शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ उपसा सिंचन योजना अनिश्चिततेच्या गर्तेत

By admin | Updated: February 9, 2016 00:15 IST

पाणीपट्टीबाबत विचार करण्याची गरज : मिरज तालुक्यात राजकीय समन्वयाचा अभाव

अमोल शिंदे -- एरंडोली --म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही याला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. म्हणून पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकरी टाळाटाळ का करतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. दुष्काळाचा कलंक किमान मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्यावरून पुसण्यातील म्हैसाळ योजनेचे योगदान कोणीही नाकारणार नाही. वसंतदादा पाटील व विठ्ठल दाजी पाटील यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात साकारत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी आणला. तासगाव, कवठेमहांकाळ मतदार संघाच्या रचनेनंतर आर. आर. आबा यांनी म्हैसाळ योजनेतून नियमित पाणी सोडण्याबाबत दक्षता घेतली. जिल्ह्याच्या राजकारणात गेली २५ वर्षे महत्त्वाचा भाग असणारी ही योजना, आजही अनिश्चिततेत अडकली आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप या सत्ताधारी नेत्यांवर आता ही योजना नियमित चालविण्याची जबाबदारी आली आहे. पण नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. म्हैसाळ योजनेच्या पुढील कामासाठी ३२ कोटी मंजूर झाले. पण हजारो कोटी खर्चून निर्माण झालेली ही योजना, पाणीपट्टी भरली नाही म्हणून बंद आहे. सध्या ऐन थंडीतच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे, तर येणारा उन्हाळा किती भीषण असेल, याच चिंतेत शेतकरी आहेत. पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी नाही, या भाजप सरकारच्या भूमिकेने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. संकाटात असलेला शेतकरी व पशुधन वाचविणे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. मोठ्या उद्योगांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हजारो कोटींचे पॅकेज सरकार देते, पण शेतकऱ्यांना मात्र मदत देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे सक्तीने वसूल करत आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा म्हणणारे, आज सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्याची भाषा करत आहेत. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना हे आपले सरकार वाटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांकडून पाठपुरावाच नाहीपाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्यावरून नेहमीच आग्रह धरला जातो. पाणी एकदा आले की परत याचा पाठपुरावा ‘पाटबंधारे’च्या कृतिशील कर्मचाऱ्यांकडून होत नाही, असा शेतकऱ्यांना असलेला पूर्वानुभव हाच पाणीपट्टी वसुलीतील सर्वोच्च अडसर ठरतोय.प्रत्येक गावात म्हैसाळ योजनेचे पाणी पेटत असून, पाणी तर येणारच, पण जितका वेळ त्याला होणार आहे, तितके अधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. पाण्यासाठी आंदोलनात पुरोगामी संघटना, कर्नल सुधीर सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख हे नेते पुढे येत असताना, आमदार सुमनताई पाटील यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मौन का? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.पोटकालव्यांची रखडलेली कामे‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांची ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका पाणी आल्यानंतर त्याच्या वाटपाचे विस्कळीत नियोजन, आवर्तनाची अनिश्चिततापाण्याची कालव्यांतून होणारी भरमसाट गळतीपाणीपट्टी भरण्याविषयीची नकारात्मक मानसिकता