शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 निवडणुकीच्या मैदानातच सिंचन योजनांची आठवण -- मुद्दे पे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:03 IST

लोकसभा निवडणुका आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना शेतकरी आणि सिंचन योजनांची आठवण होते. ताकारी-म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक योजना २५ ते ३५ वर्षांपासून अपूर्णच आहेत. या चारही योजनांवर ५३१८ कोटी ५६ लाख रुपये खर्च होऊनही

ठळक मुद्देपंचवीस वर्षांत कामे अपूर्णच तब्बल ५३१८ कोटींत केवळ ३२६०० हेक्टर सिंचन

सांगली : लोकसभा निवडणुका आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना शेतकरी आणि सिंचन योजनांची आठवण होते. ताकारी-म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक योजना २५ ते ३५ वर्षांपासून अपूर्णच आहेत. या चारही योजनांवर ५३१८ कोटी ५६ लाख रुपये खर्च होऊनही, केवळ ३५ हजार हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळाले आहे. उर्वरित दोन लाख हेक्टर क्षेत्राला पाणी केव्हा मिळेल, हे कोणताच नेता छातीठोकपणे सांगू शकत नाही.

ताकारी-म्हैसाळ योजनांचे भूमिपूजन २० मे १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याहस्ते आणि यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्यावेळी ८३ कोटी ४३ लाख खर्च अपेक्षित आहे, असे जाहीर केले होते. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने या योजनेच्या सुधारित प्रस्तावास ७ मे १९९७ रोजी पुन्हा मान्यता दिली. त्यावेळी या योजनेचा खर्च ४०२ कोटी ७ लाख रुपयांवर जाऊन पोहोचला होता. गेल्या बावीस वर्षात खर्चात वाढ होऊन सुधारित खर्चाचा आकडा ४९५९ कोटी ९१ लाखापर्यंत पोहोचला आहे. याप्रमाणेच अन्य योजनांचीही अवस्था आहे.सिंचन योजनांचा लेखाजोखा...योजना मंजुरी मूळ किंमत सुधारित खर्च आतापर्यंत खर्चटेंभू १९९५ १४१६.५९ कोटी ४०८१.९४ कोटी २३४८.८४ कोटीवाकुर्डे १९९८ १०९.६८ कोटी ३३२ कोटी १८३.१५ कोटीताकारी १९८२ १९८२.८१ कोटी ४९५९.९१ कोटी २७८६.७२ कोटी -म्हैसाळतज्ज्ञांना काय अपेक्षित आहे1 शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी पोहोचविण्याची कोणतीही व्यवस्था पाटबंधारे विभागाकडे आजही उपलब्ध नाही. थेट पाणी देण्याची व्यवस्था करा.2 टेंभू, वाकुर्डे बुद्रुक, ताकारी आणि म्हैसाळ योजनेची एकही वितरिका पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपद्वारेच पाणी देण्याची गरज आहे.3 कडेगाव, खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांतील एक लाख १७ हजार हेक्टर जमिनीला पाणी द्यायचे आहे. ते त्वरित द्यावे.पंधरा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली1 मुख्य कालव्याचीच कामे झाली आहेत. १९९५ मध्ये टेंभू योजनेचे भूमिपूजन झाले. यावेळी १४१६ कोटी ५९ लाख खर्च अपेक्षित होता.2 गेल्या पंचवीस वर्षांत योजनेचा खर्च दुपटीहून अधिक वाढून ४०८१ कोटींपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत २३४८ कोटी ८४ लाख खर्च झाला असून, पंधरा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दावा केला आहे.3 प्रत्यक्षात अजून सुमारे ७० हजार हेक्टर शेतीला पाणीच मिळाले नाही.35% सिंचन योजना सुरु आहेत. मुख्य कालव्याची ८० टक्के कामे झाली आहेत. उर्वरित कामे अनेक वर्षापासून अपूर्ण आहेत.१८३ कोटी खर्चवाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेचा सुधारित खर्च ३३२ कोटींवर गेला असून, १८३ कोटी खर्च झाला आहे.

 

सिंचन योजनांमधून जून ते सप्टेंबर या कालावधित दुष्काळी भागातील तलाव भरून दिले पाहिजेत. दुष्काळग्रस्तांच्या उपाययोजनांवरील कोट्यवधी रुपयांचे सरकारचे पैसे वाचण्यास मदत होईल. चाळीस वर्षांत सिंचन योजना पूर्ण होत नाहीत, याला राजकर्त्यांचे व्हिजन म्हणायचे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.- संपतराव पवार,सामाजिक कार्यकर्ते.दुष्काळग्रस्तांचा कायमचा दुष्काळ हटावा, अशी मानसिकताच नाही. भाजप सरकारने मागील पाच वर्षांत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांची केवळ ५ टक्केच कामे केली आहेत. २०१४ पूर्वीच बहुतांशी कामे झाली असून, त्या माध्यमातूनच पाणी सोडले जात आहे. शंभर टक्के बंद पाईपद्वारे पाणी दिले तरच, दुष्काळग्रस्तांचा दुष्काळ हटणार आहे,- डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल.

टॅग्स :sangli-pcसांगलीPoliticsराजकारण