शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली - पृथ्वीराज चव्हाण

By शरद जाधव | Updated: January 8, 2024 20:08 IST

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते.

सांगली : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून असलेली राजकीय अस्थिरता, उद्योगवाढीस प्रोत्साहन देण्याबाबत सरकारची उदासीनता आणि इतर कारणांमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आले आहेत. परदेशी उद्योग आणि गुंतवणूक आल्यास स्थानिक उद्योगांनाही उभारी मिळत असते. मात्र, सर्वच पातळीवर उद्योगाला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याने महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली आहे. त्यामुळे उद्योजकांसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत केले.

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून अनेक उद्योग आपल्या राज्याकडे पाठ फिरवत आहेत. उद्योगांना मजबुती मिळण्यासाठी शासनाचे धोरण स्पष्ट पाहिजे. मात्र, राज्यातच राजकीय अस्थिरता असल्याने त्याचा थेट परिणाम उद्योगक्षेत्रावरही होत आहे. सत्तेत असलेले सरकार उद्योगाच्या समस्या सोडविण्यापेक्षा स्वत:चे सरकार वाचविण्यासाठी जादा प्राधान्य देत आहे.

२०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी रुपयापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट घेण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही घोषणा अवघड आहे. राज्यातील बेरोजगारीची समस्या मिटण्यासाठी विकासदर १२ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे. मात्र, औद्योगिक क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण नसल्याने ही उद्दिष्टपूर्ती तितकी सहजसाध्य नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, ज्येष्ठ उद्योजक मोहन जैन, सांगली औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, सतीश मालू, चंद्रकांत पाटील, अनंत चिमड, विजय भगत यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSangliसांगली