शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सरकारला बळीराजाचा हिसका दाखवू

By admin | Updated: April 3, 2015 23:58 IST

रघुनाथ पाटील : कवठेमहांकाळला बैठक; २० एप्रिलला सांगलीत मोर्चा

कवठेमहांकाळ : गोरगरिबांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला आता कायमचा धडा शिकविण्यासाठी आपण शेतकरी संघटनेच्यावतीने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, विविध मागण्यांसाठी येत्या २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांसह, बैलगाडीवाल्यांसह, जवानांसह सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून या शासनाला बळीराजाच्या ताकदीचा हिसका दाखवू, असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांची आज दिला. आज कवठेमहांकाळ येथील नाना कोरे कार्यालयात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची विविश्र प्रश्नांवर चर्चात्मक तसेच आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी रघुनाथ पाटील बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेना. एफ.आर.पी.नुसार तर दर दिला जात नाहीच, परंतु बिलाची रक्कमही शेतकऱ्यांना कारखानदार वेळेवर देईनात. या एवढ्या समस्यांच्या गर्तेत राज्यातील शेतकरी सापडला असताना, राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार झोपा काढत आहे काय? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार भांडवलदारांचे समर्थन करणारे व शेतकऱ्यांना मारणारे आहे. भाजप सरकार जाणीवपूर्वक सत्तेचे राजकारण करण्यासाठी गांधारीची भूमिका बजावत आहे. गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी हे शासन मदत करू शकत नसेल, तर भाजपने सत्तेतून पायउतार व्हावे. कवठेमहांकाळ, तासगाव, जत, मिरज, आटपाडी या तालुक्यातील शेतकरी, जनता पाणी पाणी म्हणून मरणप्राय यातना भोगत असताना, हे शासन थकित वीज बिलाचा खोडा घालत आहे. दहा हजार कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी खर्च करून केवळ पाच कोटींच्या वीज बिलासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग या शासनाने सुरू केला आहे. २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू व या सरकारला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी या दिवशी निर्णायक लढा उभारणार असल्याचे सांगितले.या तालुक्यातून शेतकऱ्यांनी, कामगारांनी, जवानांनी, व्यापाऱ्यांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे युवा नेते अशोकराव माने यांनी यावेळी केले.बैठकीस जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, महादेव कोरे, अशोकराव माने, शेखर कुरणे, बैलगाडी संघटनेचे नामदेव जानकर, नंदकुमार पाटील, संभाजी पवार, शंकर भोसले, पप्पू हजारे, लालाभाई जानकर उपस्थित होते. (वार्ताहर)प्रमुख मागण्या...म्हैसाळ योजना तातडीने सुरू करावी व शेतीला पाणी द्यावेशेतकऱ्यांच्या उसाला एफ.आर.पी.नुसार वेळेवर दर द्यावाबैलगाडी शर्यतीवरील बंद उठवावीगोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावावन्यप्राणी संरक्षण कायदा दुरूस्त करावा, रद्द करावाअवकाळी नुकसानभरपाई तातडीने द्यावीभाकड जनावरांची जबाबदारी शासनाने घ्यावी