शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पहलगाम हल्ल्यानंतर अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरले, जम्मू-काश्मीरला फिरायला गेलेले १५ पर्यटक सांगलीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:21 IST

जिल्ह्यातून ६६ पर्यटक जम्मू-काश्मीरच्या सहलीला

सांगली : एप्रिल, मे महिन्यात जम्मू-काश्मीरला फिरायला जाणे, म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. म्हणूनच जिल्ह्यातून ६६ पर्यटक जम्मू-काश्मीरला गेले आहेत, पण काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यामुळे अनेक पर्यटकांनी अर्ध्या रस्त्यातूनच सांगलीकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. १५ पर्यटक शुक्रवारी सांगलीत दाखल झाले असून, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.जिल्हाधिकारी काकडे यांनी पहलगाम येथे २२ एप्रिलला हल्ला झाल्यापासून पर्यटकांच्या संपर्कात होते. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही त्यांनी कामाला लावली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी पर्यटकांशी समन्वय साधून परतीच्या प्रवासासाठी मदत केली. शुक्रवारी जम्मू-काश्मीर येथून आलेले प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी काकडे यांनी संवाद साधून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे यांनी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात होते. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.

सांगली जिल्ह्यातील ६६ पर्यटक काश्मीर येथे अडकले आहेत. त्यामधील २४ पर्यटक सुखरूपपणे जम्मू काश्मीरबाहेर पडले आहेत. यातील १५ पर्यटक सांगली जिल्ह्यात पोहोचले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.

कुंडलचे पर्यटक रविवारी येणारपलूस तालुक्यातील कुंडल येथील अविनाश लाड, शोभा लाड, वैभव लाड, संगीता लाड, विकास लाड, दिपाली विकास लाड, नितीन लाड व दिपाली नितीन लाड हे सर्व पर्यटक जम्मू येथून रेल्वेला बसले आहेत. रविवारी किर्लोस्करवाडी येथील रेल्वे स्टेशनला येणार आहेत. आम्ही सुखरूप असून, फिरताना कोणताही त्रास झाला नाही, असे अविनाश लाड यांनी सांगितले.

राजपूत, जगदाळे कुटुंबीय आज येणारसांगली शहरातील प्रतापसिंह राजपूत, ज्योती राजपूत, संतोष जगदाळे, वर्षा जगदाळे हे कुटुंबीय पहलगाम येथे हल्ला झाला, यावेळी राजपूत व जगदाळे कुटुंबीयही पहलगाम येथेच जाणार होते, पण वाहन चालकाने पहलगामऐवजी अन्य ठिकाणी जाण्याची सूचना दिली. यामुळे राजपूत व जगदाळे कुटुंबीयांचा दौरा सुरळीत झाला आहे, अशी माहिती प्रतापसिंह राजपूत यांनी दिली, तसेच ते म्हणाले, आम्ही श्रीनगरमधून विमानाने पुणे येथे शुक्रवारी संध्याकाळी येणार आहे. शनिवारी सांगलीत असणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन