शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगरात आठवणी यंत्रमाग धडधडीच्या

By admin | Updated: June 22, 2016 00:07 IST

नियोजनबद्ध निर्मिती : सांगलीला पर्याय असलेल्या व्यापारीपेठेचे होणार काय?, नागरी सुविधांची प्रतीक्षा कायम --बदलते माधवनगर-१

सांगली शहरालगतचे माधवनगर म्हणजे एकेकाळची मोठी व्यापारीपेठ. सांगलीस पर्यायी व्यापारीपेठ म्हणूनच हे गाव वसवले गेले. ते वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्रही बनले. मात्र काळाच्या ओघात हे नियोजनबद्धरित्या वसवलेले गाव बदलत गेले. नागरीकरण वाढले, गावाचा विस्तार चारही दिशांनी झाला, पण समस्याही वाढल्या. व्यापारीदृष्ट्या उद्ध्वस्त होणाऱ्या या गावाने मागील दहा वर्षांत पुन्हा उभारी घेतली. मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. या सगळ्या स्थित्यंतराचा मागोवा घेणारी ही मालिका...गजानन साळुंखे ल्ल मधवनगरमाधवनगर या उद्योगी व व्यापारी गावाची निर्मिती सांगलीस पर्यायी बाजारपेठ म्हणून झाली. तत्कालीन सांगली संस्थांनामध्ये व्यापारी वर्गावर अन्यायी निर्णय लागू केल्याने १९४५ च्या आसपास माधवनगरची स्थापना बुधगावकर संस्थानचे तत्कालीन माधवरावअधिपती पटर्वधन यांच्या पुढाकाराने झाली. व्यापारीवर्गाला पर्यायी बाजारपेठ वसवण्यासाठी जागा उपलब्ध करून देतानाच सोयी-सवलतीही दिल्या आणि माधवराव पटवर्धन यांच्या नावावरून माधवनगर असे गावाचे नामकरण झाले. या माधवनगरने व्यापारी आणि उद्योग क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. कापड उद्योगात माधवनगरचे नाव आजही देशभरात आदराने घेतले जाते.कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि माधवनगर या दोन्ही गावात प्रचंड साम्य आहे. जयसिंगपूरच्या धर्तीवर अभ्यास करून माधवनगर वसवण्यात आले. पाच ते दहा हजार चौरसफुटांचे प्लॉट, मागील बाजूस गोदामाची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी आड (विहीर), पुढील बाजूला राहण्यासाठी घर, समोर प्रशस्त रस्ते, जागेच्या मागील बाजूस सांडपाणी व मैलविसर्जनासाठी अरूंद बोळ, प्रत्येक गल्लीत खुली जागा, पूर्व-पश्चिम व्यापारी पेठा अशी रचना होती. पुढे त्यांना आठवड्यातील सात वारांची नावे देण्यात आली. ती तशीच आहेत. स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी काकडवाडी येथून चिनी मातीच्या वाहिन्यांची व विशेष तंत्रज्ञान वापरून सायफान पद्धतीने सोय करण्यात आली होती. १९५४ मध्ये माधवनगर ग्रामपंचायतीची स्थापना होऊन देवकरण मालू ऊर्फ बार्शीकर शेठजी पहिले सरपंच झाले. शेतकरी कामगार पक्ष, कॉँग्रेस, जनसंघ आणि कामगार संघटना आदी पक्ष पहिल्यापासूनच सक्रिय राहिले. गावाती शेतीयोग्य जमीन अल्प आहे. गावाच्या मध्यभागी रेल्वे स्थानक होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर होई. त्याचा कापड उद्योगाला फायदा झाला. काळाच्या ओघात येथील रेल्वे बंद झाली व गावाच्या बाहेरून नवीन रेल्वेमार्ग सुरू झाला. मात्र गावाच्या विकासासाठी त्याचा संबंध कमी राहिला आहे.गंगाधर लक्ष्मण नातू यांनी १९४४ मध्ये दि माधवनगर कॉटन मिलची स्थापना केली. या मिलची ओळख जिल्ह्याचे भूषण अशीच होती. आसपासच्या पंधरा गावाच्या विकासात कॉटन मिलचा सिंहाचा वाटा राहिला. त्यासाठी बुधगावकर पटवर्धन सरकारने जागा उपलब्ध करून दिली. या मिलमध्ये त्याकाळी अडीच हजार कायम कामगार होते. तेवढेच कंत्राटी कामगारही होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील बेरोजगार माधवनगरात रोजगारासाठी आले आणि येथेच स्थायिक झाले. या मिलने कुशल कामगार कापड उद्योगास दिले. सलग २५ वर्ष ही मिल अतिशय उत्तम पद्धतीने चालली. हा काळ माधवनगर व इतर गावाबरोबर या परिसरातील ग्रामस्थांच्या जीवनातील उत्कर्षाचा काळ ओळखला जातो. राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला होता. मिलमधून उत्पादित होणारा पक्का माल अनेक नामवंत कापड कंपन्यांना दिला जात असे. जागतिक कापड बाजारात माधवनगरची स्वतंत्र ओळख त्यामुळे निर्माण झाली होती. त्याचवेळी गावात यंत्रमागाने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले.गावातील कोणत्याही घरात पहावे तेथे यंत्रमाग दिसत होते. यंत्रमागाच्या धडधडीची गावाला सवय झाली होती. अनेकांची रोजीरोटी यंत्रमागावर चालली होती. आज त्या आठवणी केवळ चर्चेपुरत्या राहिल्या आहेत... (क्रमश:)कॉटन मिलचे योगदान माधवनगर कॉटन मिलमुळे गावातील परिसर नेहमी गजबजलेला असे. सर्व प्रकारच्या सोयीसवलती मिलने कामगारांना व ग्रामस्थांना दिल्या. मिलमधून मिळणाऱ्या आर्थिक महसुलातून ग्रामपंचायत संपूर्ण गावाला वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा पुरवत असे. मिलच्या अस्तित्वामुळे अनेक लहान-मोठे उद्योग-व्यवसाय येथे उभे राहिले. मिलमुळे वेगळी बाजारपेठच माधवनगरला वसली होती.