शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

प्रसारभारतीने दाबला ‘सांगली आकाशवाणी’चा आवाज, स्थानिक कार्यक्रम केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:48 IST

नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना सर्वाधिक झळ बसणार

श्रीनिवास नागे

सांगली : आकाशवाणीच्या सांगलीसह प्रमुख सात केंद्रांवरील सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेतील स्थानिक कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यास मंगळवारी प्रारंभ झाला. सव्वाचार तासांसाठी स्थानिक कार्यक्रम बंद करून ‘सांगली आकाशवाणी’चा आवाजच प्रसारभारतीने दाबला आहे. नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना याची सर्वाधिक झळ बसणार आहे.

‘एक राज्य, एक आकाशवाणी केंद्र’ असे धोरण प्रसारभारतीने स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, जळगाव, रत्नागिरी, नागपूर या प्रमुख केंद्रांवर सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेत मुंबई केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रमच सहक्षेपित (रिले) होणार आहेत. तसे आदेश अतिरिक्त महानिदेशकांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी काढले आहेत.

आकाशवाणी हे लोकरंजन आणि लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात आकाशवाणीची २८ जिल्हा केंद्रे आणि वाहिन्या (प्रायमरी चॅनेल्स) आहेत. त्यावरून स्थानिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण होते. स्थानिक घटना, समस्या, लोककला-संस्कृतीचा विचार करून या कार्यक्रमांची निर्मिती होते. त्यातून स्थानिक उद्घोषक-निवेदक आणि कलावंतांना संधी मिळते. संस्कृतीचे प्रादेशिक वैविध्यही जपले जाते.

पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारा मोठा श्रोतृवर्ग आहे. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण अधिक आहे. नाटिका, शेती, लोकशिक्षण आणि कामगारविषयक संवादिका, सामाजिक-कौटुंबिक श्रुतिका, अभिवाचन, बातम्या, संगीत-मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या ‘सांगली आकाशवाणी’ राज्यात अग्रेसर ठरली. आता प्रसारभारतीच्या धोरणामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सव्वाचार तास तास, तर नंतर टप्प्याटप्प्याने दिवसभरातील सर्वच स्थानिक कार्यक्रम बंद होतील.त्याऐवजी राज्यातील एकाच प्रमुख (मुंबई) केंद्रावरील कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. याचा सर्वात मोठा फटका नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना बसणार आहे. नैमित्तिक उद्घोषकांना तीनऐवजी दोनच पाळ्यांमध्ये काम मिळेल. स्थानिक कलाकारांना संधी मिळणार नाही.

धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगलीसाठी आकाशवाणी केंद्र मंजूर करून आणले. ६ ऑक्टोबर १९६३ रोजी या केंद्रावरून प्रक्षेपण सुरू झाले. नाट्यपंढरीतील या केंद्राने प्रचंड लोकप्रियता मिळवली. कल्पक अधिकारी, हरहुन्नरी स्थानिक कलावंत, आवाजावर हुकूमत असणारे उद्घोषक-निवेदक, कार्यक्रमांतील वैविध्य यामुळे सर्वदूर महती पोहोचली. मात्र प्रसारभारतीच्या धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव यामुळे सांगली केंद्राच्या सुस्पष्ट ‘आवाजा’ला खरखर लागली...

टॅग्स :Sangliसांगली