शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
2
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
3
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
5
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
6
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
7
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

Sangli flood: पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा सोशल मीडियाच्या रिल्सवरच नेत्यांची स्पर्धा, जनतेला फक्त आश्वासनांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:07 IST

सध्या पक्ष जादा झाल्याने नेत्यांच्या सुळसुळाट

अशोक पाटीलइस्लामपूर : पावसाळा सुरू झाला की, वारणा-कृष्णा खोऱ्यातील शेतकरी जनतेला महापूरसारख्या संकटाला सामोरे जावे लागते. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील बरेच नेते पूरग्रस्त भागात भेटी देऊन फोटो सेशन करून जनसेवा करण्याचे प्रदर्शन करतात. सध्या पक्ष जादा झाले आहेत. नेत्यांच्या सुळसुळाट आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी मीडियावर रिल्स करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामध्ये श्रेय लाटण्याचीही राजकीय खेळी केली जात असल्याचे बोलले जात आहे.वारणा-कृष्णा खोऱ्यात आमदार जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करत ग्राउंड रिपोर्ट घेतला. त्यांचेच विरोधक आमदार सत्यजित देशमुख आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ही आपल्या समर्थकांना घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या तीन नेत्यांचे रिल्स समाजमाध्यमातून फिरत आहेत.आपण का मागे म्हणूनच भाजपचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनीही पूरग्रस्त भागात जाऊन पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. महाडिक बंधूंचीही स्वतंत्र रिल्स समाजमाध्यमातून फिरत आहेत. इस्लामपूर मतदारसंघात नेहमीच स्वत:चे अस्तित्व दाखविणारा हुतात्मा पॅटर्न सध्या शिंदेसेनेत आहेत. त्याचे नेते गौरव नायकवडी यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सध्या नायकवडी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करताना दिसतात. एकंदरीत पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा मीडियावरील रिल्स करण्यात नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

स्व:ताचे मार्केटिंग करून जनसामान्यांत आपली प्रतिमा उंचाविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पूरग्रस्त भागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात नेते अपयशी आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी येणाऱ्या कृष्णाकाठावरील जनतेला महापुराला सामोरे जावे लागते. याच्यावर सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा. तेव्हाच नेत्याची दुकानदारी बंद होईल. - बी. जी. पाटील, बळीराजा शेतकरी संघटना 

अलीकडील काळात पूरस्थिती म्हणजे नेत्यांना पर्यट स्थळ झाले आहे. कधी पूर येतो आणि ठराविक बगलबच्चे घेऊन फोटो सेशन करणे हाच उद्योग राजकीय नेत्यांचा झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कृष्णाकाठावरील नागरिकांना पुरासारख्या संकटाला तोंड द्यावे लागते. याच्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यापेक्षा नुसती सहानभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राजकीय नेते करीत आहेत. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना