शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ उपसा सिंचन योजना अनिश्चिततेच्या गर्तेत

By admin | Updated: February 9, 2016 00:15 IST

पाणीपट्टीबाबत विचार करण्याची गरज : मिरज तालुक्यात राजकीय समन्वयाचा अभाव

अमोल शिंदे -- एरंडोली --म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही याला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. म्हणून पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकरी टाळाटाळ का करतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. दुष्काळाचा कलंक किमान मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्यावरून पुसण्यातील म्हैसाळ योजनेचे योगदान कोणीही नाकारणार नाही. वसंतदादा पाटील व विठ्ठल दाजी पाटील यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात साकारत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी आणला. तासगाव, कवठेमहांकाळ मतदार संघाच्या रचनेनंतर आर. आर. आबा यांनी म्हैसाळ योजनेतून नियमित पाणी सोडण्याबाबत दक्षता घेतली. जिल्ह्याच्या राजकारणात गेली २५ वर्षे महत्त्वाचा भाग असणारी ही योजना, आजही अनिश्चिततेत अडकली आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप या सत्ताधारी नेत्यांवर आता ही योजना नियमित चालविण्याची जबाबदारी आली आहे. पण नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. म्हैसाळ योजनेच्या पुढील कामासाठी ३२ कोटी मंजूर झाले. पण हजारो कोटी खर्चून निर्माण झालेली ही योजना, पाणीपट्टी भरली नाही म्हणून बंद आहे. सध्या ऐन थंडीतच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे, तर येणारा उन्हाळा किती भीषण असेल, याच चिंतेत शेतकरी आहेत. पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी नाही, या भाजप सरकारच्या भूमिकेने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. संकाटात असलेला शेतकरी व पशुधन वाचविणे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. मोठ्या उद्योगांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हजारो कोटींचे पॅकेज सरकार देते, पण शेतकऱ्यांना मात्र मदत देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे सक्तीने वसूल करत आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा म्हणणारे, आज सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्याची भाषा करत आहेत. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना हे आपले सरकार वाटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांकडून पाठपुरावाच नाहीपाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्यावरून नेहमीच आग्रह धरला जातो. पाणी एकदा आले की परत याचा पाठपुरावा ‘पाटबंधारे’च्या कृतिशील कर्मचाऱ्यांकडून होत नाही, असा शेतकऱ्यांना असलेला पूर्वानुभव हाच पाणीपट्टी वसुलीतील सर्वोच्च अडसर ठरतोय.प्रत्येक गावात म्हैसाळ योजनेचे पाणी पेटत असून, पाणी तर येणारच, पण जितका वेळ त्याला होणार आहे, तितके अधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. पाण्यासाठी आंदोलनात पुरोगामी संघटना, कर्नल सुधीर सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख हे नेते पुढे येत असताना, आमदार सुमनताई पाटील यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मौन का? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.पोटकालव्यांची रखडलेली कामे‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांची ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका पाणी आल्यानंतर त्याच्या वाटपाचे विस्कळीत नियोजन, आवर्तनाची अनिश्चिततापाण्याची कालव्यांतून होणारी भरमसाट गळतीपाणीपट्टी भरण्याविषयीची नकारात्मक मानसिकता