शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

लोकसभेला खासदारांना नव्हे, भाजपला पाठिंबा! : अनिल बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:46 IST

लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली.

ठळक मुद्देभाजपमुळे ‘टेंभू’चा प्रश्न मार्गी लागलायापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील,

तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या मतदारसंघातील टेंभूचा पाणीप्रश्न मार्गी लागला असल्यानेच भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तासगाव तालुक्यातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार बाबर गुरुवारी तासगाव पंचायत समितीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मी भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण ही भूमिका खासदार संजयकाकांसाठी म्हणून नाही. भाजपकडून खासदारांसह कोणीही उमेदवार असला तरी, त्या उमेदवारास मी पाठिंबा देणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील, तर त्यांना माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेची अट न ठेवता लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.

ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीकडून अध्यक्षपदाची ‘आॅफर’ होती. मात्र मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लावला. खानापूर, आटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. काही गावांचा प्रश्न बाकी आहे, तोही लवकरच मार्गी लागेल. त्यामुळेच लोकसभेबाबत मी राज्यात भाजप-सेनेची युती झाली किंवा नाही झाली तरीदेखील, भाजप उमेदवारास पाठिंबा देणार आहे.काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळयापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळ आली. निवडून आल्यानंतर त्यांनी साधी भेटदेखील घेतली नव्हती, अशी टीकाही यावेळी आ. बाबर यांनी केली.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPoliticsराजकारण