शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सांगलीतील बेडगच्या प्रश्नावर मुंबईत बैठक, बौद्ध समाजातील ग्रामस्थांचा गाव सोडून मुंबईच्या दिशेने लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 17:13 IST

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांच्या स्वागत कमानीचे बांधकाम बेकायदेशीरपणे प्रशासनाने ...

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांच्या स्वागत कमानीचे बांधकाम बेकायदेशीरपणे प्रशासनाने पाडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बौद्ध समाजातील ग्रामस्थांनी गाव सोडून मुंबईच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २१ जुलै रोजी चर्चेसाठी बोलावल्यामुळे पाच जणांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले आहे. तरीही आंदोलकांचा लाँग मार्च चालूच राहणार आहे.आंदोलकांचा लाँग मार्च गुरुवारी सायंकाळी इस्लामपूर येथे पोहोचला आहे. इस्लामपुरात मुक्काम करून शुक्रवारी पुन्हा लाँग मार्च चालू असणार आहे. मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाशी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आंदोलन पुढे चालू राहणार आहे. मागण्यावर ठोस निर्णय झाला तर आंदोलकांच्या ठिकाणी जाहीर सभा होऊन तहकूब करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी दिली.दरम्यान, पुरोगामी संघटनांची बेडग प्रश्नावर गुरुवारी सांगलीत बैठक झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, ॲड. सुभाष पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, धनाजी गुरव, डॉ. बाबूराव गुरव, माजी नगरसेविका ज्योती अदाटे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, प्रा. गौतम काटकर, सुरेश दुधगावकर, किरण कांबळे, डॉ. रवींद्र श्रावस्थी, डॉ. संपत गायकवाड, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, राज्य सरकारने बेडगच्या स्वागत कमानीच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर शनिवारपासून महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या पाठिंब्यावर आंदोलन चालू होईल. बेडग गावातील बौद्ध समाजाच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या नावांची कमान पोलिस सुरक्षेत पाडली आहे. त्यामुळे आम्हाला गाव राहिले नाही, म्हणून सर्व नागरिक घरांना कुलूप लावून गावाबाहेर पडले आहेत, ही बाब गंभीर आहे. गावातील लोक विरोध करत नाहीत, पण साथही देत नाहीत. म्हणून राज्यातील वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांमधील सर्व लोक आंदोलकांच्या पाठीशी आहेत. अधिकारी-राज्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढला पाहिजे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी चर्चेला बोलावल्यामुळे आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. या बैठकीत योग्य तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन चालू होणार आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री, खासदार, प्रशासनाची बघ्याची भूमिकापालकमंत्री सुरेश खाडे यांनी बेडगचा वाद मिटविण्यासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही. खासदार संजय पाटील हेही गप्प आहेत. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. राज्यकर्ते आणि प्रशासन नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून शोषितांवर अन्याय करत आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण करून काय साध्य करायचे आहे, असा सवाल धनाजी गुरव व प्रा. संपत गायकवाड यांनी केला.

परवानगीनंतर कमान का पाडली?२००२ मध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेऊन परवानगी दिली आहे. पुन्हा २००८ मध्ये काम लोकवर्गणीतून पूर्ण करण्याचा परवाना दिला. त्यानंतर दि. ३ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा जागा निश्चित करून परवानगी दिली आहे. त्यानंतर हे बांधकाम सुरू झाले, याला कोणीही गावातील लोकांनी विरोध केला नाही. मात्र अचानक अधिकाऱ्यांनी व पोलिस प्रशासनाने कमान का पाडली, असा सवालही डॉ. पाटणकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Sangliसांगली