शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: 'जतवर अन्याय; पण कर्नाटकात जाणार नाही', माजी आमदार जगतापांची बोम्मईंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:08 IST

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जगताप यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत कर्नाटकला खडे बोल सुनावले.

जत : कर्नाटकने जतला कधीही पाणी दिले नाही. पावसाचे पडलेले पाणी नैसर्गिकरीत्या जत तालुक्यात आले म्हणजे जतला आम्हीच पोसतो असे होत नाही. जत तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याचा ठराव केला नाही, त्याची नोंद कुठेही नाही. असे असताना ४० गावांवर दावा करणे म्हणजे केवळ स्टंट आणि दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जगताप यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत कर्नाटकला खडे बोल सुनावले. एकीकडे बेळगाव, निपाणी, कारवार भागातील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. त्यांचे समाधान कर्नाटक करू शकले नाही. मग आता जतची चाळीस गावे घेऊन काय साध्य करणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.ते म्हणाले, जत तालुक्यावर विकास आणि पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला ही बाब खरी आहे, म्हणून काय आम्ही आमचे राज्य सोडणार नाही. आम्ही आमच्याच राज्याकडे पाणी व विकासासाठी मागणी मांडत आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही जत तालुक्याला म्हैसाळचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. पूर्व भागातील वंचित ६७ गावांसाठी प्रस्तावित असलेल्या विस्तारित योजनेचा प्रश्न सुटत नाही. यासाठी आम्ही पुढाकार घेऊन विस्तारित योजना तयार केली.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तत्त्वत: मंजुरी दिली. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केवळ सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले. यापेक्षा जास्ती काहीच झाले नाही. ही मोठी खंत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कर्नाटकच्या या स्टंटबाजीवर विचार न करता जतला वरदान ठरणारी विस्तारित योजना मंजूर करावी. आम्ही महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, जाण्याचा प्रश्न नाही, बोम्मई यांनी केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. त्यात तथ्य नाही. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली