शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

अनुदानित बियाणांसाठी जिल्ह्यात तीन हजार अर्जांतून १३१३ शेतकऱ्यांना लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:20 IST

सांगली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या बियाणांसाठी व प्रात्यक्षिकासाठी केलेल्या अर्जांपैकी निम्म्याहून कमीजणांना त्याचा लाभ ...

सांगली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या बियाणांसाठी व प्रात्यक्षिकासाठी केलेल्या अर्जांपैकी निम्म्याहून कमीजणांना त्याचा लाभ मिळाला आहे. कृषिविषयक योजनांचा लाभ एकाच संकेतस्थळावरून मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात २९५२ जणांनी अर्ज केले, तर त्यातील १३१३ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.

सवलतीच्या दरात सोयाबीन, मुगासह इतर कडधान्य मिळण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर एकात्मिक संगणक प्रणालीद्वारे बियाणे घटकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. याची सोडत नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिके या दोन घटकांसाठी अर्ज दाखल झाले होते. यानुसार मदत करण्यात आली आहे. एकूण २९५१ जणांनी अर्ज केले. त्यात प्रमाणित बियाणांसाठी १०८०, तर प्रात्यक्षिकांसाठी २३३ जणांची लॉटरीमध्ये निवड झाली आहे. यात जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा अधिक समावेश आहे.

चौकट

अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज : २९५१

लॉटरी किती जणांना : १३१३

चौकट

अनुदानावर मिळणार बियाणे

शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुुदानावर बियाणांची उपलब्धता व्हावी व त्यांना खरेदी करणेे सोयीचे व्हावे यासाठी ही प्रणाली राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठीही याचा उपयोग होत आहे.

चौकट

बियाणांसाठी तालुकानिहाय अर्ज व लाभार्थी...

मिरज ३१० १२२

वाळवा १३७ २७०

शिराळा ५ ७

तासगाव १४६ २७८

कडेगाव १९ ११६

विटा २४ ४१

पलूस ६ ४७

आटपाडी ८४ १२०

जत ५०८ १२६६

कवठेमहांकाळ २६२ ४९६

चौकट

महागडे बियाणे कसे परवडणार?

कोट

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे मिळणार, यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, अर्ज करूनही यादीत नाव आले नाही. बाजारपेठेत बियाणांचे दर जादा असल्याने पोर्टलवर नोंदणीनंतर बियाणे मिळतील, अशी अपेक्षा होती.

- जयवंत खोत, शेतकरी

कोट

आमचे वर्षभरात खरीप हंगामावरच नियोजन असते. पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर बियाणे कमी दराने मिळतील अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार अर्ज केला. मात्र, नंबर आला नाही. शासनाने लाभार्थी निवड संख्येत वाढ करावी, जेणेकरून अधिकजणांना लाभ मिळेल.

- किरण ढोले, शेतकरी

कोट

पोर्टलवरील नोंदणीत बियाणे मिळाले नसल्याने आता विकतच्या बियाणांचा अथवा घरातील साठवून ठेवलेल्या बियाणांचा वापर करावा लागणार आहे. शासनाने कोटा वाढवून द्यावा.

- उदय पाटील, शेतकरी