शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चित्रपटांत नकारात्मकता मांडण्याची पध्दत भीषण : सचिन खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:54 IST

चित्रपट निर्मितीसाठी अनेक सुंदर आणि लोकांवर चांगला परिणाम करणारे विषय आहेत. तरीही मुंबई गॅँगवॉर, मन्या सुर्वे आणि इतर नको त्या विषयांवर अधिक प्रभावीपणे चित्रपट बनविले जात आहेत.

ठळक मुद्देसंस्कार भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत कार्यक्रम; सचिन कानिटकरांनी रंगविला गप्पांचा फड

सांगली : चित्रपट निर्मितीसाठी अनेक सुंदर आणि लोकांवर चांगला परिणाम करणारे विषय आहेत. तरीही मुंबई गॅँगवॉर, मन्या सुर्वे आणि इतर नको त्या विषयांवर अधिक प्रभावीपणे चित्रपट बनविले जात आहेत. नकारात्मक गोष्टी अत्यंत चकचकीतपणे जोरात बिंबविण्याची ही पध्दत भीषण असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी शनिवारी सांगलीत बोलताना व्यक्त केले.

संस्कार भारती, शाखा सांगलीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण व खेडेकर यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. सचिन कानिटकर यांनी अनेक खुमासदार प्रश्न विचारून मुलाखतीची रंगत वाढविली.

खेडेकर म्हणाले की, धंदेवाईक गणिते मांडून हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. अनेक नितांत सुंदर विषय असतानाही अलीकडे नकारात्मक गोष्टींवरीलच अधिक चित्रपट येत आहेत. खलनायकाची भूमिका करताना एकवेळ अभिनयाचा कस लागतो मात्र, अशा भूमिका व्दिधा मनस्थितीत टाकतात. आताचा ओढा पाहिला तर अशा माणसांना अधिक प्रसिध्द बनविण्याचाच प्रयत्न चालू आहे. सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली वाईट गोष्ट सर्वमान्य करण्याचा हा प्रयत्न आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊनही अभिनय क्षेत्रात उतरण्यासाठी घरचा पाठिंबा महत्त्वाचा होता. मनोरंजनातून सांगितलेली कोणतीही गोष्ट अधिक टिकते त्यामुळे अभिनय करत असताना त्याचा माणसांवर परिणाम व्हावा, त्यांच्यात बदल व्हावा, ही अपेक्षा असते. कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसल्याने डॉ. श्रीराम लागूंसारखे, पंकज कपूर आणि अमिताभ बच्चनसारखे काम करावे, ही इच्छा होती. या कलाकारांनी आपल्यातील बाळ जिवंत ठेवल्यानेच असा नैसर्गिक अभिनय करता येतो. कलाकाराला आपल्यातील दुय्यमत्व मानता आले पाहिजे.

आपण म्हणजे स्वयंभू ही वृत्ती चुकीची असून, नट स्वत: काही घडवत नसून, अभिनय फुलण्यासाठी दमदार लेखन कारणीभूत ठरत असते. आपल्यात ‘रोलमॉडेल’ कमी असल्याने कलाकार अभिनयापेक्षा बाहेरचे काय बोलतात, याकडे सर्वांचे जास्त लक्ष असल्याचेही ते म्हणाले. यावेळी इंदिराबाई खाडिलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरूवर्य मटंगेबुवा पुरस्काराने गायक अमोल पटवर्धन, तर सारंगीवादक महंमद हनिफ मुल्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साथीदार पुरस्काराने श्रीराम हसबनीस यांना गौरविण्यात आले. सतीश कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, डॉ. व्यंकटेश जंबगी, मिलिंद महाबळ, संतोष बापट, कल्याणी गाडगीळ, भालचंद्र चितळे, यशोधन गडकरी, जयदीप शिराळकर आदी उपस्थित होते.टीव्ही-सिनेमात फरकज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या ‘जिवासखा’ या चित्रपटातून पदार्पण केले. यावेळी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवली आहे. सिनेमामध्ये सहा फुटाचा माणूस साठ फूट दिसतो, तर टीव्हीवर सहा फुटाचा माणूस सहा इंच दिसतो. त्यामुळे टीव्हीवरील काम नव्हे तर सिनेमातील काम फार काळ लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळे सिनेमाला प्राधान्य दिल्याचे खेडेकर यांनी सांगितले.कस न लागणाऱ्या दूरदर्शन मालिकाखेडेकर म्हणाले की, कशाचाच कस लागणार नाही, अशी व्यवस्था सध्याच्या दूरदर्शन मालिकांमध्ये असते. माणूस म्हणून आपण वाढत असताना तोच तो रोल दररोज करण्याने अवघडल्यासारखे होते. दूरदर्शनवरील मालिकांमुळे मला देशभर ओळख दिली असली तरी, आताचे वास्तव वेगळे आहे.