शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

सांगलीत धोकादायक गांधी वसतिगृहात दीडशेवर विद्यार्थ्यांचा मुक्काम, शिक्षण विभाग म्हणतो..

By अशोक डोंबाळे | Updated: August 22, 2023 17:56 IST

वसतिगृहाची जबाबदारी नक्की कुणाची ?

अशोक डोंबाळेसांगली : जिल्हा परिषद बांधकाम विभागाने एप्रिल २०२२ मध्ये सांगलीतील महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक ठरवली आहे. या धोकादायक इमारतीमध्ये सध्या जवळपास दीडशेवर विद्यार्थ्यांचा अनधिकृत मुक्काम आहे. वसतिगृहाची इमारत पूर्णत: जीर्ण झालेली असून, स्लॅबचा काही भाग केव्हाही कोसळेल, अशा स्थितीमध्ये आहे. जिल्हा परिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसतिगृहाच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनाची एवढी अनास्था का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महात्मा गांधी वसतिगृह हे जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रेरणेचे प्रतीक आहे. या वसतिगृहात राहून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नामांकित कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकमेव गांधी वसतिगृहाचा आधार आहे. या वसतिगृहाची सध्या खूपच वाईट अवस्था झाली आहे. इमारत जीर्ण झाली असून, स्लॅबचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, अभ्यासिका, विजेची व्यवस्था नाही. हे वसतिगृह जिल्हा परिषदेपासून अत्यंत जवळ असूनही त्याकडे अधिकारी कधीच लक्ष देत नाहीत. यामुळे वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाने एप्रिल २०२२ मध्ये महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करून तसा अहवाल दिला आहे. तरीही या धोकादायक वसतिगृहात सध्या दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा मुक्काम आहे. काही नोकरदारांचाही मुक्काम आहे. या जीर्ण झालेल्या इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असाही सवाल उपस्थित होत आहे.वसतिगृहाची जबाबदारी नक्की कुणाची ?समाज कल्याण विभागाकडे महात्मा गांधी वसतिगृहाच्या प्रवेशाची जबाबदारी होती. म्हणून समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब कामत यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी गांधी वसतिगृहाची जबाबदारी आमच्याकडे नसून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे, असे सांगितले. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वसतिगृहात महाविद्यालयीन विद्यार्थी राहात असून, त्याची जबाबदारी आमच्याकडे नाही. परंतु, वरिष्ठांनी सांगितले म्हणून आम्ही लक्ष देत आहोत. गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्यामुळे एकाही विद्यार्थ्याला आम्ही प्रवेश दिलेला नाही.

नोकरदारांच्या पार्टीमहात्मा गांधी वसतिगृह गोरगरीब विद्यार्थ्यांची सांगलीत शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेन बांधले आहे; पण सध्या या वसतिगृहात विद्यार्थी कमी आणि नोकरदारांचीच संख्या जास्त आहे. त्यामध्येही काही नोकरदार मद्यपींच्या पार्ट्याही रंगत असून त्याचा विद्यार्थ्यांना त्रासही होत आहे; पण विद्यार्थी त्यावर काहीच बोलू शकत नाहीत. जिल्हा परिषदही त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही, अशी परिस्थिती आहे.

नवीन इमारत कधी?

गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक आहे. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वसतिगृहांत राहण्याची व्यवस्था करण्याची गरज होती; पण गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज असून त्यांनीही धोकादायक इमारत पाडून नवीन इमारत बांधकामाच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांची गैरसोयवसतिगृहाची इमारत धोकादायक असल्यामुळे तिथे कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसाेय होत आहे, तरीही याकडे खासदार, आमदार, मंत्री यापैकी कुणाचेच लक्ष नसल्याबद्दल विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

सांगलीतील महात्मा गांधी वसतिगृह धोकादायक असल्यामुळे तेथे प्रवेश बंद आहेत. विद्यार्थी अनधिकृतपणे राहात असतील तर त्यांच्यावर जिल्हा परिषद कारवाई करणार आहे. वसतिगृहाची मूळ इमारत धोकादायक झाल्यामुळे ती पाडून नवीन बांधण्याबाबत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. - तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद