शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पालिकेचा करवाढीस खो

By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST

‘जैसे थे’ परिस्थिती : जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुदतवाढ--खेळखंडोबा तासगावचा-३

दत्ता पाटील - तासगाव -कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र तासगाव नगरपालिकेने तीन वर्षांनंतर आवश्यक असणारी करवाढच केल्याचे दिसून येत नाही. विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वर्षभरासाठी करवाढीला मुदतवाढ देता येऊ शकते. परंतु त्यासाठी परवानगी घेतल्याचेही दिसून येत नाही. कारभाऱ्यांचा हा कमालीचा गाफीलपणा आणि प्रशासनाचा दिरंगाईचा कारभार यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नवाढीच्या मुख्य स्रोताकडेच साफ दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे मात्र निधीअभावी अनेक योजना ठप्प असल्याचेही चित्र दिसून येत आहे.घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्न मिळत आहे. कराच्या माध्यमातून वर्षाला दीड कोटीपर्यंत उत्पन्न मिळत आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली झाल्यास यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मात्र या वसुलीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली होत असल्या तरी, लोकप्रतिनिधींकडून मात्र कर वसुलीसाठी कधीच गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्याचा फटका नगरपरिषदेच्या उत्पन्नवाढीला बसला आहे. प्रत्येक तीन वर्र्षांनी कर आकारणीत बदल करुन दहा टक्के करवाढ करण्यात यावी, असा नियम आहे. काही अपवादात्मक प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने एक वर्षासाठी करवाढीसाठी मुदतवाढ घेता येऊ शकते. परंतु नगरपालिकेकडून २०१०-११ मध्ये करवाढ केल्यानंतर आजअखेर करवाढ केल्याचे दिसून येत नाही. तीन वर्षे झाल्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे एक वर्षासाठी मुदतवाढ घेण्याचा ठराव करण्यात आला. मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. एकूणच नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत्र असणाऱ्या कर आकारणी आणि वसुलीकडेच साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.वर्ष घरपट्टी (लाखात) वसुलीची टक्केवारी२०१०-११ ५१.४२ ७२.४१२०११-१२ ६२.४९ ८६.८४२०१२-१३ ५३.६२ ६४.९७२०१३-१४ ६७.६० ७१.४१२०१४-१५ ८०.५७ ८०.८७चार विभाग, एक अभियंता नगरपालिकेला चार विभागांसाठी चार अभियंत्यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या नगररचना, पाणी पुरवठा, ई - गव्हर्नन्स आणि सार्वजनिक बांधकाम अशा चारही विभागांचा कार्यभार एका अभियंत्याकडे आहे. त्यामुळे शहरात नव्याने तयार होणाऱ्या मालमत्ता आणि त्यातून मिळणाऱ्या नोंदी याकडे लक्ष केंद्रित करणे अशक्य होत आहे. त्याचाही परिणाम उत्पन्नवाढीवर होत आहे.