शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजना मार्चपासून सुरू :दुरुस्ती पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:05 IST

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.

ठळक मुद्देजत, कवठेमहांकाळ तालुक्यातून पाण्याची मागणी

मिरज : पाण्याला मागणी नसल्याने यावर्षी जुलैपासून तब्बल आठ महिने बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना मार्चपासून सुरू होणार आहे. योजनेच्या आरग, सलगरे, बेडग व कवठेमहांकाळ परिसरात कालव्याची गळती काढण्याचे व अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यासाठी जत व कवठेमहाकांळ तालुक्यातून पाण्याची मागणी होत आहे.

गतवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू असताना, योजनेच्या सहा टप्प्यातील तब्बल ९५ पंप सुरू करून जतपर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर एप्रिलपासून ७ जुलैपर्यंत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व शेतीसाठी १५४ दिवसांत सुमारे ७ टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला. जुलै महिन्यात आवर्तन बंद झाल्यानंतर आॅक्टोबरपर्यंत चांगल्या पावसाने तीनही तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाली.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे लागते, मात्र यावर्षी फेब्रुवारीपर्यंत तीनही तालुक्यातून पाण्याची मागणी नसल्याने योजना सुरू करण्यासाठी गावो-गावी शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. योजना आठ महिने बंद असल्याने आरग, बेडग व सलगरे मुख्य कालव्याची गळती काढण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात आली. १ मार्चपासून योजना सुरू करण्याच्या हलचाली सुरू असून, त्यासाठी आरग, बेडग कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. कालव्यांचे अस्तरीकरण व व्हॉल चेंबर्स बसविण्यात आल्याने पाण्याची गळती कमी होणार असल्याचे म्हैसाळच्या अधिका-यांनी सांगितले.

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.मागणी नसल्याने आवर्तन रखडलेम्हैसाळ योजनेच्या गतवर्षीच्या आवर्तनाचे थकीत विजबिल सुमारे ३२ कोटी रुपये व पाणी बिलाची थकबाकी सुमारे ३० कोटी रुपये आहे. ६० कोटी रुपये थकबाकी असल्याने यावर्षी आवर्तन सुरू करण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून वसुली करावी लागणार आहे. मात्र योजनेचा विद्युतपुरवठा खंडीत नसल्याने १ मार्चपासून सुरू झालेले आवर्तन पावसाळा सुरू होईपर्यंत चालणार आहे. टेंभू व ताकारी योजना महिन्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. मात्र पाण्यासाठी शेतकºयांची मागणी नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले होते.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली