शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महापूर, दुष्काळामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाची घडीच विस्कटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 19:18 IST

जून ते २० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी भागातील सव्वालाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या होत्या. माळरानावरील ज्वारी, बाजारी, कडधान्य पीक वाळून गेले होते.

ठळक मुद्दे दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्याचे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अशोक डोंबाळे ।सांगली : दुष्काळी भागात जून, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे सव्वालाख हेक्टर क्षेत्रातील काही पिके वाळून गेली. त्यातच वारणा, कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना महापुराने घेरल्यामुळे ६६ हजार ६९ हेक्टरवरील पिके वाया गेली असून, दोन हजार कोटी रुपयांचा त्यांना फटका बसला आहे. पूर, तसेच दुष्काळामुळे जिल्ह्याची आर्थिक घडीच विस्कटली आहे.

जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, कडेगाव या तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप, रब्बी हंगाम वाया गेले. मान्सूनपूर्व आणि मान्सूनचे पाऊस झाले नाहीत. याचा खरीप पेरणीवर परिणाम झाला होता. किरकोळ पावसावरच जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर खरीप क्षेत्रापैकी दोन लाख ८६ हजार १२२ हेक्टरवर पेरणी झाली होती. जून ते २० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी भागातील सव्वालाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या होत्या. माळरानावरील ज्वारी, बाजारी, कडधान्य पीक वाळून गेले होते.

आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील ७९ गावे व ६१० वाड्या-वस्त्यांवर अजूनही ९६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. खरीप पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब बागा वाळून गेल्या.दुष्काळग्रस्त चारा, पाण्याच्या संघर्षात असतानाच, वारणा, कृष्णा नदीकाठच्या सांगली, मिरज शहरांसह ११६ गावांना महापुराने वेढा टाकला. मिरज पश्चिम, पलूस, वाळवा, शिराळा या तालुक्यांना महापुराचा फटका बसला. कडेगाव तालुक्यात पुरापेक्षा अतिवृष्टीचे नुकसान जास्त होते. जनावरे पुरात वाहून गेली, तर काही दावणीलाच तडफडून मृत्युमुखी पडली. तीन लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. ६६ हजार ६९ हेक्टरवरील पिके महापुरात भुईसपाट झाली. सुमारे दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

बागायत क्षेत्राला हेक्टरी १३५०० रुपये, फळबागांसाठी हेक्टरी १८००० आणि जिरायत शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये भरपाई शेतकºयांच्या पदरी पडणार आहे. हेक्टरी लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना शासनाकडून मिळणा-या मदतीतून शेतातील खराब पिकांची घाणही बाहेर निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

पूर्व भागातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना पश्चिमेकडील शेतकरी महापुराच्या संकटात सापडला आहे. दुष्काळ आणि महापूर या दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्याचे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाची घडीच विस्कटली आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरFarmerशेतकरी