शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भ्रष्टाचारमुक्त, राजकारण विरहित कारभार करु : कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:48 IST

पाणी, शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत तीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत.- प्राजक्ता कोरे

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील शाळांत ई-लर्निंग उपक्रमचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

अशोक डोंबाळे ।सांगलीजिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न असफल झाले. अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडीत भाजपने निर्विवाद वर्चस्व ठेवत सत्ता कायम राखली. अध्यक्षपदाची संधी प्राजक्ता कोरे यांना मिळाली. याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : जिल्ह्याच्या विकासासाठी तुमचे व्हिजन काय आहे?उत्तर : पावणेतीन वर्षे जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे कामकाजाची पूर्णपणे माहिती आहे. सामान्य जनतेच्यादृष्टीने शिक्षण, आरोग्य आणि पाणी हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. हेच सोडविण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरु आहेत. शंभर टक्के शाळा ई-लर्निंग करणार असून जिल्हा नियोजनमधून साडेचार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. २००७ पासून शाळांना खेळाचे साहित्यच मिळाले नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची कुचंबणा होत होती. म्हणून स्वीय निधीतून तात्काळ १५ लाखांचे खेळाचे साहित्य देणार आहे. आरोग्य केंद्रामध्येही मूलभूत सुविधा देऊन तेथील आरोग्य सेवा सक्षम करणार आहे. या योजना राबवितांना भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देतांना राजकारणही येऊ देणार नाही.

प्रश्न : शासनाने जिल्हा परिषदेचे अनेक अधिकार कमी करुन पंख छाटले आहेत. निधीची टंचाई आहे, यावर तुम्ही काय करणार आहे?उत्तर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांमार्फत शासनाकडे शिक्षक बदल्यांसह कृषी विभागाच्या योजना पुन्हा जि. प.कडे देण्याची मागणी करणार आहे. जि. प. सभेतही तसा ठराव करुन शासनाकडे पाठविणार आहे. स्वीय निधी वाढविण्यासाठी प्रयत्न असून, वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशीही मागणी शासनाकडे करणार आहे. जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा विकसित करणे, करांची विविध मार्गाने गळती होत असून ती रोखूनही उत्पन्न वाढू शकते. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

  • गुणवत्ता वाढविणार...

जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तेचे शिक्षक असून, गणवेश, पोषण आहारही शासन देत आहे. तरीही येथील पटसंख्या कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. हे कुणासाठीच भूषणावह नाही. यामुळे शिक्षक निश्चितच आम्हाला शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मदत करतील, असेही कोरे यांनी स्पष्ट केले.

 

  • गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र

ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत असूनही त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य पुस्तके उपलब्ध होत नाहीत. काही विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे महागडी पुस्तके खरेदी करता येत नाहीत. म्हणूनच जिल्हा परिषदेतर्फे गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एमपीएससी, युपीएस परीक्षेसाठी लागणारी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी स्वीय निधीतून पैशाची तरतूद करणार आहे, असेही कोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद