शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अलमट्टी धरणप्रश्नी महाराष्ट्राने भक्कमपणे बाजू मांडावी, सर्वपक्षीय कृती समितीने आमदार गाडगीळांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:53 IST

जिल्ह्यातील सततची पुराची स्थिती व अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर त्यात होणारी वाढ याबाबतचा प्रश्न समितीने गाडगीळ यांच्यासमोर मांडला

सांगली : अलमट्टी धरणाची उंची कर्नाटकने वाढवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने भक्कमपणे त्यांची बाजू मांडायला हवी. यासाठी सांगलीच्या आमदारांनी शासनाकडे आग्रह धरावा, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय समितीने आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे केली.सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार गाडगीळ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी पुढाकार घेऊन निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सततची पुराची स्थिती व अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर त्यात होणारी वाढ याबाबतचा प्रश्न समितीने गाडगीळ यांच्यासमोर मांडला. कर्नाटक सरकारने अतिरिक्त पाणीसाठा केल्याने सांगली, सातारा व कोल्हापूर या नदीपात्राच्या परिसरातील लोकांवर ओढवणारे महापुराचे संकट किती त्रासदायक होणार आहे, याबाबतचे मुद्दे यावेळी मांडण्यात आले.मागील वर्षभरात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरण क्षेत्रात पावसाळ्यात होणारा पाणीसाठा पुराचे पाणी शहरात घुसण्याचे प्रमाण, अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे वाढणारी पाणीपातळी याबाबत अभ्यास करून तयार केलेली आकडेवारी यावेळी आमदारांसमोर सादर करण्यात आली. आमदार या नात्याने या विषयात पुढाकार घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री व संबंधित विभागाच्या सचिवांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करावी, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या विविध खटल्यांत राज्य शासनाच्या वतीने योग्य व भक्कम बाजू मांडण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी सतीश साखळकर, विजयकुमार दिवाण, प्रदीप वायचळ, सतीश राजणे, उतम कांबळे, प्रशांत भोसले, तोहीद शेख, आनंद देसाई, डॉ. संजय पाटील, संजय कोरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांशी केली चर्चा

आमदार गाडगीळ यांनी याप्रश्नी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याविषयात लक्ष घालून लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन गाडगीळ यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगली