शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

सरकारला बळीराजाचा हिसका दाखवू

By admin | Updated: April 3, 2015 23:58 IST

रघुनाथ पाटील : कवठेमहांकाळला बैठक; २० एप्रिलला सांगलीत मोर्चा

कवठेमहांकाळ : गोरगरिबांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला आता कायमचा धडा शिकविण्यासाठी आपण शेतकरी संघटनेच्यावतीने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, विविध मागण्यांसाठी येत्या २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांसह, बैलगाडीवाल्यांसह, जवानांसह सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून या शासनाला बळीराजाच्या ताकदीचा हिसका दाखवू, असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांची आज दिला. आज कवठेमहांकाळ येथील नाना कोरे कार्यालयात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची विविश्र प्रश्नांवर चर्चात्मक तसेच आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी रघुनाथ पाटील बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेना. एफ.आर.पी.नुसार तर दर दिला जात नाहीच, परंतु बिलाची रक्कमही शेतकऱ्यांना कारखानदार वेळेवर देईनात. या एवढ्या समस्यांच्या गर्तेत राज्यातील शेतकरी सापडला असताना, राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार झोपा काढत आहे काय? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार भांडवलदारांचे समर्थन करणारे व शेतकऱ्यांना मारणारे आहे. भाजप सरकार जाणीवपूर्वक सत्तेचे राजकारण करण्यासाठी गांधारीची भूमिका बजावत आहे. गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी हे शासन मदत करू शकत नसेल, तर भाजपने सत्तेतून पायउतार व्हावे. कवठेमहांकाळ, तासगाव, जत, मिरज, आटपाडी या तालुक्यातील शेतकरी, जनता पाणी पाणी म्हणून मरणप्राय यातना भोगत असताना, हे शासन थकित वीज बिलाचा खोडा घालत आहे. दहा हजार कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी खर्च करून केवळ पाच कोटींच्या वीज बिलासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग या शासनाने सुरू केला आहे. २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू व या सरकारला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी या दिवशी निर्णायक लढा उभारणार असल्याचे सांगितले.या तालुक्यातून शेतकऱ्यांनी, कामगारांनी, जवानांनी, व्यापाऱ्यांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे युवा नेते अशोकराव माने यांनी यावेळी केले.बैठकीस जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, महादेव कोरे, अशोकराव माने, शेखर कुरणे, बैलगाडी संघटनेचे नामदेव जानकर, नंदकुमार पाटील, संभाजी पवार, शंकर भोसले, पप्पू हजारे, लालाभाई जानकर उपस्थित होते. (वार्ताहर)प्रमुख मागण्या...म्हैसाळ योजना तातडीने सुरू करावी व शेतीला पाणी द्यावेशेतकऱ्यांच्या उसाला एफ.आर.पी.नुसार वेळेवर दर द्यावाबैलगाडी शर्यतीवरील बंद उठवावीगोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावावन्यप्राणी संरक्षण कायदा दुरूस्त करावा, रद्द करावाअवकाळी नुकसानभरपाई तातडीने द्यावीभाकड जनावरांची जबाबदारी शासनाने घ्यावी