शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

नेत्यांना मोक्का लावा : रघुनाथदादा शेतकरी सुकाणू समितीतर्फे सोमवारी जेल भरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:10 IST

सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत.

सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून राजकीय नेत्यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरून मोक्कांतर्गत कारवाई करावी. त्याशिवाय राजकीय नेते शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर होणार नाहीत, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली; मात्र कर्जमाफीतून शेतकºयांची पिळवणूकच अधिक होत आहे. उसाच्या एफआरपीसह दुधाचा निर्माण झालेला प्रश्न सोडविण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे शेतकरी यापुढे आत्महत्या न करता, संयमाने अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहेत. त्यासाठीच सोमवारी (दि. १४ मे) संपूर्ण राज्यभरात जेल भरो आंदोलन करणार असल्याचे रघुनाथदादा यांनी सांगितले.

साहेबराव कर्पे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती, तर अलीकडे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्या केली होती. यादरम्यान ७५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. मात्र, आता आत्महत्या न करता राज्यघटनेच्या कलम २१ नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. म्हणून राज्यभर शेतकरी जेल भरो करणार आहोत. या आंदोलनातून शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.भाजप, काँंग्रेस हे उद्योजकांचेच !कॉँग्रेसचे सरकार असो अथवा भाजपचे, यांना शेतकºयांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करावयाचे आहे. उद्योजकांना कमी पगारात राबणारे कामगार मिळावेत, म्हणून शेतकरी व ग्रामीण भागातील कामांसाठी, सिंचन योजनांसाठी पैसे नसल्याचे सरकार सांगत आहे. शेती सोडून शहरात लोकांनी यावे व ते उद्योजकांना कामास उपयोगी यावेत, हेच सरकारचे धोरण आहे. काँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लांसाठी, तर आताचे भाजप सरकार अंबानी, अदानी यांच्यासाठी काम करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणPoliceपोलिस