शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

आळसंदला आठ एकर ऊस आगीत जळून खाक

By admin | Published: January 07, 2015 11:11 PM

आगीचे कारण अस्पष्ट : साडेआठ लाखाचे नुकसान

आळसंद : आळसंद (ता. खानापूर) येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत आठ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. आगीत ३० गुंठे केळी बागेच्या काही भागासह ठिबक सिंचनच्या साहित्याचेही नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.आळसंद येथील कमळापूर रस्त्यालगत लव्हाण नावाच्या शेतात ताकारी, आरफळ योजनेच्या पाण्यावर ऊसपीक घेण्यात आले आहे. सर्व ऊस उत्पादकांचा सुमारे आठ एकर ऊस शेतात होता. दुपारी दीडच्या सुमारास अचानक उसाच्या फडाला आग लागली. यावेळी वारे व उन्हाचा तडाखा असल्याने आगीने क्षणार्धात उग्ररूप धारण केले. या आगीत तानाजी भीमराव जाधव यांचा ३० गुंठे, विजया संपत महाडिक, संपत बापूसाहेब महाडिक यांचा चार एकर, तर विलास बापूसाहेब महाडिक यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. यावेळी सुरेश भीमराव जाधव यांच्या ३० गुंठे केळीच्या बागेपैकी दोन ओळीतील केळीच्या १२० ते १५० रोपांना आगीची झळ पोहोचली.उसाच्या फडाला आग लागल्याची माहिती आळसंद गावात पसरताच शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्रांती साखर कारखाना व विटा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, उसाच्या फडात गाड्या जात नसल्याने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने वाट करीत अग्निशमन वाहनांना फडात प्रवेश करावा लागला. सुमारे दोन ते अडीच तासानंतर आग आटोक्यात आली. उसाच्या फडाला आग लागली, त्यावेळी भारनियमन असल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोका टळला. आग नक्की कशामुळे लागली, याचे कारण समजलेले नाही. (वार्ताहर)