शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

माधवनगरात आठवणी यंत्रमाग धडधडीच्या

By admin | Updated: June 22, 2016 00:07 IST

नियोजनबद्ध निर्मिती : सांगलीला पर्याय असलेल्या व्यापारीपेठेचे होणार काय?, नागरी सुविधांची प्रतीक्षा कायम --बदलते माधवनगर-१

सांगली शहरालगतचे माधवनगर म्हणजे एकेकाळची मोठी व्यापारीपेठ. सांगलीस पर्यायी व्यापारीपेठ म्हणूनच हे गाव वसवले गेले. ते वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्रही बनले. मात्र काळाच्या ओघात हे नियोजनबद्धरित्या वसवलेले गाव बदलत गेले. नागरीकरण वाढले, गावाचा विस्तार चारही दिशांनी झाला, पण समस्याही वाढल्या. व्यापारीदृष्ट्या उद्ध्वस्त होणाऱ्या या गावाने मागील दहा वर्षांत पुन्हा उभारी घेतली. मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. या सगळ्या स्थित्यंतराचा मागोवा घेणारी ही मालिका...गजानन साळुंखे ल्ल मधवनगरमाधवनगर या उद्योगी व व्यापारी गावाची निर्मिती सांगलीस पर्यायी बाजारपेठ म्हणून झाली. तत्कालीन सांगली संस्थांनामध्ये व्यापारी वर्गावर अन्यायी निर्णय लागू केल्याने १९४५ च्या आसपास माधवनगरची स्थापना बुधगावकर संस्थानचे तत्कालीन माधवरावअधिपती पटर्वधन यांच्या पुढाकाराने झाली. व्यापारीवर्गाला पर्यायी बाजारपेठ वसवण्यासाठी जागा उपलब्ध करून देतानाच सोयी-सवलतीही दिल्या आणि माधवराव पटवर्धन यांच्या नावावरून माधवनगर असे गावाचे नामकरण झाले. या माधवनगरने व्यापारी आणि उद्योग क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. कापड उद्योगात माधवनगरचे नाव आजही देशभरात आदराने घेतले जाते.कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि माधवनगर या दोन्ही गावात प्रचंड साम्य आहे. जयसिंगपूरच्या धर्तीवर अभ्यास करून माधवनगर वसवण्यात आले. पाच ते दहा हजार चौरसफुटांचे प्लॉट, मागील बाजूस गोदामाची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी आड (विहीर), पुढील बाजूला राहण्यासाठी घर, समोर प्रशस्त रस्ते, जागेच्या मागील बाजूस सांडपाणी व मैलविसर्जनासाठी अरूंद बोळ, प्रत्येक गल्लीत खुली जागा, पूर्व-पश्चिम व्यापारी पेठा अशी रचना होती. पुढे त्यांना आठवड्यातील सात वारांची नावे देण्यात आली. ती तशीच आहेत. स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी काकडवाडी येथून चिनी मातीच्या वाहिन्यांची व विशेष तंत्रज्ञान वापरून सायफान पद्धतीने सोय करण्यात आली होती. १९५४ मध्ये माधवनगर ग्रामपंचायतीची स्थापना होऊन देवकरण मालू ऊर्फ बार्शीकर शेठजी पहिले सरपंच झाले. शेतकरी कामगार पक्ष, कॉँग्रेस, जनसंघ आणि कामगार संघटना आदी पक्ष पहिल्यापासूनच सक्रिय राहिले. गावाती शेतीयोग्य जमीन अल्प आहे. गावाच्या मध्यभागी रेल्वे स्थानक होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर होई. त्याचा कापड उद्योगाला फायदा झाला. काळाच्या ओघात येथील रेल्वे बंद झाली व गावाच्या बाहेरून नवीन रेल्वेमार्ग सुरू झाला. मात्र गावाच्या विकासासाठी त्याचा संबंध कमी राहिला आहे.गंगाधर लक्ष्मण नातू यांनी १९४४ मध्ये दि माधवनगर कॉटन मिलची स्थापना केली. या मिलची ओळख जिल्ह्याचे भूषण अशीच होती. आसपासच्या पंधरा गावाच्या विकासात कॉटन मिलचा सिंहाचा वाटा राहिला. त्यासाठी बुधगावकर पटवर्धन सरकारने जागा उपलब्ध करून दिली. या मिलमध्ये त्याकाळी अडीच हजार कायम कामगार होते. तेवढेच कंत्राटी कामगारही होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील बेरोजगार माधवनगरात रोजगारासाठी आले आणि येथेच स्थायिक झाले. या मिलने कुशल कामगार कापड उद्योगास दिले. सलग २५ वर्ष ही मिल अतिशय उत्तम पद्धतीने चालली. हा काळ माधवनगर व इतर गावाबरोबर या परिसरातील ग्रामस्थांच्या जीवनातील उत्कर्षाचा काळ ओळखला जातो. राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला होता. मिलमधून उत्पादित होणारा पक्का माल अनेक नामवंत कापड कंपन्यांना दिला जात असे. जागतिक कापड बाजारात माधवनगरची स्वतंत्र ओळख त्यामुळे निर्माण झाली होती. त्याचवेळी गावात यंत्रमागाने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले.गावातील कोणत्याही घरात पहावे तेथे यंत्रमाग दिसत होते. यंत्रमागाच्या धडधडीची गावाला सवय झाली होती. अनेकांची रोजीरोटी यंत्रमागावर चालली होती. आज त्या आठवणी केवळ चर्चेपुरत्या राहिल्या आहेत... (क्रमश:)कॉटन मिलचे योगदान माधवनगर कॉटन मिलमुळे गावातील परिसर नेहमी गजबजलेला असे. सर्व प्रकारच्या सोयीसवलती मिलने कामगारांना व ग्रामस्थांना दिल्या. मिलमधून मिळणाऱ्या आर्थिक महसुलातून ग्रामपंचायत संपूर्ण गावाला वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा पुरवत असे. मिलच्या अस्तित्वामुळे अनेक लहान-मोठे उद्योग-व्यवसाय येथे उभे राहिले. मिलमुळे वेगळी बाजारपेठच माधवनगरला वसली होती.