शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारमुक्त, राजकारण विरहित कारभार करु : कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:48 IST

पाणी, शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत तीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत.- प्राजक्ता कोरे

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील शाळांत ई-लर्निंग उपक्रमचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

अशोक डोंबाळे ।सांगलीजिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न असफल झाले. अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडीत भाजपने निर्विवाद वर्चस्व ठेवत सत्ता कायम राखली. अध्यक्षपदाची संधी प्राजक्ता कोरे यांना मिळाली. याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : जिल्ह्याच्या विकासासाठी तुमचे व्हिजन काय आहे?उत्तर : पावणेतीन वर्षे जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे कामकाजाची पूर्णपणे माहिती आहे. सामान्य जनतेच्यादृष्टीने शिक्षण, आरोग्य आणि पाणी हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. हेच सोडविण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरु आहेत. शंभर टक्के शाळा ई-लर्निंग करणार असून जिल्हा नियोजनमधून साडेचार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. २००७ पासून शाळांना खेळाचे साहित्यच मिळाले नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची कुचंबणा होत होती. म्हणून स्वीय निधीतून तात्काळ १५ लाखांचे खेळाचे साहित्य देणार आहे. आरोग्य केंद्रामध्येही मूलभूत सुविधा देऊन तेथील आरोग्य सेवा सक्षम करणार आहे. या योजना राबवितांना भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देतांना राजकारणही येऊ देणार नाही.

प्रश्न : शासनाने जिल्हा परिषदेचे अनेक अधिकार कमी करुन पंख छाटले आहेत. निधीची टंचाई आहे, यावर तुम्ही काय करणार आहे?उत्तर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांमार्फत शासनाकडे शिक्षक बदल्यांसह कृषी विभागाच्या योजना पुन्हा जि. प.कडे देण्याची मागणी करणार आहे. जि. प. सभेतही तसा ठराव करुन शासनाकडे पाठविणार आहे. स्वीय निधी वाढविण्यासाठी प्रयत्न असून, वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशीही मागणी शासनाकडे करणार आहे. जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा विकसित करणे, करांची विविध मार्गाने गळती होत असून ती रोखूनही उत्पन्न वाढू शकते. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

  • गुणवत्ता वाढविणार...

जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तेचे शिक्षक असून, गणवेश, पोषण आहारही शासन देत आहे. तरीही येथील पटसंख्या कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. हे कुणासाठीच भूषणावह नाही. यामुळे शिक्षक निश्चितच आम्हाला शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मदत करतील, असेही कोरे यांनी स्पष्ट केले.

 

  • गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र

ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत असूनही त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य पुस्तके उपलब्ध होत नाहीत. काही विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे महागडी पुस्तके खरेदी करता येत नाहीत. म्हणूनच जिल्हा परिषदेतर्फे गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एमपीएससी, युपीएस परीक्षेसाठी लागणारी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी स्वीय निधीतून पैशाची तरतूद करणार आहे, असेही कोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद