शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

By admin | Updated: May 29, 2017 23:14 IST

सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी सोमवारी कारखान्याच्या विशेष सभेत एकमताने ठराव करत, मुंबईच्या श्री दत्त इंडिया कंपनीला कारखाना चालविण्यास हिरवा कंदील दर्शविला. त्यामुळे आता कंपनीसोबतच्या करारपत्राचा मार्ग मोकळा झाला आहे. वसंतदादा कारखाना परिसरातील सभागृहात विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभा पार पडली. सभेस सभासदांचीही मोठी उपस्थिती होती. वादविवादाची किरकोळ घटना वगळता सभा शांततेत पार पडली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात एकाही सभासदाने विरोध दर्शविला नाही. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्ष पाटील यांनी सभासदांना सूचना मांडण्याचे आवाहन केले. त्यानंतर १५ सभासदांनी सूचना मांडल्या. या सर्व सूचना कामगार, शेतकरी, सभासद यांच्या थकीत देय रकमेबद्दलच्याच होत्या. कंपनीच्या कारभारावर संचालक मंडळाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही सभासदांनी केली. कवठेपिरानचे चंद्रशेखर बुटाले म्हणाले की, कामगारांचे पगार थकीत राहणे हा कारखान्याचा अपमान आहे. त्यामुळे शेतकरी, सभासदांची देणी भागविताना प्राधान्याने कामगारांचीही देणी द्यावीत. कारखान्याशी संबंधित संस्थांचे हिशेब सभासदांपुढे कधीच येत नाहीत. त्यामुळे ते हिशेब पुढील सभेत सादर करावेत.अंकलखोपचे अनिल पाटील म्हणाले की, कंपनी कशापद्धतीने देणी देणार आहे, याचा खुलासा सभासदांसमोर केला पाहिजे. बुधगावचे दिनकर पाटील यांनी, सभासदांची देणी व्याजासहीत देण्यात यावीत, अशी मागणी केली. कारखान्याचे उपप्रकल्पही भाडेतत्त्वावर द्यावेत, भाडेकराराचा मसुदा सर्व सभासदांसाठी उपलब्ध करावा, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या.कामगार संघटनेचे नेते प्रदीप शिंदे म्हणाले की, आमची संघटना नोंदणीकृत अधिकृत संघटना असल्याने या संघटनेशी कंपनीने कामगारांबाबतचा करार केला पाहिजे. सांगलीवाडीचे प्रभाकर पाटील म्हणाले की, आजपर्यंत कधीच कारखान्याचे इतिवृत्त पाहायला मिळाले नाही. हा प्रकार कारखान्यापासून मंत्रालयापर्यंत सारखाच आहे. त्यामुळे रितसर सभेचे इतिवृत्त लिहावे आणि कारभारात पारदर्शकता ठेवावी. सहकार कायद्याप्रमाणे कारखाना, संचालक, सभासदांचे हक्क अबाधित ठेवावेत. सभासदांच्या प्रश्नांना विशाल पाटील यांनी उत्तरे दिली. त्यानंतर ठराव मंजुरीच्या घोषणा देऊन सभा संपविण्यात आली. भास्कर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, डी. के. पाटील, अनिल पाटील, विक्रम पाटील-सावर्डेकर, शिवाजीराव पाटील, भास्कर पाटील, जिनेश्वर पाटील, रणजितसिंह पाटील आदी उपस्थित होते. विशाल पाटील, तुमच्यावर विश्वास नाही!सांगलीचे अनिल शिंदे यांनी विशाल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, तुम्ही बोगस धनादेश देऊन शेतकऱ्यांना फसवता. विशाल पाटील यास जबाबदार आहेत. त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तुम्हा संचालकांवर ८८ अंतर्गत कारवाई का होत नाही? असेही ते म्हणाले. त्यांच्या आरोपानंतर सभेतील वातावरण तापले. काही सभासदांनी त्यांचे भाषण बंद करण्याची मागणी केली, तर विशाल पाटील यांनी शिंदे यांच्यावर स्टंटबाजीचा आरोप केला. त्यामुळे थोडी वादावादी आणि तणाव निर्माण झाला.करारपत्रानंतर आठ दिवसात पैसेविशाल पाटील म्हणाले की, श्री दत्त इंडिया कंपनीबरोबर करार झाल्यानंतर आठ दिवसात थकीत ऊसबिलाच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कामगारांशीही कंपनीने करार करावा, असे आम्ही नमूद केले आहे. ही कंपनी म्हणजे देशातील नामांकित साखर व्यापार करणारी संस्था आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जादा दराची अपेक्षा पूर्ण होईल, मात्र सभासदांची जबाबदारी वाढली आहे. सभासद जितका ज्यादा ऊस कारखान्यास देतील, तेवढे जादा भाडे आपणास मिळणार आहे. त्यामुळे सभासदांनी जादा ऊस द्यावा.हा तर दु:खद निर्णय... आष्ट्यातील भूपाल खोत म्हणाले की, कारखाना चालवायला न देण्याच्या बाजूचे आम्ही आहोत. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच हा कारखाना चालविण्यास देण्याची वेळ यावी, हा एक दु:खद निर्णय आहे.