शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजना मार्चपासून सुरू :दुरुस्ती पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:05 IST

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.

ठळक मुद्देजत, कवठेमहांकाळ तालुक्यातून पाण्याची मागणी

मिरज : पाण्याला मागणी नसल्याने यावर्षी जुलैपासून तब्बल आठ महिने बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना मार्चपासून सुरू होणार आहे. योजनेच्या आरग, सलगरे, बेडग व कवठेमहांकाळ परिसरात कालव्याची गळती काढण्याचे व अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यासाठी जत व कवठेमहाकांळ तालुक्यातून पाण्याची मागणी होत आहे.

गतवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू असताना, योजनेच्या सहा टप्प्यातील तब्बल ९५ पंप सुरू करून जतपर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर एप्रिलपासून ७ जुलैपर्यंत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व शेतीसाठी १५४ दिवसांत सुमारे ७ टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला. जुलै महिन्यात आवर्तन बंद झाल्यानंतर आॅक्टोबरपर्यंत चांगल्या पावसाने तीनही तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाली.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे लागते, मात्र यावर्षी फेब्रुवारीपर्यंत तीनही तालुक्यातून पाण्याची मागणी नसल्याने योजना सुरू करण्यासाठी गावो-गावी शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. योजना आठ महिने बंद असल्याने आरग, बेडग व सलगरे मुख्य कालव्याची गळती काढण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात आली. १ मार्चपासून योजना सुरू करण्याच्या हलचाली सुरू असून, त्यासाठी आरग, बेडग कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. कालव्यांचे अस्तरीकरण व व्हॉल चेंबर्स बसविण्यात आल्याने पाण्याची गळती कमी होणार असल्याचे म्हैसाळच्या अधिका-यांनी सांगितले.

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.मागणी नसल्याने आवर्तन रखडलेम्हैसाळ योजनेच्या गतवर्षीच्या आवर्तनाचे थकीत विजबिल सुमारे ३२ कोटी रुपये व पाणी बिलाची थकबाकी सुमारे ३० कोटी रुपये आहे. ६० कोटी रुपये थकबाकी असल्याने यावर्षी आवर्तन सुरू करण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून वसुली करावी लागणार आहे. मात्र योजनेचा विद्युतपुरवठा खंडीत नसल्याने १ मार्चपासून सुरू झालेले आवर्तन पावसाळा सुरू होईपर्यंत चालणार आहे. टेंभू व ताकारी योजना महिन्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. मात्र पाण्यासाठी शेतकºयांची मागणी नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले होते.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली