शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

दुष्काळग्रस्तांच्या यादीतून कडेगाव तालुका आऊट खरिपाची पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:51 IST

पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घटकडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत

प्रताप महाडिक।डेगाव : पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. शासनाने प्रारंभी दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत तसेच पहिली कळ लागू झालेल्या व त्यानंतर दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचा समावेश केला होता. परंतु बुधवारी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचे नाव नसल्याचे समजताच येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे गावोगावी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे .कडेगाव तालुका आता दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून बाहेर गेला आहे. यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकºयांना मिळणार नाही, यासाठी तातडीने कडेगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.कडेगाव तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक शेतजमीन कोरडवाहू आहे. या शेतजमिनीला ताकारी किंवा टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही.प्रशासनाने २२ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधित ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका व भात या पाच प्रमुख पिकांची कापणी प्रयोग घेण्यात आले. हे प्रयोग कोणत्या शिवारात घेतले, यावर उत्पादकतेचे प्रमाण अवलंबून होते. कडेगाव तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे दुष्काळाच्या छायेतील तालुक्यांमध्ये कडेगाव तालुक्याचा समावेश झाला होता. परतीचा पाऊसही अत्यल्प प्रमाणात झाला आहे. रब्बी हंगामही घोक्यात आहे. कडेगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. कडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.राजकीय : नेत्यांवर भिस्तकडेगाव तालुका दुष्काळसदृश, गंभीर दुष्काळाची पहिली कळ, दुसरी कळ या सर्व याद्यांमध्ये समाविष्ट होता; मात्र शासनाने जाहीर केलेल्या अंतिम यादीतून वगळला. यावर कॉँग्रेस नेते आमदार मोहनराव कदम व आमदार डॉ. विश्वजित कदम संघर्षाची भूमिका घेणार का? भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख स्वपक्षातील नेत्यांकडे तालुक्याची व्यथा मांडणार का? यावर हवालदिल शेतकºयांची भिस्त आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSangliसांगलीFarmerशेतकरी