शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

प्रसारभारतीने दाबला ‘सांगली आकाशवाणी’चा आवाज, स्थानिक कार्यक्रम केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:48 IST

नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना सर्वाधिक झळ बसणार

श्रीनिवास नागे

सांगली : आकाशवाणीच्या सांगलीसह प्रमुख सात केंद्रांवरील सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेतील स्थानिक कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यास मंगळवारी प्रारंभ झाला. सव्वाचार तासांसाठी स्थानिक कार्यक्रम बंद करून ‘सांगली आकाशवाणी’चा आवाजच प्रसारभारतीने दाबला आहे. नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना याची सर्वाधिक झळ बसणार आहे.

‘एक राज्य, एक आकाशवाणी केंद्र’ असे धोरण प्रसारभारतीने स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, जळगाव, रत्नागिरी, नागपूर या प्रमुख केंद्रांवर सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेत मुंबई केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रमच सहक्षेपित (रिले) होणार आहेत. तसे आदेश अतिरिक्त महानिदेशकांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी काढले आहेत.

आकाशवाणी हे लोकरंजन आणि लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात आकाशवाणीची २८ जिल्हा केंद्रे आणि वाहिन्या (प्रायमरी चॅनेल्स) आहेत. त्यावरून स्थानिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण होते. स्थानिक घटना, समस्या, लोककला-संस्कृतीचा विचार करून या कार्यक्रमांची निर्मिती होते. त्यातून स्थानिक उद्घोषक-निवेदक आणि कलावंतांना संधी मिळते. संस्कृतीचे प्रादेशिक वैविध्यही जपले जाते.

पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारा मोठा श्रोतृवर्ग आहे. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण अधिक आहे. नाटिका, शेती, लोकशिक्षण आणि कामगारविषयक संवादिका, सामाजिक-कौटुंबिक श्रुतिका, अभिवाचन, बातम्या, संगीत-मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या ‘सांगली आकाशवाणी’ राज्यात अग्रेसर ठरली. आता प्रसारभारतीच्या धोरणामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सव्वाचार तास तास, तर नंतर टप्प्याटप्प्याने दिवसभरातील सर्वच स्थानिक कार्यक्रम बंद होतील.त्याऐवजी राज्यातील एकाच प्रमुख (मुंबई) केंद्रावरील कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. याचा सर्वात मोठा फटका नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना बसणार आहे. नैमित्तिक उद्घोषकांना तीनऐवजी दोनच पाळ्यांमध्ये काम मिळेल. स्थानिक कलाकारांना संधी मिळणार नाही.

धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगलीसाठी आकाशवाणी केंद्र मंजूर करून आणले. ६ ऑक्टोबर १९६३ रोजी या केंद्रावरून प्रक्षेपण सुरू झाले. नाट्यपंढरीतील या केंद्राने प्रचंड लोकप्रियता मिळवली. कल्पक अधिकारी, हरहुन्नरी स्थानिक कलावंत, आवाजावर हुकूमत असणारे उद्घोषक-निवेदक, कार्यक्रमांतील वैविध्य यामुळे सर्वदूर महती पोहोचली. मात्र प्रसारभारतीच्या धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव यामुळे सांगली केंद्राच्या सुस्पष्ट ‘आवाजा’ला खरखर लागली...

टॅग्स :Sangliसांगली