शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

नेते कुठेही गेले, तरी शेवटी कॉँग्रेसच्याच दावणीला येणार

By admin | Updated: July 27, 2015 00:30 IST

पतंगराव कदम : मदन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

सांगली : पक्ष सोडून कोणी कुठेही गेले तरी, शेवटी त्यांना कॉँग्रेसच्या दावणीलाच यावे लागेल. आजवर किती आले आणि किती गेले तरी, कॉँग्रेस अभेद्य आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या त्यांनी मदन पाटील यांना टोला लगावला. मदन पाटील यांच्याविषयी ते म्हणाले, कोणी कुठे जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कॉँग्रेसला अनुभव नवा नाही. आजवर अनेकजण पक्षातून गेले, पण पुन्हा त्यांना कॉँग्रेसच्याच दावणीला यावे लागले. आम्हीही याकडे लक्ष देत नाही. बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही समविचारी लोकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढत आहोत. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, त्यात सांगलीच्या बाजार समितीचा समावेश होतो. त्यामुळे या बाजार समितीवर सत्ता प्रस्थापित करणे आमचे लक्ष्य असेल. आम्ही बाजार समितीचा कायापालट करू. महापालिकेप्रमाणेच बाजार समितीमध्येही आपण लक्ष घालणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही सरकारांचा कारभार चांगला नाही. लोकांमधून त्यांच्याविषयी नाराजी आहे. भलेही आमचे सरकार अधिक काळ सत्तेवर होते, पण त्यांनी वर्षभरात काही गोष्टी करण्याची आश्वासने जनतेला दिली होती, त्याचे काय? जनता त्यांना त्या गोष्टीचा हिशेब मागणारच आहे. साखर कारखानदारीबद्दलही शासनाची उदासीनता दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर, पुढील हंगामात कारखाने सुरू होतील की नाही, याची शंका आहे. (प्रतिनिधी)बदलत्या समीकरणाची नांदीबाजार समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात काही बदल झाले आहेत. हे जिल्ह्याच्या भविष्यातील बदलाची नांदी आहे, असे मत पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. एकत्र यायला हवेजिल्हास्तरावरील निवडणुकांमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येणे गरजेचे आहे, मात्र आजवर सांगली जिल्ह्यात अशा गोष्टी अपवादानेच घडल्या, असे मत कदम यांनी व्यक्त केले. ते नेत्यांचे पॅनेलजयंतरावांच्या पॅनेल म्हणजे नेत्यांचे पॅनेल आहे. कार्यकर्त्यांना आम्ही महत्त्व देतो. त्यामुळे आमचे पॅनेल हे कार्यकर्त्यांचे पॅनेल आहे, अशी टीका पतंगरावांनी केली. राणेंना आक्रमकता अपेक्षितनारायण राणे यांनी काँग्रेसच्याबाबतीत व्यक्त केलेले मत त्यांचे व्यक्तिगत मत आहे. तरीही विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यापूर्वी आक्रमकतेने काम केले आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून अधिक आक्रमकता अपेक्षित आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.