शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
3
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
4
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
5
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
6
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
7
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
8
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
9
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
10
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
11
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
12
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
13
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
14
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
15
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
16
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
17
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
18
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
19
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
20
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

भ्रष्टाचारमुक्त, राजकारण विरहित कारभार करु : कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:48 IST

पाणी, शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत तीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत.- प्राजक्ता कोरे

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील शाळांत ई-लर्निंग उपक्रमचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

अशोक डोंबाळे ।सांगलीजिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न असफल झाले. अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडीत भाजपने निर्विवाद वर्चस्व ठेवत सत्ता कायम राखली. अध्यक्षपदाची संधी प्राजक्ता कोरे यांना मिळाली. याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : जिल्ह्याच्या विकासासाठी तुमचे व्हिजन काय आहे?उत्तर : पावणेतीन वर्षे जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे कामकाजाची पूर्णपणे माहिती आहे. सामान्य जनतेच्यादृष्टीने शिक्षण, आरोग्य आणि पाणी हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. हेच सोडविण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरु आहेत. शंभर टक्के शाळा ई-लर्निंग करणार असून जिल्हा नियोजनमधून साडेचार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. २००७ पासून शाळांना खेळाचे साहित्यच मिळाले नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची कुचंबणा होत होती. म्हणून स्वीय निधीतून तात्काळ १५ लाखांचे खेळाचे साहित्य देणार आहे. आरोग्य केंद्रामध्येही मूलभूत सुविधा देऊन तेथील आरोग्य सेवा सक्षम करणार आहे. या योजना राबवितांना भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देतांना राजकारणही येऊ देणार नाही.

प्रश्न : शासनाने जिल्हा परिषदेचे अनेक अधिकार कमी करुन पंख छाटले आहेत. निधीची टंचाई आहे, यावर तुम्ही काय करणार आहे?उत्तर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांमार्फत शासनाकडे शिक्षक बदल्यांसह कृषी विभागाच्या योजना पुन्हा जि. प.कडे देण्याची मागणी करणार आहे. जि. प. सभेतही तसा ठराव करुन शासनाकडे पाठविणार आहे. स्वीय निधी वाढविण्यासाठी प्रयत्न असून, वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशीही मागणी शासनाकडे करणार आहे. जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा विकसित करणे, करांची विविध मार्गाने गळती होत असून ती रोखूनही उत्पन्न वाढू शकते. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

  • गुणवत्ता वाढविणार...

जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तेचे शिक्षक असून, गणवेश, पोषण आहारही शासन देत आहे. तरीही येथील पटसंख्या कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. हे कुणासाठीच भूषणावह नाही. यामुळे शिक्षक निश्चितच आम्हाला शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मदत करतील, असेही कोरे यांनी स्पष्ट केले.

 

  • गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र

ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत असूनही त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य पुस्तके उपलब्ध होत नाहीत. काही विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे महागडी पुस्तके खरेदी करता येत नाहीत. म्हणूनच जिल्हा परिषदेतर्फे गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एमपीएससी, युपीएस परीक्षेसाठी लागणारी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी स्वीय निधीतून पैशाची तरतूद करणार आहे, असेही कोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद