शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

महापौरांचाही दबावगट

By admin | Updated: November 8, 2015 00:06 IST

राजीनाम्याचा प्रश्न : अनेक ठरावांवर केल्या स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या

सांगली : महापौर विवेक कांबळे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी गटात एक दबावगट तयार झाला असतानाच, महापौरांनी स्वाभिमानी आघाडीतील काही सदस्यांना घेऊन अ‍ॅँटी दबावगट स्थापन्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महापौरांच्या अ‍ॅँटीचेंबरला शनिवारी दीड तास चर्चा झाली. एकमेकांना सहकार्य करण्याच्या अटीवर हे सदस्य एकत्र आले आहेत. कांबळे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधाऱ्यांचाच एक गट आक्रमक झाला आहे. सत्ताधाऱ्यांचे नेते मदन पाटील यांच्या पश्चात जयश्रीताई पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. दोन दिवसांपूर्वी याचसंदर्भात झालेल्या चर्चेवेळी तूर्त राजीनाम्याचा विषय काढू नये, असे जयश्रीतार्इंनी सांगितल्याचे समजते. महापौरांच्याच गटातील काही सदस्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, राजीनाम्याचा विषय आला तर त्याला शह देण्यासाठी दुसरा दबावगट तयार करण्यासाठी कांबळे सरसावले आहेत. त्यांनी स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांना एकत्रित केले आहे. यासंदर्भात शनिवारी त्यांच्या अ‍ॅँटीचेंबरला बैठक झाली. यावेळी संबंधित सदस्यांची कामे करण्याच्या बदल्यात सदस्यांनी महापौरांना सहकार्य करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. चर्चेबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेपूर्वी गटनेते किशोर जामदार यांनी महापौर कांबळे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची मागणी केली. मदन पाटील यांनी शेवटचे तीन महिने मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांना संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या इच्छेनुसार आपण राजीनामा द्यावा, असा निरोप दिला; पण त्याचवेळी महापौर कांबळे यांनी राजीनाम्याला बगल दिली होती. मदनभाऊ हयात असताना पालिकेत त्यांचा शब्द अंतिम होता; पण त्यांच्या निधनानंतर आता पालिकेची गणिते बदलली आहेत. मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आले आहे, तर काँग्रेसचे दुसरे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांचेही मत याबाबत घ्यावे लागणार आहे. तरीही आताच राजीनाम्याची चर्चा करणे व त्यावरून राजकारण करण्याबाबत नेते सकारात्मक प्रतिसाद देतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) ठराव खोडला... ४महापौर कांबळे आणि स्वाभिमानीच्या गट्टीचा पहिला प्रसंग शनिवारी समोर आला. सांगली बाजार समितीच्या स्वीकृत सदस्यपदी स्वत:च्या निवडीचा ठराव महापौरांनी ऐनवेळच्या विषयात तयार केला आहे. ४सभेतील अनेक ऐनवेळच्या ठरावांप्रमाणे या ठरावावरही स्वाभिमानी सदस्य शिवराज बोळाज आणि बाळासाहेब गोंधळी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. ही बाब सत्ताधाऱ्यांतील दुसऱ्या गटास कळाल्यानंतर सायंकाळी त्यांनी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी दोन्ही सदस्यांना त्यांनी बोलाविले होते. ४पक्षाचा हा अंतर्गत विषय असताना सह्या का केल्या, अशी विचारणा बोळाज व गोंधळी यांना करण्यात आली. सह्या करताना ही बाब लक्षात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून ठरावावरील स्वत:ची नावे व स्वाक्षऱ्या खोडून टाकल्या. त्यामुळे हा ठराव वादात सापडला आहे.