शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मिरजेसाठी आघाडीच्या घटक पक्षांचाही आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:38 IST

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक जागांचे वाटप चर्चेत अडकले आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागांवरून संभ्रम दिसत आहे. आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दलाने मिरजेच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमिरजेसाठी आघाडीच्या घटक पक्षांचाही आग्रहकाँग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुक धास्तावले

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक जागांचे वाटप चर्चेत अडकले आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागांवरून संभ्रम दिसत आहे. आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दलाने मिरजेच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सांगली जिल्ह्यातील मिरज, खानापूर-आटपाडी आणि जत या तीन जागांना जनता दल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पसंती दर्शविली आहे. यात मिरजेच्या जागेसाठी जनता दल आग्रही असल्याचे दिसून येते. मिरज विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत कॉँग्रेसकडे असलेला मतदारसंघ आहे.

या मतदारसंघात कधी कॉँग्रेस, कधी जनता दल, कधी भाजप अशा वेगवेगळ््या पक्षातील लोकांना यश मिळाले. जनता दलाने याठिकाणी यापूर्वी यश मिळविल्यामुळे जनता दलाचा या जागेसाठी आग्रह राहणार आहे. सकॉँग्रेसकडे हा मतदारसंघ असला तरी, भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच आहे. अनुभवी, सक्षम उमेदवार नसल्याने घटक पक्षांनी ही जागा मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे.आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न चालविले आहेत. ही जागा राष्ट्रवादीला दिल्यास राष्ट्रवादीची हक्काची एखादी जागा कॉँग्रेसला द्यावी लागणार असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत मौन बाळगले आहे. गतवेळी स्वतंत्र लढलेल्या या दोन्ही कॉँग्रेसना आता भाजपविरोधात ताकद एकवटताना घटक पक्षांनाही जागा देऊन त्यांना बळ द्यावे लागणार आहे. त्यामुळे जिथे सक्षम उमेदवार नसतील अशा जागा घटक पक्षांना देण्याचा विचार दोन्ही कॉँग्रेस नेते करू शकतात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खानापूर-आटपाडी मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे इच्छुक म्हणून समोर आले आहेत. जतमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनता दलाकडे इच्छुक आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांसाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. घटक पक्षांना जिल्ह्यातील केवळ एकच जागा देऊन अन्य जिल्ह्यातील अशा जागांचा शोध घेऊन घटक पक्षांची मागणी पूर्ण करण्याचाही कॉँग्रेस आघाडीत विचार सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा आता गतीने सुरू आहेत. येत्या दोन दिवसात घटक पक्षांच्या जागांचा प्रश्न सोडवून उमेदवारांची यादी आघाडी जाहीर करू शकते.मिरज विधानसभा मतदारसंघातून जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील दोनवेळा निवडून आले. पुणे पदवीधर मतदारसंघातूनही ते निवडून आले. त्यानंतर मिरज विधानसभा राखीव झाल्यानंतर जनता दलाला येथे प्रबळ उमेदवार मिळाला नव्हता. आता मिरजेची जागा जनता दल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार असल्याचा दावा प्रा. पाटील यांनी केला. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुक धास्तावले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणSangliसांगली