शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

वंचित बहूजन आघाडीतर्फे कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा

By शरद जाधव | Updated: September 26, 2023 18:42 IST

सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात ...

सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. विकासाच्या नावाखाली विविध संस्थांचे झपाट्याने खासगीकरण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तर देशाची अर्थव्यवस्थाच भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी सांगलीत केला.सरकारी नोकरींचे कंत्राटीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी केले. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर टिकास्त्र सोडले.आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने बीएसएनल, एअर इंडियाचे खासगीकरण करत त्यातील कर्मचाऱ्यांची अडचण केली. आता शासनाच्या नव्या धोरणानुसार वर्ग एक पासून सर्वच पदावर कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करण्याचा डाव सुरू आहे. त्यातच संपूर्ण सरकारची मालकी असलेल्या रेल्वे, आरोग्य यंत्रणांचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा संस्था सरकारच्या मालकीच्या राहिल्या नाहीत तर आरक्षणाला अर्थच उरणार नाही. गोरगरीब घरातील मुलांच्या नोकरीची संधीच यामुळे जाणार असल्याचेही ते म्हणाले.यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, अभिजित पाटील, वंचितचे जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायगवळे, आनंदसागर पुजारी, अलीसो मुलाणी, क्रांतीताई सावंत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

टॅग्स :SangliसांगलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीGovernmentसरकार