शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

नेत्यांकडून बंडखोरांच्या विनवण्या सुरू...

By admin | Updated: September 29, 2014 00:28 IST

विधानसभा निवडणूक : महत्त्वाचे बंडखोर ठरणार डोकेदुखी, स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांकडून प्रयत्न

सांगली : आठ विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय याद्या तयार झाल्यानंतर आता प्रत्येक पक्षातील नेत्यांना बंडखोरांची चिंता सतावत आहे. डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून स्थानिक नेत्यांसह राज्यस्तरीय नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू झाली आहे. भविष्यात दुसरी संधी देण्याची आश्वासने आता बंडखोरांना मिळू लागली आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या बंडखोरांचे पीक आले आहे. कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. महायुती आणि आघाडी तुटल्यानंतर बंडखोरांची संख्या कमी झाली असली तरी, ती संपुष्टात आलेली नाही. अधिकृत उमेदवाराला डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या मोठ्या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी आता पक्षीय पातळीवर पळापळ सुरू झाली आहे. अधिकृत उमेदवारालाही यासाठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता बंडखोरांचे पीक आले आहे. यातील सर्वच बंडखोर दखलपात्र नाहीत. मोजक्याच बंडखोरांसाठी आता पक्षीय पातळीवरून मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सांगलीत दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे, मिरजेतून सी. आर. सांगलीकर, इस्लामपुरातून बी. जी. पाटील, पलूस-कडेगावमधून संदीप राजोबा यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर तासगाव-कवठेमहांकाळमधील शिवसेनेचे दिनकर पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बंडखोर व नाराज इच्छुकांना आता शांत करण्याची गरज जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यातूनच मनधरणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अधिकृत उमेदवारांना याचा सर्वाधिक त्रास होणार असल्याने अशा उमेदवारांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसमधील नाराजांची समजूत काढण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दूरध्वनीवरून बंडखोर व नाराजांशी संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि अन्य नेत्यांनी बंडखोरांशी चर्चा सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ आॅक्टोबरपर्यंत आहे. मनधरणीसाठी नेते, पदाधिकारी आणि उमेदवारांकडे केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. इतक्या कमी कालावधित अशा लोकांना शांत करणे कसरतीचे ठरणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह, भाजप, सेनेलाही या गोष्टी कराव्या लागत आहेत. (प्रतिनिधी)देवा! छाननीत अर्ज उडव!उमेदवारी अर्जांची उद्या (सोमवारी) छाननी होणार आहे. बऱ्याचजणांना आपला अर्ज बाद तर होणार नाही ना, याबद्दल चिंता लागली आहे, तर अनेकांनी स्पर्धक उमेदवारांचा अर्ज बाद व्हावा म्हणून देवाला साकडे घातले आहे. बहुतांश पक्षांनी अधिकृत उमेदवाराला पर्याय म्हणून आणखी काहींचे अर्ज दाखल केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद होवो, असे देवाला साकडे घातले आहे. सांगलीतील अशाच एका दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराने अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर मलाच संधी मिळेल, अशी खात्री व्यक्त केली. ४आर. आर. पाटील यांच्यावर टीका करून यापूर्वीच खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यात आता आणखी काही लोकांची भर पडण्याची चिन्हे आहेत. सांगलीत उमेदवारीसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक असलेले दिनकर पाटील यांचे नाव जेव्हा चर्चेत आले, तेव्हा आर. आर. यांनी त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकारच नाही, असे स्पष्ट केले. संजय पाटील यांचा उघडपणे प्रचार केल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागितलीच कशी, असा सवाल आबांनी उपस्थित केल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या गोटात रंगली आहे. यापूर्वी अनेक बैठकांमधूनही आर. आर. पाटील यांनी दिनकर पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. दिनकर पाटील यांच्यासह समर्थकांमध्ये या गोष्टीवरून नाराजी दिसत आहे.