शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला बळीराजाचा हिसका दाखवू

By admin | Updated: April 3, 2015 23:58 IST

रघुनाथ पाटील : कवठेमहांकाळला बैठक; २० एप्रिलला सांगलीत मोर्चा

कवठेमहांकाळ : गोरगरिबांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला आता कायमचा धडा शिकविण्यासाठी आपण शेतकरी संघटनेच्यावतीने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, विविध मागण्यांसाठी येत्या २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांसह, बैलगाडीवाल्यांसह, जवानांसह सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून या शासनाला बळीराजाच्या ताकदीचा हिसका दाखवू, असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांची आज दिला. आज कवठेमहांकाळ येथील नाना कोरे कार्यालयात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची विविश्र प्रश्नांवर चर्चात्मक तसेच आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी रघुनाथ पाटील बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेना. एफ.आर.पी.नुसार तर दर दिला जात नाहीच, परंतु बिलाची रक्कमही शेतकऱ्यांना कारखानदार वेळेवर देईनात. या एवढ्या समस्यांच्या गर्तेत राज्यातील शेतकरी सापडला असताना, राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार झोपा काढत आहे काय? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार भांडवलदारांचे समर्थन करणारे व शेतकऱ्यांना मारणारे आहे. भाजप सरकार जाणीवपूर्वक सत्तेचे राजकारण करण्यासाठी गांधारीची भूमिका बजावत आहे. गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी हे शासन मदत करू शकत नसेल, तर भाजपने सत्तेतून पायउतार व्हावे. कवठेमहांकाळ, तासगाव, जत, मिरज, आटपाडी या तालुक्यातील शेतकरी, जनता पाणी पाणी म्हणून मरणप्राय यातना भोगत असताना, हे शासन थकित वीज बिलाचा खोडा घालत आहे. दहा हजार कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी खर्च करून केवळ पाच कोटींच्या वीज बिलासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग या शासनाने सुरू केला आहे. २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू व या सरकारला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी या दिवशी निर्णायक लढा उभारणार असल्याचे सांगितले.या तालुक्यातून शेतकऱ्यांनी, कामगारांनी, जवानांनी, व्यापाऱ्यांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे युवा नेते अशोकराव माने यांनी यावेळी केले.बैठकीस जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, महादेव कोरे, अशोकराव माने, शेखर कुरणे, बैलगाडी संघटनेचे नामदेव जानकर, नंदकुमार पाटील, संभाजी पवार, शंकर भोसले, पप्पू हजारे, लालाभाई जानकर उपस्थित होते. (वार्ताहर)प्रमुख मागण्या...म्हैसाळ योजना तातडीने सुरू करावी व शेतीला पाणी द्यावेशेतकऱ्यांच्या उसाला एफ.आर.पी.नुसार वेळेवर दर द्यावाबैलगाडी शर्यतीवरील बंद उठवावीगोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावावन्यप्राणी संरक्षण कायदा दुरूस्त करावा, रद्द करावाअवकाळी नुकसानभरपाई तातडीने द्यावीभाकड जनावरांची जबाबदारी शासनाने घ्यावी