शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

By admin | Updated: June 7, 2017 00:24 IST

आटपाडीत १४ वर्षांत १६ पोलिस निरीक्षक!

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : प्रभू रामचंद्र १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आले होते म्हणतात. पण सध्या आटपाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा येथे गेल्या १४ वर्षांपासून वनवास सुरु आहे. मागील १४ वर्षात फक्त एक अधिकारी वगळता, एकही पोलिस निरीक्षक येथे टिकला नाही. मुदतीपूर्वीच निरीक्षकांच्या बदल्या होण्यामागचे गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आटपाडी पोलिस ठाण्याचे जिल्ह्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यास जिल्हा पोलिसप्रमुख अथवा तत्सम दर्जाचे अधिकारी क्वचितच भेट देतात. त्यामुळे अनेकदा येथील सगळा आलबेल कारभार सुरु असतो. आटपाडी तालुका म्हणजे दुष्काळी तालुका. त्यात स्थलांतरितांची संख्या अधिक. त्यामुळे तालुका कायम शांत असतो. अगदी टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठीची आंदोलनेही इथे कायम शांततेतच पार पडली. कधीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली नाही.अशा या दुष्काळी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्ष मात्र तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षातून मारामाऱ्या घडत आहेत. विरोधकांची जिरवण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्याचा वारंवार आरोप केला जात आहे. त्यातून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रसिध्द होत चाललेल्या या पोलिस ठाण्यात आता अधिकाऱ्यांची सारखी बदली होण्याबाबतही चर्चा होऊ लागली आहे. मुदतीआधीच बदली झाल्यामुळे थेट अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेऊन पुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यावर कब्जा मिळविल्याचेही उदाहरण आहे. त्यामुळे बदली होईल या भीतीपोटी जर अधिकारी काम करु लागले, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा अर्थ सर्वच अधिकारी सक्षम होते असाही नाही आणि गेल्या १४ वर्षात मुदतीपूर्वीच बदली झालेले सर्वच अधिकारी अकार्यक्षम होते, असेही म्हणता येणार नाही. तरीही येथील अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदल्या होत आहेत. एकूणच या बदली प्रकरणामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी चुकीचा संदेश जाणार नाही, याची खबरदारी इथल्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बदली करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.एकही अधिकारी सलग दोन वर्षे नाही!पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांचा अपवाद वगळता, गेल्या १४ वर्षांत एकाही पोलिस निरीक्षकांना सलग दोन वर्षे येथे सेवा करता आलेली नाही. त्यामुळे बदलीची टांगती तलवार डोक्यावर असणारे अधिकारी लोकांना न्याय कसे देणार? हा प्रश्नच आहे. पोलिस निरीक्षक रसिकलाल गुजर यांनी त्यांच्या बदलीविरोधात ‘मॅट’मध्ये जाऊन न्याय मागण्याचे धाडस दाखविले. परवा साडेदहा महिन्यातच बदली झालेले पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी सध्या आजारी रजेवर गेले आहेत. तेही ‘मॅट’मध्ये जाऊन बदलीविरोधात आवाज उठवणार असल्याची चर्चा आहे.पोलिस निरीक्षकांचा कार्यकालचंद्रकांत देशमुख २६ मार्च २००४ ते ६ आॅक्टोबर २००५, दयाराम शिंदे ६ आॅक्टोबर २००५ ते २६ जून २००६, लक्ष्मणराव जाधव २६ जून २००६ ते ८ मे २००७, चंद्रकांत देशमुख ९ मे २००७ ते २१ एप्रिल २००८, किसन गवळी २१ एप्रिल २००८ ते ३० जानेवारी २००९, राजाराम शिंदे ३० जानेवारी २००९ ते १६ एप्रिल २०१०, रसिकलाल गुजर १६ एप्रिल २०१० ते २८ आॅक्टोबर २०११, संजय पवार २८ आॅक्टोबर २०११ ते ८ मार्च २०१२, रसिकलाल गुजर ८ मार्च २०१२ ते ३१ आॅक्टोबर २०१२, सुनील गिड्डे १ नोव्हेंबर २०१२ ते १३ डिसेंबर २०१२, एन. जी. कुलकर्णी १४ डिसेंबर २०१२ ते १९ फेब्रुवारी २०१४, सुनील गिड्डे १९ फेब्रुवारी २०१४ ते ८ जून २०१४, सदाशिव शेलार ८ जून २०१४ ते ३ जून २०१६, सुधाकर देढे १६ जून २०१६ ते १८ जुलै २०१६, के. एस. पुजारी १८ जुलै २०१६ ते २ जून २०१७.