शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली - पृथ्वीराज चव्हाण

By शरद जाधव | Updated: January 8, 2024 20:08 IST

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते.

सांगली : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून असलेली राजकीय अस्थिरता, उद्योगवाढीस प्रोत्साहन देण्याबाबत सरकारची उदासीनता आणि इतर कारणांमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आले आहेत. परदेशी उद्योग आणि गुंतवणूक आल्यास स्थानिक उद्योगांनाही उभारी मिळत असते. मात्र, सर्वच पातळीवर उद्योगाला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याने महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली आहे. त्यामुळे उद्योजकांसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत केले.

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून अनेक उद्योग आपल्या राज्याकडे पाठ फिरवत आहेत. उद्योगांना मजबुती मिळण्यासाठी शासनाचे धोरण स्पष्ट पाहिजे. मात्र, राज्यातच राजकीय अस्थिरता असल्याने त्याचा थेट परिणाम उद्योगक्षेत्रावरही होत आहे. सत्तेत असलेले सरकार उद्योगाच्या समस्या सोडविण्यापेक्षा स्वत:चे सरकार वाचविण्यासाठी जादा प्राधान्य देत आहे.

२०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी रुपयापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट घेण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही घोषणा अवघड आहे. राज्यातील बेरोजगारीची समस्या मिटण्यासाठी विकासदर १२ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे. मात्र, औद्योगिक क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण नसल्याने ही उद्दिष्टपूर्ती तितकी सहजसाध्य नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, ज्येष्ठ उद्योजक मोहन जैन, सांगली औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, सतीश मालू, चंद्रकांत पाटील, अनंत चिमड, विजय भगत यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSangliसांगली