शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
4
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
5
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
6
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
7
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
8
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
9
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
10
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
11
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
12
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
13
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
14
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
15
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
16
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
17
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
18
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
19
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
20
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli flood: पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा सोशल मीडियाच्या रिल्सवरच नेत्यांची स्पर्धा, जनतेला फक्त आश्वासनांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:07 IST

सध्या पक्ष जादा झाल्याने नेत्यांच्या सुळसुळाट

अशोक पाटीलइस्लामपूर : पावसाळा सुरू झाला की, वारणा-कृष्णा खोऱ्यातील शेतकरी जनतेला महापूरसारख्या संकटाला सामोरे जावे लागते. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील बरेच नेते पूरग्रस्त भागात भेटी देऊन फोटो सेशन करून जनसेवा करण्याचे प्रदर्शन करतात. सध्या पक्ष जादा झाले आहेत. नेत्यांच्या सुळसुळाट आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी मीडियावर रिल्स करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामध्ये श्रेय लाटण्याचीही राजकीय खेळी केली जात असल्याचे बोलले जात आहे.वारणा-कृष्णा खोऱ्यात आमदार जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करत ग्राउंड रिपोर्ट घेतला. त्यांचेच विरोधक आमदार सत्यजित देशमुख आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ही आपल्या समर्थकांना घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या तीन नेत्यांचे रिल्स समाजमाध्यमातून फिरत आहेत.आपण का मागे म्हणूनच भाजपचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनीही पूरग्रस्त भागात जाऊन पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. महाडिक बंधूंचीही स्वतंत्र रिल्स समाजमाध्यमातून फिरत आहेत. इस्लामपूर मतदारसंघात नेहमीच स्वत:चे अस्तित्व दाखविणारा हुतात्मा पॅटर्न सध्या शिंदेसेनेत आहेत. त्याचे नेते गौरव नायकवडी यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सध्या नायकवडी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करताना दिसतात. एकंदरीत पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा मीडियावरील रिल्स करण्यात नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

स्व:ताचे मार्केटिंग करून जनसामान्यांत आपली प्रतिमा उंचाविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पूरग्रस्त भागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात नेते अपयशी आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी येणाऱ्या कृष्णाकाठावरील जनतेला महापुराला सामोरे जावे लागते. याच्यावर सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा. तेव्हाच नेत्याची दुकानदारी बंद होईल. - बी. जी. पाटील, बळीराजा शेतकरी संघटना 

अलीकडील काळात पूरस्थिती म्हणजे नेत्यांना पर्यट स्थळ झाले आहे. कधी पूर येतो आणि ठराविक बगलबच्चे घेऊन फोटो सेशन करणे हाच उद्योग राजकीय नेत्यांचा झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कृष्णाकाठावरील नागरिकांना पुरासारख्या संकटाला तोंड द्यावे लागते. याच्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यापेक्षा नुसती सहानभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राजकीय नेते करीत आहेत. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना