शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या यादीतून कडेगाव तालुका आऊट खरिपाची पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:51 IST

पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घटकडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत

प्रताप महाडिक।डेगाव : पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. शासनाने प्रारंभी दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत तसेच पहिली कळ लागू झालेल्या व त्यानंतर दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचा समावेश केला होता. परंतु बुधवारी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचे नाव नसल्याचे समजताच येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे गावोगावी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे .कडेगाव तालुका आता दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून बाहेर गेला आहे. यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकºयांना मिळणार नाही, यासाठी तातडीने कडेगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.कडेगाव तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक शेतजमीन कोरडवाहू आहे. या शेतजमिनीला ताकारी किंवा टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही.प्रशासनाने २२ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधित ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका व भात या पाच प्रमुख पिकांची कापणी प्रयोग घेण्यात आले. हे प्रयोग कोणत्या शिवारात घेतले, यावर उत्पादकतेचे प्रमाण अवलंबून होते. कडेगाव तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे दुष्काळाच्या छायेतील तालुक्यांमध्ये कडेगाव तालुक्याचा समावेश झाला होता. परतीचा पाऊसही अत्यल्प प्रमाणात झाला आहे. रब्बी हंगामही घोक्यात आहे. कडेगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. कडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.राजकीय : नेत्यांवर भिस्तकडेगाव तालुका दुष्काळसदृश, गंभीर दुष्काळाची पहिली कळ, दुसरी कळ या सर्व याद्यांमध्ये समाविष्ट होता; मात्र शासनाने जाहीर केलेल्या अंतिम यादीतून वगळला. यावर कॉँग्रेस नेते आमदार मोहनराव कदम व आमदार डॉ. विश्वजित कदम संघर्षाची भूमिका घेणार का? भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख स्वपक्षातील नेत्यांकडे तालुक्याची व्यथा मांडणार का? यावर हवालदिल शेतकºयांची भिस्त आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSangliसांगलीFarmerशेतकरी