शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली - पृथ्वीराज चव्हाण

By शरद जाधव | Updated: January 8, 2024 20:08 IST

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते.

सांगली : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून असलेली राजकीय अस्थिरता, उद्योगवाढीस प्रोत्साहन देण्याबाबत सरकारची उदासीनता आणि इतर कारणांमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आले आहेत. परदेशी उद्योग आणि गुंतवणूक आल्यास स्थानिक उद्योगांनाही उभारी मिळत असते. मात्र, सर्वच पातळीवर उद्योगाला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याने महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली आहे. त्यामुळे उद्योजकांसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत केले.

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून अनेक उद्योग आपल्या राज्याकडे पाठ फिरवत आहेत. उद्योगांना मजबुती मिळण्यासाठी शासनाचे धोरण स्पष्ट पाहिजे. मात्र, राज्यातच राजकीय अस्थिरता असल्याने त्याचा थेट परिणाम उद्योगक्षेत्रावरही होत आहे. सत्तेत असलेले सरकार उद्योगाच्या समस्या सोडविण्यापेक्षा स्वत:चे सरकार वाचविण्यासाठी जादा प्राधान्य देत आहे.

२०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी रुपयापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट घेण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही घोषणा अवघड आहे. राज्यातील बेरोजगारीची समस्या मिटण्यासाठी विकासदर १२ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे. मात्र, औद्योगिक क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण नसल्याने ही उद्दिष्टपूर्ती तितकी सहजसाध्य नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, ज्येष्ठ उद्योजक मोहन जैन, सांगली औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, सतीश मालू, चंद्रकांत पाटील, अनंत चिमड, विजय भगत यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSangliसांगली