शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

विधानसभा निकालामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्यांमधील संघर्ष वाढणार

By अविनाश कोळी | Updated: November 26, 2024 18:01 IST

सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम शक्य

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालांमुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे वर्चस्व वाढत असताना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाचा बुरूज ढासळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या बदललेल्या समीकरणांचा मोठा परिणाम होणार आहे. नवे चेहरेही राजकारणात येत असल्याने राजकारणाच्या कार्यपद्धतीतही बदल दिसू शकतो.जिल्ह्यात महायुतीचे पाच व महाविकास आघाडीचे तीन आमदार निवडून आले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीकडे पाच व महायुतीकडे तीन आमदार होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले होते. आता पुढील पाच वर्षांत महायुतीचे वर्चस्व राहण्याची चिन्हे आहेत.जिल्हा नियोजन समितीसह विषय समित्यांमध्येही त्यांचे वजन वाढणार आहे. पर्यायाने विकासकामे, निधी खर्चाच्या बाबतीतही महायुतीच्या आमदारांचा शब्द अधिक वजनदार ठरू शकतो. महाविकास आघाडीच्या आमदारांवर आता यासाठी संघर्ष करावा लागेल. केंद्रात व राज्यातही भाजप युतीचे सरकार असल्याने त्याचा लाभ सत्ताधारी आमदारांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांमध्येही स्थानिक आमदारांचा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. आमदारकी गेली, तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राहावे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील राहतील. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभा निकालाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांवरही ताबा घेण्याचा ताकदीचा प्रयत्न महायुतीच्या आमदारांकडून, तसेच नेत्यांकडून केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात बाहुबल सिद्ध केले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागेल.

नेत्यांमधील संघर्ष वाढणारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. राजकीय व्यासपीठावरील ही लढाई आता विधानसभेतही दिसून येईल.

युवा नेत्यांच्या हाती दोरजिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीला आता रोहित पाटील, सुहास बाबर, सत्यजीत देशमुख, असे नवे युवा चेहरे दिसणार आहेत. जिल्ह्यातील राजकारणाचे दोरही काही प्रमाणात या युवा नेत्यांच्या हाती गेले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय कार्यपद्धतीचे दर्शनही घडू शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024