शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Sangli: महावितरणने तोडली कृष्णा नदीवरील शेतीपंपांची वीज, पाणी टंचाईमुळे निर्णय 

By अशोक डोंबाळे | Updated: June 15, 2023 18:51 IST

मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे

सांगली : मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे. ‘जलसंपदा’ने महावितरणला कृष्णा नदीवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महावितरणने दीड हजारांवर कृषिपंपांची वीज खंडित केली आहे. त्यानंतर रविवार ते मंगळवार असे तीन दिवस वीज चालू राहणार आहे.कोयना धरणात १२.०७ टीएमसी, तर वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे १४ ते १७ जूनपर्यंत कृष्णा नदीवर उपसा बंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाणी उपसा केल्यास पाणी व विजेचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.त्यानंतरही काही सिंचन योजना बुधवारी सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना पत्र पाठवून कृष्णा नदीवरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना सोडून अन्य सर्व योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली. त्यानुसार महावितरण कंपनीने जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील जवळपास दोड हजार पाणी योजनांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित केला. मात्र पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृष्णा नदीवरील कृषिपंपांचा वीजपुरवठा १४ ते १७ जूनपर्यंत चार दिवस खंडित केला आहे. पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेतला असून, पाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर रविवार, दि. १८ ते २० जून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. -धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण. 

कोयना धरणात १२.०७ टीएमसी आणि वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो भरपूर असून अजून दोन महिने पुरेल एवढा आहे. पंधरा दिवसात पाऊस सुरू होणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी उपसा बंदी घालून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. हा आदेश मागे घेण्याची गरज आहे. - संजय कोले, शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख.

टॅग्स :SangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीजWaterपाणी