शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: महावितरणने तोडली कृष्णा नदीवरील शेतीपंपांची वीज, पाणी टंचाईमुळे निर्णय 

By अशोक डोंबाळे | Updated: June 15, 2023 18:51 IST

मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे

सांगली : मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे. ‘जलसंपदा’ने महावितरणला कृष्णा नदीवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महावितरणने दीड हजारांवर कृषिपंपांची वीज खंडित केली आहे. त्यानंतर रविवार ते मंगळवार असे तीन दिवस वीज चालू राहणार आहे.कोयना धरणात १२.०७ टीएमसी, तर वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे १४ ते १७ जूनपर्यंत कृष्णा नदीवर उपसा बंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाणी उपसा केल्यास पाणी व विजेचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.त्यानंतरही काही सिंचन योजना बुधवारी सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना पत्र पाठवून कृष्णा नदीवरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना सोडून अन्य सर्व योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली. त्यानुसार महावितरण कंपनीने जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील जवळपास दोड हजार पाणी योजनांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित केला. मात्र पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृष्णा नदीवरील कृषिपंपांचा वीजपुरवठा १४ ते १७ जूनपर्यंत चार दिवस खंडित केला आहे. पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेतला असून, पाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर रविवार, दि. १८ ते २० जून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. -धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण. 

कोयना धरणात १२.०७ टीएमसी आणि वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो भरपूर असून अजून दोन महिने पुरेल एवढा आहे. पंधरा दिवसात पाऊस सुरू होणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी उपसा बंदी घालून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. हा आदेश मागे घेण्याची गरज आहे. - संजय कोले, शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख.

टॅग्स :SangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीजWaterपाणी