शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

म्हैसाळ उपसा सिंचन योजना अनिश्चिततेच्या गर्तेत

By admin | Updated: February 9, 2016 00:15 IST

पाणीपट्टीबाबत विचार करण्याची गरज : मिरज तालुक्यात राजकीय समन्वयाचा अभाव

अमोल शिंदे -- एरंडोली --म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही याला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. म्हणून पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकरी टाळाटाळ का करतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. दुष्काळाचा कलंक किमान मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्यावरून पुसण्यातील म्हैसाळ योजनेचे योगदान कोणीही नाकारणार नाही. वसंतदादा पाटील व विठ्ठल दाजी पाटील यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात साकारत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी आणला. तासगाव, कवठेमहांकाळ मतदार संघाच्या रचनेनंतर आर. आर. आबा यांनी म्हैसाळ योजनेतून नियमित पाणी सोडण्याबाबत दक्षता घेतली. जिल्ह्याच्या राजकारणात गेली २५ वर्षे महत्त्वाचा भाग असणारी ही योजना, आजही अनिश्चिततेत अडकली आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप या सत्ताधारी नेत्यांवर आता ही योजना नियमित चालविण्याची जबाबदारी आली आहे. पण नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. म्हैसाळ योजनेच्या पुढील कामासाठी ३२ कोटी मंजूर झाले. पण हजारो कोटी खर्चून निर्माण झालेली ही योजना, पाणीपट्टी भरली नाही म्हणून बंद आहे. सध्या ऐन थंडीतच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे, तर येणारा उन्हाळा किती भीषण असेल, याच चिंतेत शेतकरी आहेत. पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी नाही, या भाजप सरकारच्या भूमिकेने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. संकाटात असलेला शेतकरी व पशुधन वाचविणे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. मोठ्या उद्योगांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हजारो कोटींचे पॅकेज सरकार देते, पण शेतकऱ्यांना मात्र मदत देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे सक्तीने वसूल करत आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा म्हणणारे, आज सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्याची भाषा करत आहेत. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना हे आपले सरकार वाटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांकडून पाठपुरावाच नाहीपाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्यावरून नेहमीच आग्रह धरला जातो. पाणी एकदा आले की परत याचा पाठपुरावा ‘पाटबंधारे’च्या कृतिशील कर्मचाऱ्यांकडून होत नाही, असा शेतकऱ्यांना असलेला पूर्वानुभव हाच पाणीपट्टी वसुलीतील सर्वोच्च अडसर ठरतोय.प्रत्येक गावात म्हैसाळ योजनेचे पाणी पेटत असून, पाणी तर येणारच, पण जितका वेळ त्याला होणार आहे, तितके अधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. पाण्यासाठी आंदोलनात पुरोगामी संघटना, कर्नल सुधीर सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख हे नेते पुढे येत असताना, आमदार सुमनताई पाटील यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मौन का? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.पोटकालव्यांची रखडलेली कामे‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांची ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका पाणी आल्यानंतर त्याच्या वाटपाचे विस्कळीत नियोजन, आवर्तनाची अनिश्चिततापाण्याची कालव्यांतून होणारी भरमसाट गळतीपाणीपट्टी भरण्याविषयीची नकारात्मक मानसिकता