शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

शिराळा तालुक्यात वादळाच्या तडाख्याने लाखोंचे नुकसान-पंचनाम्यांबाबत उदासीनता-आंबे गळून पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:14 IST

शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले

ठळक मुद्दे प्रशासनाकडून  नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची शेतकºयांकडून मागणी 

शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेला २४ तास उलटून गेले तरी पंचनामे केले नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. पंचनामे लवकर करावेत, अशी मागणी आंबा -झेंडू बागायतदार शेतकºयांनी केली आहे.

कापरी (ता. शिराळा) येथील आनंदा शंकर पाटील, विलास जगन्नाथ पाटील, जयसिंग केशव पाटील या तिघांची चार एकर आंबा बाग, तर रिळे (ता. शिराळा) येथील महादेव मारूती मस्के तीन एकर, रामचंद्र ईश्वरा पाटील यांची दीड एकर, लक्ष्मण बंडू पाटील यांची साडेपाच एकर, तुकाराम चंद्रू पाटील यांची एक एकर, बाळू चंद्रू पाटील यांची एक एकर, बळीराम नामदेव कुंभार यांची एक एकर, राजाराम पांडुरंग पाटील, वसंत ज्ञानू पाटील व खेड (ता. शिराळा) येथील दगडू शंकर नाईक, भास्कर निवृत्ती पाटील, विष्णू नाना पाटील, रंगराव नाना पाटील, शंकर नाना पाटील, पंडित पांडुरंग पाटील, मानसिंग पांडुरंग पाटील, शिराळा येथील फिरोज गौस मुल्ला व भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील पांडुरंग तुकाराम माने यांची ३० गुंठे आदींसह शेतकºयांच्या जवळपास ३० एकरामधील आंब्याचे नुकसान झाले. 

खेड (ता. शिराळा) येथील महादेव तुकाराम माळी यांच्या तोड चालू झालेल्या काकडीच्या जवळपास दीड एकरातील शेतीतील काकडीचे वेल गारांमुळे तुटल्याने दीड लाखाचे, तर अशोक आत्माराम माळी यांच्या एक एकरातील झेंडूच्या बागेचे जवळपास एक लाखाचे, आबासाहेब शंकर खबाले व विकास वसंत खबाले यांच्या काढावयास आलेल्या मका पिकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर येथील जयसिंग बाळू माळी यांच्या घराचा पत्रा उडून गेल्याने जवळपास ४० हजाराचे, तर बिऊर (ता. शिराळा) येथील गणपती मारुती पाटील यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्यामुळे व सिमेंटचा पत्रा फुटल्यामुळे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने याचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीkonkanकोकण