शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

दुष्काळग्रस्तांच्या यादीतून कडेगाव तालुका आऊट खरिपाची पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:51 IST

पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घटकडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत

प्रताप महाडिक।डेगाव : पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. शासनाने प्रारंभी दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत तसेच पहिली कळ लागू झालेल्या व त्यानंतर दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचा समावेश केला होता. परंतु बुधवारी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचे नाव नसल्याचे समजताच येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे गावोगावी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे .कडेगाव तालुका आता दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून बाहेर गेला आहे. यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकºयांना मिळणार नाही, यासाठी तातडीने कडेगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.कडेगाव तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक शेतजमीन कोरडवाहू आहे. या शेतजमिनीला ताकारी किंवा टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही.प्रशासनाने २२ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधित ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका व भात या पाच प्रमुख पिकांची कापणी प्रयोग घेण्यात आले. हे प्रयोग कोणत्या शिवारात घेतले, यावर उत्पादकतेचे प्रमाण अवलंबून होते. कडेगाव तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे दुष्काळाच्या छायेतील तालुक्यांमध्ये कडेगाव तालुक्याचा समावेश झाला होता. परतीचा पाऊसही अत्यल्प प्रमाणात झाला आहे. रब्बी हंगामही घोक्यात आहे. कडेगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. कडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.राजकीय : नेत्यांवर भिस्तकडेगाव तालुका दुष्काळसदृश, गंभीर दुष्काळाची पहिली कळ, दुसरी कळ या सर्व याद्यांमध्ये समाविष्ट होता; मात्र शासनाने जाहीर केलेल्या अंतिम यादीतून वगळला. यावर कॉँग्रेस नेते आमदार मोहनराव कदम व आमदार डॉ. विश्वजित कदम संघर्षाची भूमिका घेणार का? भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख स्वपक्षातील नेत्यांकडे तालुक्याची व्यथा मांडणार का? यावर हवालदिल शेतकºयांची भिस्त आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSangliसांगलीFarmerशेतकरी