शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

म्हैसाळ योजना मार्चपासून सुरू :दुरुस्ती पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:05 IST

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.

ठळक मुद्देजत, कवठेमहांकाळ तालुक्यातून पाण्याची मागणी

मिरज : पाण्याला मागणी नसल्याने यावर्षी जुलैपासून तब्बल आठ महिने बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना मार्चपासून सुरू होणार आहे. योजनेच्या आरग, सलगरे, बेडग व कवठेमहांकाळ परिसरात कालव्याची गळती काढण्याचे व अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यासाठी जत व कवठेमहाकांळ तालुक्यातून पाण्याची मागणी होत आहे.

गतवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू असताना, योजनेच्या सहा टप्प्यातील तब्बल ९५ पंप सुरू करून जतपर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर एप्रिलपासून ७ जुलैपर्यंत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व शेतीसाठी १५४ दिवसांत सुमारे ७ टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला. जुलै महिन्यात आवर्तन बंद झाल्यानंतर आॅक्टोबरपर्यंत चांगल्या पावसाने तीनही तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाली.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे लागते, मात्र यावर्षी फेब्रुवारीपर्यंत तीनही तालुक्यातून पाण्याची मागणी नसल्याने योजना सुरू करण्यासाठी गावो-गावी शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. योजना आठ महिने बंद असल्याने आरग, बेडग व सलगरे मुख्य कालव्याची गळती काढण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात आली. १ मार्चपासून योजना सुरू करण्याच्या हलचाली सुरू असून, त्यासाठी आरग, बेडग कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. कालव्यांचे अस्तरीकरण व व्हॉल चेंबर्स बसविण्यात आल्याने पाण्याची गळती कमी होणार असल्याचे म्हैसाळच्या अधिका-यांनी सांगितले.

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.मागणी नसल्याने आवर्तन रखडलेम्हैसाळ योजनेच्या गतवर्षीच्या आवर्तनाचे थकीत विजबिल सुमारे ३२ कोटी रुपये व पाणी बिलाची थकबाकी सुमारे ३० कोटी रुपये आहे. ६० कोटी रुपये थकबाकी असल्याने यावर्षी आवर्तन सुरू करण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून वसुली करावी लागणार आहे. मात्र योजनेचा विद्युतपुरवठा खंडीत नसल्याने १ मार्चपासून सुरू झालेले आवर्तन पावसाळा सुरू होईपर्यंत चालणार आहे. टेंभू व ताकारी योजना महिन्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. मात्र पाण्यासाठी शेतकºयांची मागणी नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले होते.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली