शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

चित्रपटांत नकारात्मकता मांडण्याची पध्दत भीषण : सचिन खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:54 IST

चित्रपट निर्मितीसाठी अनेक सुंदर आणि लोकांवर चांगला परिणाम करणारे विषय आहेत. तरीही मुंबई गॅँगवॉर, मन्या सुर्वे आणि इतर नको त्या विषयांवर अधिक प्रभावीपणे चित्रपट बनविले जात आहेत.

ठळक मुद्देसंस्कार भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत कार्यक्रम; सचिन कानिटकरांनी रंगविला गप्पांचा फड

सांगली : चित्रपट निर्मितीसाठी अनेक सुंदर आणि लोकांवर चांगला परिणाम करणारे विषय आहेत. तरीही मुंबई गॅँगवॉर, मन्या सुर्वे आणि इतर नको त्या विषयांवर अधिक प्रभावीपणे चित्रपट बनविले जात आहेत. नकारात्मक गोष्टी अत्यंत चकचकीतपणे जोरात बिंबविण्याची ही पध्दत भीषण असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी शनिवारी सांगलीत बोलताना व्यक्त केले.

संस्कार भारती, शाखा सांगलीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण व खेडेकर यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. सचिन कानिटकर यांनी अनेक खुमासदार प्रश्न विचारून मुलाखतीची रंगत वाढविली.

खेडेकर म्हणाले की, धंदेवाईक गणिते मांडून हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. अनेक नितांत सुंदर विषय असतानाही अलीकडे नकारात्मक गोष्टींवरीलच अधिक चित्रपट येत आहेत. खलनायकाची भूमिका करताना एकवेळ अभिनयाचा कस लागतो मात्र, अशा भूमिका व्दिधा मनस्थितीत टाकतात. आताचा ओढा पाहिला तर अशा माणसांना अधिक प्रसिध्द बनविण्याचाच प्रयत्न चालू आहे. सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली वाईट गोष्ट सर्वमान्य करण्याचा हा प्रयत्न आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊनही अभिनय क्षेत्रात उतरण्यासाठी घरचा पाठिंबा महत्त्वाचा होता. मनोरंजनातून सांगितलेली कोणतीही गोष्ट अधिक टिकते त्यामुळे अभिनय करत असताना त्याचा माणसांवर परिणाम व्हावा, त्यांच्यात बदल व्हावा, ही अपेक्षा असते. कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसल्याने डॉ. श्रीराम लागूंसारखे, पंकज कपूर आणि अमिताभ बच्चनसारखे काम करावे, ही इच्छा होती. या कलाकारांनी आपल्यातील बाळ जिवंत ठेवल्यानेच असा नैसर्गिक अभिनय करता येतो. कलाकाराला आपल्यातील दुय्यमत्व मानता आले पाहिजे.

आपण म्हणजे स्वयंभू ही वृत्ती चुकीची असून, नट स्वत: काही घडवत नसून, अभिनय फुलण्यासाठी दमदार लेखन कारणीभूत ठरत असते. आपल्यात ‘रोलमॉडेल’ कमी असल्याने कलाकार अभिनयापेक्षा बाहेरचे काय बोलतात, याकडे सर्वांचे जास्त लक्ष असल्याचेही ते म्हणाले. यावेळी इंदिराबाई खाडिलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरूवर्य मटंगेबुवा पुरस्काराने गायक अमोल पटवर्धन, तर सारंगीवादक महंमद हनिफ मुल्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साथीदार पुरस्काराने श्रीराम हसबनीस यांना गौरविण्यात आले. सतीश कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, डॉ. व्यंकटेश जंबगी, मिलिंद महाबळ, संतोष बापट, कल्याणी गाडगीळ, भालचंद्र चितळे, यशोधन गडकरी, जयदीप शिराळकर आदी उपस्थित होते.टीव्ही-सिनेमात फरकज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या ‘जिवासखा’ या चित्रपटातून पदार्पण केले. यावेळी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवली आहे. सिनेमामध्ये सहा फुटाचा माणूस साठ फूट दिसतो, तर टीव्हीवर सहा फुटाचा माणूस सहा इंच दिसतो. त्यामुळे टीव्हीवरील काम नव्हे तर सिनेमातील काम फार काळ लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळे सिनेमाला प्राधान्य दिल्याचे खेडेकर यांनी सांगितले.कस न लागणाऱ्या दूरदर्शन मालिकाखेडेकर म्हणाले की, कशाचाच कस लागणार नाही, अशी व्यवस्था सध्याच्या दूरदर्शन मालिकांमध्ये असते. माणूस म्हणून आपण वाढत असताना तोच तो रोल दररोज करण्याने अवघडल्यासारखे होते. दूरदर्शनवरील मालिकांमुळे मला देशभर ओळख दिली असली तरी, आताचे वास्तव वेगळे आहे.