शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

विधानसभेसाठी महाडिक बंधूंना भाजपच्या दोन मंत्र्यांचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:31 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठनाक्यावरील राहुल आणि सम्राट या महाडिक बंधूंना चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे या भाजपच्या दोन मंत्र्यांनी ताकद देण्याचा मानस जाहीर केला आहे. तलवार देऊन नेत्यांचा सत्कार

ठळक मुद्देतलवार धारदार होणार का? : उमेदवारीकडे लागले सर्वांचे लक्ष

अशोक पाटील ।इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठनाक्यावरील राहुल आणि सम्राट या महाडिक बंधूंना चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे या भाजपच्या दोन मंत्र्यांनी ताकद देण्याचा मानस जाहीर केला आहे. तलवार देऊन नेत्यांचा सत्कार करणाऱ्या महाडिक गटाची तलवार धारदार करण्यासाठी भाजपने पावले उचलली आहेत. त्यामुळे महाडिक यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिवंगत नेते नानासाहेब महाडिक यांनी वसंतदादा पाटील आणि त्यांचे नातू प्रतीक पाटील, राजारामबापू पाटील आणि त्यांचे पुत्र जयंत पाटील, पतंगराव कदम आणि त्यांचे पुत्र विश्वजित कदम, नारायण राणे आणि त्यांची मुले नीलेश व नीतेश यांच्यासह काँग्रेस-राष्टÑवादीमधील दिग्गज नेत्यांचा त्या-त्यावेळी पेठनाक्यावर तलवार देऊन सत्कार केला होता. त्यावेळी या नेत्यांनी नानासाहेब महाडिक यांना आमदारकीची स्वप्ने दाखवली, पण ती स्वप्ने प्रत्यक्षात कधीच उतरली नाहीत. काँग्रेस-राष्टÑवादीने कोणतीच आश्वासने पाळली नसल्याने महाडिक यांना स्थानिक स्वराज्य संस्था गटामधून विधानपरिषदेसाठी दोनवेळा बंडखोरी करावी लागली. तेव्हापासून नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या राहुल व सम्राट या दोन्ही पुत्रांनी सर्वच पक्षांना समान अंतरावर ठेवून गटाची बांधणी केली.

हा गट वाळवा-शिराळा तालुक्यात प्रभावशाली आहे. काँग्रेसनंतर राज्यातील युती सरकारने पाच वर्षे महाडिक गटाला खेळवत ठेवले. त्यामुळे सम्राट यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाशी जवळीक वाढवली, मात्र कोल्हापूर येथील महाडिक कुटुंबियांच्या राजकीय भूमिकेचा परिणाम पेठनाक्यावरील महाडिक गटाच्या वाटचालीवर झाला. त्यामुळे महाडिक बंधू आता भाजपमधील महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क ठेवून आहेत.

राहुल यांनी तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क वाढवला आहे. या सर्व नेत्यांचा पेठनाक्यावर तलवार देऊन सत्कार करण्यात आला आहे. आता नव्याने झालेले भाजपचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांचाही सत्कार करण्यात आला. त्यावेळी खाडे यांनी, महाडिक बंधूंना ताकद देऊ, असे जाहीर केले.

या सर्वच नेत्यांनी त्या-त्यावेळी दिलेली आश्वासने वाळवा आणि शिराळा तालुक्यात चर्चेला आली आहेत. ती विधानसभा निवडणुकीवेळी पाळली जाणार, की हवेत विरली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पेठनाक्यावर आलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याचा यथायोग्य सत्कार करणे, ही परंपरा नानासाहेब महाडिक यांनी सुरू केली. नंतर ती जपलीही. तीच परंपरा आम्ही आगामी काळातही जपणार आहोत.- राहुल महाडिक, सचिव, नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली