शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

माधवनगरात आठवणी यंत्रमाग धडधडीच्या

By admin | Updated: June 22, 2016 00:07 IST

नियोजनबद्ध निर्मिती : सांगलीला पर्याय असलेल्या व्यापारीपेठेचे होणार काय?, नागरी सुविधांची प्रतीक्षा कायम --बदलते माधवनगर-१

सांगली शहरालगतचे माधवनगर म्हणजे एकेकाळची मोठी व्यापारीपेठ. सांगलीस पर्यायी व्यापारीपेठ म्हणूनच हे गाव वसवले गेले. ते वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्रही बनले. मात्र काळाच्या ओघात हे नियोजनबद्धरित्या वसवलेले गाव बदलत गेले. नागरीकरण वाढले, गावाचा विस्तार चारही दिशांनी झाला, पण समस्याही वाढल्या. व्यापारीदृष्ट्या उद्ध्वस्त होणाऱ्या या गावाने मागील दहा वर्षांत पुन्हा उभारी घेतली. मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. या सगळ्या स्थित्यंतराचा मागोवा घेणारी ही मालिका...गजानन साळुंखे ल्ल मधवनगरमाधवनगर या उद्योगी व व्यापारी गावाची निर्मिती सांगलीस पर्यायी बाजारपेठ म्हणून झाली. तत्कालीन सांगली संस्थांनामध्ये व्यापारी वर्गावर अन्यायी निर्णय लागू केल्याने १९४५ च्या आसपास माधवनगरची स्थापना बुधगावकर संस्थानचे तत्कालीन माधवरावअधिपती पटर्वधन यांच्या पुढाकाराने झाली. व्यापारीवर्गाला पर्यायी बाजारपेठ वसवण्यासाठी जागा उपलब्ध करून देतानाच सोयी-सवलतीही दिल्या आणि माधवराव पटवर्धन यांच्या नावावरून माधवनगर असे गावाचे नामकरण झाले. या माधवनगरने व्यापारी आणि उद्योग क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. कापड उद्योगात माधवनगरचे नाव आजही देशभरात आदराने घेतले जाते.कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि माधवनगर या दोन्ही गावात प्रचंड साम्य आहे. जयसिंगपूरच्या धर्तीवर अभ्यास करून माधवनगर वसवण्यात आले. पाच ते दहा हजार चौरसफुटांचे प्लॉट, मागील बाजूस गोदामाची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी आड (विहीर), पुढील बाजूला राहण्यासाठी घर, समोर प्रशस्त रस्ते, जागेच्या मागील बाजूस सांडपाणी व मैलविसर्जनासाठी अरूंद बोळ, प्रत्येक गल्लीत खुली जागा, पूर्व-पश्चिम व्यापारी पेठा अशी रचना होती. पुढे त्यांना आठवड्यातील सात वारांची नावे देण्यात आली. ती तशीच आहेत. स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी काकडवाडी येथून चिनी मातीच्या वाहिन्यांची व विशेष तंत्रज्ञान वापरून सायफान पद्धतीने सोय करण्यात आली होती. १९५४ मध्ये माधवनगर ग्रामपंचायतीची स्थापना होऊन देवकरण मालू ऊर्फ बार्शीकर शेठजी पहिले सरपंच झाले. शेतकरी कामगार पक्ष, कॉँग्रेस, जनसंघ आणि कामगार संघटना आदी पक्ष पहिल्यापासूनच सक्रिय राहिले. गावाती शेतीयोग्य जमीन अल्प आहे. गावाच्या मध्यभागी रेल्वे स्थानक होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर होई. त्याचा कापड उद्योगाला फायदा झाला. काळाच्या ओघात येथील रेल्वे बंद झाली व गावाच्या बाहेरून नवीन रेल्वेमार्ग सुरू झाला. मात्र गावाच्या विकासासाठी त्याचा संबंध कमी राहिला आहे.गंगाधर लक्ष्मण नातू यांनी १९४४ मध्ये दि माधवनगर कॉटन मिलची स्थापना केली. या मिलची ओळख जिल्ह्याचे भूषण अशीच होती. आसपासच्या पंधरा गावाच्या विकासात कॉटन मिलचा सिंहाचा वाटा राहिला. त्यासाठी बुधगावकर पटवर्धन सरकारने जागा उपलब्ध करून दिली. या मिलमध्ये त्याकाळी अडीच हजार कायम कामगार होते. तेवढेच कंत्राटी कामगारही होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील बेरोजगार माधवनगरात रोजगारासाठी आले आणि येथेच स्थायिक झाले. या मिलने कुशल कामगार कापड उद्योगास दिले. सलग २५ वर्ष ही मिल अतिशय उत्तम पद्धतीने चालली. हा काळ माधवनगर व इतर गावाबरोबर या परिसरातील ग्रामस्थांच्या जीवनातील उत्कर्षाचा काळ ओळखला जातो. राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला होता. मिलमधून उत्पादित होणारा पक्का माल अनेक नामवंत कापड कंपन्यांना दिला जात असे. जागतिक कापड बाजारात माधवनगरची स्वतंत्र ओळख त्यामुळे निर्माण झाली होती. त्याचवेळी गावात यंत्रमागाने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले.गावातील कोणत्याही घरात पहावे तेथे यंत्रमाग दिसत होते. यंत्रमागाच्या धडधडीची गावाला सवय झाली होती. अनेकांची रोजीरोटी यंत्रमागावर चालली होती. आज त्या आठवणी केवळ चर्चेपुरत्या राहिल्या आहेत... (क्रमश:)कॉटन मिलचे योगदान माधवनगर कॉटन मिलमुळे गावातील परिसर नेहमी गजबजलेला असे. सर्व प्रकारच्या सोयीसवलती मिलने कामगारांना व ग्रामस्थांना दिल्या. मिलमधून मिळणाऱ्या आर्थिक महसुलातून ग्रामपंचायत संपूर्ण गावाला वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा पुरवत असे. मिलच्या अस्तित्वामुळे अनेक लहान-मोठे उद्योग-व्यवसाय येथे उभे राहिले. मिलमुळे वेगळी बाजारपेठच माधवनगरला वसली होती.