शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दराबाबत कारखानदारांचे मौनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 16:28 IST

कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० रुपये शेतक-यांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही. यामुळे शेतकºयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देमहापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला दर किती असणार, कारखानदारांच्या मौनाबाबत शेतक-यांमध्येही उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. पण, एकाही कारखान्याने दराची घोषणा केलेली नाही. साखर कारखानदारांशी संपर्क केला असता, त्यांनी दराच्या कोंडीबाबत सावध भूमिका घेत बोलणे टाळले आहे. कारखानदारांच्या मौनाबाबत शेतक-यांमध्येही उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

महापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला दर किती असणार, याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारखानदार गळीत हंगाम सुरु करताना दराची नेहमीच घोषणा करतात. पण, यावर्षी सर्वच कारखानदारांनी गळीत हंगाम सुरु करताना दराची घोषणाच केली नाही.

कारखानदारांच्या या भूमिकेवर शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऊस दराच्या कोंडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जोशीप्रणित शेतकरी संघटना गप्पच आहेत. ऊस दराबाबत साखर कारखानदारांशी संपर्क साधला असता, अनेकांनी, आमची कशाला प्रतिक्रिया? असे म्हणून बोलणेच टाळले. काही कारखानदारांनी शेतकºयांना योग्य दर मिळेल, असे पोकळ आश्वासन दिले. साखर कारखानदारांच्या या मौनामध्ये दडलंय काय, असा सवालही शेतक-यांनी उपस्थित केला आहे.

काही कारखानदारांनी तर एकरकमी एफआरपी देणेही कठीण असल्याचे सांगितले आहे. साखरेचे दर वाढले नसल्यामुळे एफआरपी तीन टप्प्यामध्ये देण्याचा कारखानदारांचा विचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यात ८० टक्के, दुसरे दोन टप्पे १० टक्के देण्याबाबत साखर कारखानदारांमध्ये चर्चा चालू आहे. कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० रुपये शेतक-यांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही. यामुळे शेतकºयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने