसाठीही उपलब्ध होईल. त्यामुळे कारखान्याला हा फायदा होईल आणि योजनेच्या बिलाचे त्रांगडेही दूर होणार आहे. ही योजना बारमाही सुरू राहू शकते. सुरुवातीला दोन टप्प्यांपुरती आमची तयारी आहे. त्यानंतर पुढील सर्व टप्प्यांची जबाबदारी स्वीकारून कारखाना संपूर्ण योजनाच चालविण्यास घेऊ शकते. दुसऱ्या टप्प्यापर्यंतचे वीजबिल स्वतंत्र करावे, अशा मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला आहे. कारखान्यामार्फत ही योजना यशस्वीपणे चालविली जाऊ शकते. यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात जे शेतकरी वसंतदादा कारखान्यास ऊस घालतील, त्यांच्या योजनेचे संपूर्ण बिल कारखाना भरेल. वसंतदादा कारखाना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही या योजनेच्या माध्यमातून बदल घडवू. टेंभू योजनेचा काही भागही चालविण्यासाठी कारखाना तयार आहे. शासन निर्णयावर सर्व अवलंबून आहे. (प्रतिनिधी) शंभर वसंत बंधारे : उपक्रम राबविणार यंदा वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात शंभर वसंत बंधारे उभारण्यासाठी वसंतदादा कारखाना पुढाकार घेणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्या फंडातून काही कामे करावी लागतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न चालू झाले आहेत. कारखाना या उपक्रमासाठी पुढाकार घेणार आहे. समाजातील अन्य घटकांची मदत यासाठी घेतली जाणार आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली. असे आहे आर्थिक गणित कारखान्याच्या जवळच्या भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून उसाची मोठी उपलब्धता झाली, तर बाहेरील जिल्ह्यातील प्रतिटन दोन हजार रुपये अतिरिक्त खर्च करून ऊस आणण्याची वेळ येणार नाही. यातून कारखान्याचे सुमारे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. दुसरीकडे सध्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च योजना चालविण्यासाठी येणार आहे. शेतकऱ्यांवर बंधन नाही योजना चालविताना ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, पीक कोणते घ्यावे, याबाबतचे कोणतेही बंधन नसेल, मात्र वसंतदादा कारखान्याला ऊस दिल्यास त्याचा आर्थिक फायदा त्यांना होणार आहे. याशिवाय आगाऊ पैसे भरावे लागणार नाहीत.