शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
5
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
6
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
7
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
8
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
9
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
10
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
11
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
12
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
13
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
14
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
15
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
16
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
17
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
18
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
20
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार, समितीवर गुन्हे दाखल करू

By admin | Updated: January 29, 2015 23:39 IST

सतीश लोखंडे यांचा इशारा : चौदा पाणीपुरवठा योजनांमध्ये हलगर्जीपणाचा ठपका

सांगली : जिल्ह्यातील ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप रखडल्या असून, त्यातील काहींनी त्या पूर्ण करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्या योजना पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. चौदा पाणी पुरवठा योजनांच्या कामातील हलगर्जीपणामुळे संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली.ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी आज, बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. सध्या जिल्ह्यात ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी उंच टाकीचे काम न झालेल्यांमध्ये धुळकरवाडी, कंठी, लकडेवाडी, लमाणतांडा, पांढरवाडी, सोनलगी, जिरग्याळ, जालिहाल खुर्द आणि गुगवाड येथील योजनांचा समावेश आहे. तसेच समितीने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविलेल्यांमध्ये लिंगीवरे, करेवाडी, वळसंग, निगडी खुर्द आणि खटाव अशा एकूण चौदा योजना पूर्णपणे रखडलेल्या आहेत. त्यांना याबाबत वेळोवेळी संधीही देण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित योजनेशी संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.सुधारित मंजुरीकरिता आटपाडी पाणी पुरवठा समितीने शासनाकडे योजना पाठविली असून तिला मंजुरी मिळाली आहे. जाडरबोबलाद (ता. जत) येथे सुधारित कामाची आवश्यकता नसून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच सादर केलेल्या योजनांपैकी भिवर्गी आणि साळमळगेवाडी (ता. जत) येथील योजनांना अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. रखडलेल्या योजनांपैकी मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये लाडेगाव, मरळनाथपूर, शिरटे, गौरवाडी, बहाद्दूरवाडी, खरातवाडी, तर जून २०१५ मध्ये पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये इटकरे, बावची, ठाणापुडे, कुरळप, घोलेश्वर, खैराव, खंडनाळ येथील योजनांचा समावेश आहे. आॅगस्ट २०१५ पर्यंत तुजारपूर, येडेनिपाणी, बोरगाव या तीन योजना पूर्ण होणार आहेत. ऐतवडे खुर्द येथील योजना ही तक्रारीमुळे बंद करण्यात आली आहे. बनेवाडी, मिरजवाडी आणि नृसिंहपूर येथील योजना पूर्ण झाल्याचे बैठकीत निदर्शनास आले. यापूर्वी गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड- सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अमृतवाडी येथील योजना समितीने तेथील योजनेकरिता आवश्यक असणारे पैसे शासनास परत केले आहेत. उंच टाकीचे काम न झालेल्या योजनांपैकी करेवाडी - तिकोंडी आणि सुसलाद येथील योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बहे येथील योजनेने सुधारित तांत्रिक मंजुरी घेऊन निवीदा प्रक्रिया सुरू असल्याने तेथील कामही लवकरच सुरू होणार आहे. बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. सादिलगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)योजनांचा आराखडा सादरग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. सध्या जिल्ह्यात १४ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड - सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशीही माहिती सतीश लोखंडे यांनी दिली.