शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

नेते कुठेही गेले, तरी शेवटी कॉँग्रेसच्याच दावणीला येणार

By admin | Updated: July 27, 2015 00:30 IST

पतंगराव कदम : मदन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

सांगली : पक्ष सोडून कोणी कुठेही गेले तरी, शेवटी त्यांना कॉँग्रेसच्या दावणीलाच यावे लागेल. आजवर किती आले आणि किती गेले तरी, कॉँग्रेस अभेद्य आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या त्यांनी मदन पाटील यांना टोला लगावला. मदन पाटील यांच्याविषयी ते म्हणाले, कोणी कुठे जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कॉँग्रेसला अनुभव नवा नाही. आजवर अनेकजण पक्षातून गेले, पण पुन्हा त्यांना कॉँग्रेसच्याच दावणीला यावे लागले. आम्हीही याकडे लक्ष देत नाही. बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही समविचारी लोकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढत आहोत. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, त्यात सांगलीच्या बाजार समितीचा समावेश होतो. त्यामुळे या बाजार समितीवर सत्ता प्रस्थापित करणे आमचे लक्ष्य असेल. आम्ही बाजार समितीचा कायापालट करू. महापालिकेप्रमाणेच बाजार समितीमध्येही आपण लक्ष घालणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही सरकारांचा कारभार चांगला नाही. लोकांमधून त्यांच्याविषयी नाराजी आहे. भलेही आमचे सरकार अधिक काळ सत्तेवर होते, पण त्यांनी वर्षभरात काही गोष्टी करण्याची आश्वासने जनतेला दिली होती, त्याचे काय? जनता त्यांना त्या गोष्टीचा हिशेब मागणारच आहे. साखर कारखानदारीबद्दलही शासनाची उदासीनता दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर, पुढील हंगामात कारखाने सुरू होतील की नाही, याची शंका आहे. (प्रतिनिधी)बदलत्या समीकरणाची नांदीबाजार समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात काही बदल झाले आहेत. हे जिल्ह्याच्या भविष्यातील बदलाची नांदी आहे, असे मत पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. एकत्र यायला हवेजिल्हास्तरावरील निवडणुकांमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येणे गरजेचे आहे, मात्र आजवर सांगली जिल्ह्यात अशा गोष्टी अपवादानेच घडल्या, असे मत कदम यांनी व्यक्त केले. ते नेत्यांचे पॅनेलजयंतरावांच्या पॅनेल म्हणजे नेत्यांचे पॅनेल आहे. कार्यकर्त्यांना आम्ही महत्त्व देतो. त्यामुळे आमचे पॅनेल हे कार्यकर्त्यांचे पॅनेल आहे, अशी टीका पतंगरावांनी केली. राणेंना आक्रमकता अपेक्षितनारायण राणे यांनी काँग्रेसच्याबाबतीत व्यक्त केलेले मत त्यांचे व्यक्तिगत मत आहे. तरीही विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यापूर्वी आक्रमकतेने काम केले आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून अधिक आक्रमकता अपेक्षित आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.