शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

By admin | Updated: May 29, 2017 23:14 IST

सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी सोमवारी कारखान्याच्या विशेष सभेत एकमताने ठराव करत, मुंबईच्या श्री दत्त इंडिया कंपनीला कारखाना चालविण्यास हिरवा कंदील दर्शविला. त्यामुळे आता कंपनीसोबतच्या करारपत्राचा मार्ग मोकळा झाला आहे. वसंतदादा कारखाना परिसरातील सभागृहात विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभा पार पडली. सभेस सभासदांचीही मोठी उपस्थिती होती. वादविवादाची किरकोळ घटना वगळता सभा शांततेत पार पडली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात एकाही सभासदाने विरोध दर्शविला नाही. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्ष पाटील यांनी सभासदांना सूचना मांडण्याचे आवाहन केले. त्यानंतर १५ सभासदांनी सूचना मांडल्या. या सर्व सूचना कामगार, शेतकरी, सभासद यांच्या थकीत देय रकमेबद्दलच्याच होत्या. कंपनीच्या कारभारावर संचालक मंडळाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही सभासदांनी केली. कवठेपिरानचे चंद्रशेखर बुटाले म्हणाले की, कामगारांचे पगार थकीत राहणे हा कारखान्याचा अपमान आहे. त्यामुळे शेतकरी, सभासदांची देणी भागविताना प्राधान्याने कामगारांचीही देणी द्यावीत. कारखान्याशी संबंधित संस्थांचे हिशेब सभासदांपुढे कधीच येत नाहीत. त्यामुळे ते हिशेब पुढील सभेत सादर करावेत.अंकलखोपचे अनिल पाटील म्हणाले की, कंपनी कशापद्धतीने देणी देणार आहे, याचा खुलासा सभासदांसमोर केला पाहिजे. बुधगावचे दिनकर पाटील यांनी, सभासदांची देणी व्याजासहीत देण्यात यावीत, अशी मागणी केली. कारखान्याचे उपप्रकल्पही भाडेतत्त्वावर द्यावेत, भाडेकराराचा मसुदा सर्व सभासदांसाठी उपलब्ध करावा, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या.कामगार संघटनेचे नेते प्रदीप शिंदे म्हणाले की, आमची संघटना नोंदणीकृत अधिकृत संघटना असल्याने या संघटनेशी कंपनीने कामगारांबाबतचा करार केला पाहिजे. सांगलीवाडीचे प्रभाकर पाटील म्हणाले की, आजपर्यंत कधीच कारखान्याचे इतिवृत्त पाहायला मिळाले नाही. हा प्रकार कारखान्यापासून मंत्रालयापर्यंत सारखाच आहे. त्यामुळे रितसर सभेचे इतिवृत्त लिहावे आणि कारभारात पारदर्शकता ठेवावी. सहकार कायद्याप्रमाणे कारखाना, संचालक, सभासदांचे हक्क अबाधित ठेवावेत. सभासदांच्या प्रश्नांना विशाल पाटील यांनी उत्तरे दिली. त्यानंतर ठराव मंजुरीच्या घोषणा देऊन सभा संपविण्यात आली. भास्कर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, डी. के. पाटील, अनिल पाटील, विक्रम पाटील-सावर्डेकर, शिवाजीराव पाटील, भास्कर पाटील, जिनेश्वर पाटील, रणजितसिंह पाटील आदी उपस्थित होते. विशाल पाटील, तुमच्यावर विश्वास नाही!सांगलीचे अनिल शिंदे यांनी विशाल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, तुम्ही बोगस धनादेश देऊन शेतकऱ्यांना फसवता. विशाल पाटील यास जबाबदार आहेत. त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तुम्हा संचालकांवर ८८ अंतर्गत कारवाई का होत नाही? असेही ते म्हणाले. त्यांच्या आरोपानंतर सभेतील वातावरण तापले. काही सभासदांनी त्यांचे भाषण बंद करण्याची मागणी केली, तर विशाल पाटील यांनी शिंदे यांच्यावर स्टंटबाजीचा आरोप केला. त्यामुळे थोडी वादावादी आणि तणाव निर्माण झाला.करारपत्रानंतर आठ दिवसात पैसेविशाल पाटील म्हणाले की, श्री दत्त इंडिया कंपनीबरोबर करार झाल्यानंतर आठ दिवसात थकीत ऊसबिलाच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कामगारांशीही कंपनीने करार करावा, असे आम्ही नमूद केले आहे. ही कंपनी म्हणजे देशातील नामांकित साखर व्यापार करणारी संस्था आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जादा दराची अपेक्षा पूर्ण होईल, मात्र सभासदांची जबाबदारी वाढली आहे. सभासद जितका ज्यादा ऊस कारखान्यास देतील, तेवढे जादा भाडे आपणास मिळणार आहे. त्यामुळे सभासदांनी जादा ऊस द्यावा.हा तर दु:खद निर्णय... आष्ट्यातील भूपाल खोत म्हणाले की, कारखाना चालवायला न देण्याच्या बाजूचे आम्ही आहोत. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच हा कारखाना चालविण्यास देण्याची वेळ यावी, हा एक दु:खद निर्णय आहे.