शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची नुकसानी; पीक विमा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:32 IST

गेल्या आठवडाभरात पावसाने सुमारे दोन हजार कोटींचे द्राक्षबागांचे नुकसान होऊनदेखील, या अटींमुळे द्राक्षबागायतदारांना कोणताच फायदा होणार नाही. त्यामुळे कोट्यवधींची नुकसानी आणि पीक विमा कुचकामी, अशी अवस्था आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची नुकसानी; पीक विमा कुचकामीविमा योजना चारमाही कालावधीऐवजी बारमाही कालावधीसाठी लागू करा

दत्ता पाटील तासगाव : शासनाकडून मोठा गाजावाजा करत हवामानआधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली. मात्र जाचक अटींमुळे नुकसान होऊनही द्राक्षबागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नाही. ३१ आॅक्टोबरला शासनाने आदेश काढून चालू हंगामासाठी विमा योजना लागू केली आहे. त्यानुसार ८ नोव्हेंबरपासून द्राक्षबागांना विमा संरक्षण लागू होणार आहे.

गेल्या आठवडाभरात पावसाने सुमारे दोन हजार कोटींचे द्राक्षबागांचे नुकसान होऊनदेखील, या अटींमुळे द्राक्षबागायतदारांना कोणताच फायदा होणार नाही. त्यामुळे कोट्यवधींची नुकसानी आणि पीक विमा कुचकामी, अशी अवस्था आहे.सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे, द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या सुमारे ६० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा फटका बसला आहे. या पावसात बहुतांश द्राक्षबागांतील द्राक्ष उत्पादनात घट होणार आहे.अनेक द्राक्षबागा पूर्णपणे नुकसान झालेल्या आहेत. सुमारे एक एकर द्राक्षबागेसाठी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा घातलेला खर्च वाया गेला आहे, तर या बागेतून सरासरी चार लाख रुपयांचे उत्पन्नही गमवावे लागणार आहे.जिल्ह्यात द्राक्षबागांच्या पीक छाटणीचा हंगाम सप्टेंबरपासून सुरु होतो. केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना हवामानातील धोक्यांपासून नुकसान होते. या नुकसानीत शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी राज्य आणि केंद्र्र शासनाने हवामानआधारित फळ पीक विमा योजना सुरु केली आहे. प्रत्येकवर्षी शासन आदेश काढून या विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.यावर्षी ३१ आॅक्टोबरला शासन आदेश काढून विमा योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार द्राक्षांसाठी ८ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीसाठी अवेळी पाऊस, १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीसाठी दैनंदिन कमी तापमानातून होणाऱ्या नुकसानीसाठी एकरी ३ लाख ८ हजार रुपयांची विमासंरक्षित रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तसेच १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीसाठी गारपीट नुकसानीसाठी १ लाख २ हजार ६६७ रुपयांची संरक्षित रक्कम मंजूर करण्यात आली आहे.या विमा योजनेत बहुतांश द्राक्षबागायतदार सहभाग घेत आहेत. मात्र विमा संरक्षण लागू करण्याच्या तारखेच्या खेळामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळणार नाही. अनेक वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून विमा योजना चारमाही कालावधीऐवजी बारमाही कालावधीसाठी लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र या मागणीला शासनाकडून नेहमीच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार कंगाल आणि विमा कंपन्या मालामाल, असेच चित्र असून विमा भरूनही द्राक्षबागायतदारांसाठी विमा योजना कुचकामी ठरत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाSangliसांगली