शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

महापूर, दुष्काळामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाची घडीच विस्कटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 19:18 IST

जून ते २० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी भागातील सव्वालाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या होत्या. माळरानावरील ज्वारी, बाजारी, कडधान्य पीक वाळून गेले होते.

ठळक मुद्दे दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्याचे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अशोक डोंबाळे ।सांगली : दुष्काळी भागात जून, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे सव्वालाख हेक्टर क्षेत्रातील काही पिके वाळून गेली. त्यातच वारणा, कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना महापुराने घेरल्यामुळे ६६ हजार ६९ हेक्टरवरील पिके वाया गेली असून, दोन हजार कोटी रुपयांचा त्यांना फटका बसला आहे. पूर, तसेच दुष्काळामुळे जिल्ह्याची आर्थिक घडीच विस्कटली आहे.

जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, कडेगाव या तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप, रब्बी हंगाम वाया गेले. मान्सूनपूर्व आणि मान्सूनचे पाऊस झाले नाहीत. याचा खरीप पेरणीवर परिणाम झाला होता. किरकोळ पावसावरच जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर खरीप क्षेत्रापैकी दोन लाख ८६ हजार १२२ हेक्टरवर पेरणी झाली होती. जून ते २० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी भागातील सव्वालाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या होत्या. माळरानावरील ज्वारी, बाजारी, कडधान्य पीक वाळून गेले होते.

आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील ७९ गावे व ६१० वाड्या-वस्त्यांवर अजूनही ९६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. खरीप पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब बागा वाळून गेल्या.दुष्काळग्रस्त चारा, पाण्याच्या संघर्षात असतानाच, वारणा, कृष्णा नदीकाठच्या सांगली, मिरज शहरांसह ११६ गावांना महापुराने वेढा टाकला. मिरज पश्चिम, पलूस, वाळवा, शिराळा या तालुक्यांना महापुराचा फटका बसला. कडेगाव तालुक्यात पुरापेक्षा अतिवृष्टीचे नुकसान जास्त होते. जनावरे पुरात वाहून गेली, तर काही दावणीलाच तडफडून मृत्युमुखी पडली. तीन लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. ६६ हजार ६९ हेक्टरवरील पिके महापुरात भुईसपाट झाली. सुमारे दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

बागायत क्षेत्राला हेक्टरी १३५०० रुपये, फळबागांसाठी हेक्टरी १८००० आणि जिरायत शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये भरपाई शेतकºयांच्या पदरी पडणार आहे. हेक्टरी लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना शासनाकडून मिळणा-या मदतीतून शेतातील खराब पिकांची घाणही बाहेर निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

पूर्व भागातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना पश्चिमेकडील शेतकरी महापुराच्या संकटात सापडला आहे. दुष्काळ आणि महापूर या दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्याचे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाची घडीच विस्कटली आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरFarmerशेतकरी