शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

लोकसभेला खासदारांना नव्हे, भाजपला पाठिंबा! : अनिल बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:46 IST

लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली.

ठळक मुद्देभाजपमुळे ‘टेंभू’चा प्रश्न मार्गी लागलायापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील,

तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या मतदारसंघातील टेंभूचा पाणीप्रश्न मार्गी लागला असल्यानेच भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तासगाव तालुक्यातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार बाबर गुरुवारी तासगाव पंचायत समितीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मी भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण ही भूमिका खासदार संजयकाकांसाठी म्हणून नाही. भाजपकडून खासदारांसह कोणीही उमेदवार असला तरी, त्या उमेदवारास मी पाठिंबा देणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील, तर त्यांना माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेची अट न ठेवता लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.

ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीकडून अध्यक्षपदाची ‘आॅफर’ होती. मात्र मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लावला. खानापूर, आटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. काही गावांचा प्रश्न बाकी आहे, तोही लवकरच मार्गी लागेल. त्यामुळेच लोकसभेबाबत मी राज्यात भाजप-सेनेची युती झाली किंवा नाही झाली तरीदेखील, भाजप उमेदवारास पाठिंबा देणार आहे.काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळयापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळ आली. निवडून आल्यानंतर त्यांनी साधी भेटदेखील घेतली नव्हती, अशी टीकाही यावेळी आ. बाबर यांनी केली.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPoliticsराजकारण