शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 निवडणुकीच्या मैदानातच सिंचन योजनांची आठवण -- मुद्दे पे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:03 IST

लोकसभा निवडणुका आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना शेतकरी आणि सिंचन योजनांची आठवण होते. ताकारी-म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक योजना २५ ते ३५ वर्षांपासून अपूर्णच आहेत. या चारही योजनांवर ५३१८ कोटी ५६ लाख रुपये खर्च होऊनही

ठळक मुद्देपंचवीस वर्षांत कामे अपूर्णच तब्बल ५३१८ कोटींत केवळ ३२६०० हेक्टर सिंचन

सांगली : लोकसभा निवडणुका आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना शेतकरी आणि सिंचन योजनांची आठवण होते. ताकारी-म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक योजना २५ ते ३५ वर्षांपासून अपूर्णच आहेत. या चारही योजनांवर ५३१८ कोटी ५६ लाख रुपये खर्च होऊनही, केवळ ३५ हजार हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळाले आहे. उर्वरित दोन लाख हेक्टर क्षेत्राला पाणी केव्हा मिळेल, हे कोणताच नेता छातीठोकपणे सांगू शकत नाही.

ताकारी-म्हैसाळ योजनांचे भूमिपूजन २० मे १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याहस्ते आणि यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्यावेळी ८३ कोटी ४३ लाख खर्च अपेक्षित आहे, असे जाहीर केले होते. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने या योजनेच्या सुधारित प्रस्तावास ७ मे १९९७ रोजी पुन्हा मान्यता दिली. त्यावेळी या योजनेचा खर्च ४०२ कोटी ७ लाख रुपयांवर जाऊन पोहोचला होता. गेल्या बावीस वर्षात खर्चात वाढ होऊन सुधारित खर्चाचा आकडा ४९५९ कोटी ९१ लाखापर्यंत पोहोचला आहे. याप्रमाणेच अन्य योजनांचीही अवस्था आहे.सिंचन योजनांचा लेखाजोखा...योजना मंजुरी मूळ किंमत सुधारित खर्च आतापर्यंत खर्चटेंभू १९९५ १४१६.५९ कोटी ४०८१.९४ कोटी २३४८.८४ कोटीवाकुर्डे १९९८ १०९.६८ कोटी ३३२ कोटी १८३.१५ कोटीताकारी १९८२ १९८२.८१ कोटी ४९५९.९१ कोटी २७८६.७२ कोटी -म्हैसाळतज्ज्ञांना काय अपेक्षित आहे1 शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी पोहोचविण्याची कोणतीही व्यवस्था पाटबंधारे विभागाकडे आजही उपलब्ध नाही. थेट पाणी देण्याची व्यवस्था करा.2 टेंभू, वाकुर्डे बुद्रुक, ताकारी आणि म्हैसाळ योजनेची एकही वितरिका पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपद्वारेच पाणी देण्याची गरज आहे.3 कडेगाव, खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांतील एक लाख १७ हजार हेक्टर जमिनीला पाणी द्यायचे आहे. ते त्वरित द्यावे.पंधरा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली1 मुख्य कालव्याचीच कामे झाली आहेत. १९९५ मध्ये टेंभू योजनेचे भूमिपूजन झाले. यावेळी १४१६ कोटी ५९ लाख खर्च अपेक्षित होता.2 गेल्या पंचवीस वर्षांत योजनेचा खर्च दुपटीहून अधिक वाढून ४०८१ कोटींपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत २३४८ कोटी ८४ लाख खर्च झाला असून, पंधरा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दावा केला आहे.3 प्रत्यक्षात अजून सुमारे ७० हजार हेक्टर शेतीला पाणीच मिळाले नाही.35% सिंचन योजना सुरु आहेत. मुख्य कालव्याची ८० टक्के कामे झाली आहेत. उर्वरित कामे अनेक वर्षापासून अपूर्ण आहेत.१८३ कोटी खर्चवाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेचा सुधारित खर्च ३३२ कोटींवर गेला असून, १८३ कोटी खर्च झाला आहे.

 

सिंचन योजनांमधून जून ते सप्टेंबर या कालावधित दुष्काळी भागातील तलाव भरून दिले पाहिजेत. दुष्काळग्रस्तांच्या उपाययोजनांवरील कोट्यवधी रुपयांचे सरकारचे पैसे वाचण्यास मदत होईल. चाळीस वर्षांत सिंचन योजना पूर्ण होत नाहीत, याला राजकर्त्यांचे व्हिजन म्हणायचे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.- संपतराव पवार,सामाजिक कार्यकर्ते.दुष्काळग्रस्तांचा कायमचा दुष्काळ हटावा, अशी मानसिकताच नाही. भाजप सरकारने मागील पाच वर्षांत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांची केवळ ५ टक्केच कामे केली आहेत. २०१४ पूर्वीच बहुतांशी कामे झाली असून, त्या माध्यमातूनच पाणी सोडले जात आहे. शंभर टक्के बंद पाईपद्वारे पाणी दिले तरच, दुष्काळग्रस्तांचा दुष्काळ हटणार आहे,- डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल.

टॅग्स :sangli-pcसांगलीPoliticsराजकारण