शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘विधी’च्या विद्यार्थ्यांच्या पीएच.डी.च्या वाटा बंद; शिवाजी विद्यापीठात एकही जागा नसल्याने संताप

By अविनाश कोळी | Updated: December 25, 2023 16:24 IST

'तर मग एल.एल.एम. अभ्यासक्रम सुरू का ठेवले'

सांगली : नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारंभात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी हे जागतिक विद्यापीठासोबत स्पर्धा करतील, असे विधान करण्यात आले. परंतु, उच्च शिक्षण घेणाऱ्या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची पीएच. डी.ची वाटच विद्यापीठाने बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.पीएच. डी. प्रवेशाकरिता विद्यापीठाने परिपत्रक काढून अर्ज मागविले आहेत. प्रसिद्ध जाहिरातीनुसार एकूण ३४ अभ्यासक्रमांकरिता जवळपास १९८ जागा पीएच. डी.करिता आहेत. यामध्ये विधी अभ्यासक्रमाचा समावेश नाही. जर उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात जागाच उपलब्ध नाहीत तर मग एल. एल. एम. अभ्यासक्रम सुरू का ठेवले आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे मत रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी व्यक्त केले. वेटम म्हणाले की, हा अन्याय केवळ विद्यार्थ्यांवर नाही तर सहायक, सहयोगी प्राध्यापकांवरदेखील आहे. गोरगरीब, मागासवर्गीय संशोधक विद्यार्थी हे खासगी विद्यापीठात लाखो रुपये ‘फी’ भरून पीएच. डी.करिता प्रवेश घेऊ शकत नाहीत. सहायक, सहयोगी प्राध्यापकांना बढतीकरिता किमान दोन संशोधक विद्यार्थ्यांना गाईड म्हणून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विधी पीएच. डी.च्या जागा नसल्याने त्यांचेदेखील नुकसान होणार आहे.

अन्यत्र जाण्यासाठीही अडचणीविद्यार्थी ज्या विद्यापीठात शिकत आहे, त्यालाच पीएच. डी.करिता प्राधान्य दिले जाते. इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना कमी जागा किंवा जागाच मिळत नाहीत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठांतर्गत येणारे संशोधक विद्यार्थी हे सर्वस्तरातून बाहेर फेकले जाणार आहेत. त्यांच्या वाटा बंद झाल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Universityशिवाजी विद्यापीठ