शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बेरजेच्या राजकारणाची परंपरा कायम ठेवा

By admin | Updated: May 10, 2017 22:18 IST

जयंत पाटील : क्रांतिसिंहांच्या नावाने काहींचा प्रसिद्धीचा स्टंट, येडेमच्छिंद्रेत सभापती, सदस्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क --शिरटे : वाळवा तालुक्यात आपला कोणी विरोधक नाही. सगळे आपलेच आहेत़ आपण गेल्या ३०-३५ वर्षांपासून बेरजेच्या राजकारणाची परंपरा सुरू केली आहे. ती तशीच पुढे चालू ठेवा, असा सल्ला माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी दिला. याचवेळी त्यांनी, काहीजण गावात येऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने प्रसिध्दीचा स्टंट करतात़; मात्र वाळवा तालुक्यातील जनता हुशार आहे़ त्यांना कोण काम करतो आणि कोण नुसतीच स्टंटबाजी करतो, याची जाणीव असल्याचा टोलाही मारला.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील तसेच नूतन पं़ स़ व जि़ प़ सदस्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते़ प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.आ़ पाटील म्हणाले, जि़ प़ , पं़ स़ उमेदवारी निश्चित करताना फार मोठी नाराजी निर्माण होते़ म्हणूनच कोणीही निवडून या आणि आमच्याकडे या, असे म्हणावेसे वाटते़ सध्या खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले आहे़ सहकारी साखर कारखान्यांचे पाय जखडून खासगी कारखानदारीबरोबर स्पर्धा लावली जात आहे़ डॉ़ भोसले म्हणाले की, आमदार जयंत पाटील यांनी अर्थमंत्री असताना ग्रामीण भागाच्या विकासाला मोठा निधी दिला़ त्यांनी या परिसरात केलेल्या विकास कामांच्या १० टक्के विकास कामेही इतर तालुक्यात झालेली नाहीत़ या सर्व कामांच्या बळावरच भाजपच्या लाटेतही ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, हे कौतुकास्पद आहे.कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, बाबासाहेब पवार, माजी जि़ प़ अध्यक्ष देवराज पाटील, पं़ स़ सदस्य आनंदराव पाटील, सौ़ रूपाली सपाटे, सौ़ सुप्रिया भोसले, तसेच सौ़ सुस्मिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले. राजारामबापू बँकेचे संचालक अ‍ॅड़ संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले़ शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले़ हौसेराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, धोंडीराम जाधव, धनाजी बिरमुळे, सौ़ संध्या पाटील, सौ़ राजश्री एटम, आनंदराव पाटील, शंकर चव्हाण, सुजित मोरे, सौ़ धनश्री माने, गटविकास अधिकारी राहुल गावडे, अजित पाटील, महिपती पाटील, प्रताप पाटील, दिलीप पाटील, सुनील पोळ, गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.जयंतरावांना पत्रएका विद्यार्थिनीने आ. जयंत पाटील यांना पत्र लिहून, या पत्रात विद्यार्थिनींच्या एसटीसह विविध समस्या मांडून मुली व महिलांच्या असुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली होती. आ़ पाटील यांनी या पत्रातील काही भागाचे वाचन करून ते पत्र सभापती हुलवान यांच्याकडे सुपूर्द केले़ तिने मांडलेल्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी दिला.