शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विधानसभा निकालामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्यांमधील संघर्ष वाढणार

By अविनाश कोळी | Updated: November 26, 2024 18:01 IST

सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम शक्य

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालांमुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे वर्चस्व वाढत असताना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाचा बुरूज ढासळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या बदललेल्या समीकरणांचा मोठा परिणाम होणार आहे. नवे चेहरेही राजकारणात येत असल्याने राजकारणाच्या कार्यपद्धतीतही बदल दिसू शकतो.जिल्ह्यात महायुतीचे पाच व महाविकास आघाडीचे तीन आमदार निवडून आले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीकडे पाच व महायुतीकडे तीन आमदार होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले होते. आता पुढील पाच वर्षांत महायुतीचे वर्चस्व राहण्याची चिन्हे आहेत.जिल्हा नियोजन समितीसह विषय समित्यांमध्येही त्यांचे वजन वाढणार आहे. पर्यायाने विकासकामे, निधी खर्चाच्या बाबतीतही महायुतीच्या आमदारांचा शब्द अधिक वजनदार ठरू शकतो. महाविकास आघाडीच्या आमदारांवर आता यासाठी संघर्ष करावा लागेल. केंद्रात व राज्यातही भाजप युतीचे सरकार असल्याने त्याचा लाभ सत्ताधारी आमदारांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांमध्येही स्थानिक आमदारांचा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. आमदारकी गेली, तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राहावे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील राहतील. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभा निकालाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांवरही ताबा घेण्याचा ताकदीचा प्रयत्न महायुतीच्या आमदारांकडून, तसेच नेत्यांकडून केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात बाहुबल सिद्ध केले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागेल.

नेत्यांमधील संघर्ष वाढणारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. राजकीय व्यासपीठावरील ही लढाई आता विधानसभेतही दिसून येईल.

युवा नेत्यांच्या हाती दोरजिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीला आता रोहित पाटील, सुहास बाबर, सत्यजीत देशमुख, असे नवे युवा चेहरे दिसणार आहेत. जिल्ह्यातील राजकारणाचे दोरही काही प्रमाणात या युवा नेत्यांच्या हाती गेले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय कार्यपद्धतीचे दर्शनही घडू शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024