शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

गेल्यावर्षी म्हणत होते, येऊ नको, आता म्हणतात, ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:29 AM

कोकरुड : ‘तू गावी येऊ नको. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल. गावात आले की, पंधरा दिवस शाळेत ठेवतात,’ असे परगावी ...

कोकरुड : ‘तू गावी येऊ नको. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल. गावात आले की, पंधरा दिवस शाळेत ठेवतात,’ असे परगावी असणाऱ्यांना निरोप देणारे नातेवाईक आता म्हणतात, ‘घरी लग्न कार्य आहे. त्यातच पेरणीचीही लगबग सुरू असल्याने गावी ये’, पण मात्र मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, गावाकडे संख्या वाढतच चालली असल्याने पाठ फिरवणाऱ्यांची संख्या खूप आहे.

गेल्यावर्षी आलेल्या कोरोना साथीने जवळचे कोण आणि लांबचे कोण, हे दाखवून दिले. गेल्यावर्षी ‘गावी येऊ नको’ असे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र सांगत होते. ‘तू गावी कोरोना घेऊन येशील. आलास तर गावातील शाळा, मंदिर, सभागृहात पंधरा दिवस कालावधी होईपर्यंत ठेवावे लागेल. आजारी पडलास तर सांगलीला घेऊन जातील. तू येऊच नकोस’, असे म्हणत होते. विलगीकरण कालावधी संपला तरी लोक दुरुनच बोलत होते.

मात्र यावर्षी शिराळा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या गेल्यावर्षीच्या तिप्पट झाली आहे. पण कोरोना आजार नाही, असेच लोक वागत आहेत. भीती कमी झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्या लोकांना साखरपुडा, लग्न, वास्तुशांती, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांना बोलावू लागले आहेत. काहीजण शेतीच्या कामाचे निमित्त सांगून बोलावत आहेत. मात्र मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, गावाकडे संख्या वाढतच चालली असल्याने पाठ फिरवणाऱ्यांची संख्या खूप आहे.

गेल्यावर्षी नोकरी गेलेले, व्यवसाय बंद पडलेले, आर्थिक अडचणीत आलेले सर्वजण ‘आम्ही इकडे बरे आहोत. तुम्ही काळजी घेऊन कामे करा’, असे म्हणत येण्याचे टाळत आहेत.

शिराळा तालुक्यात गेल्यावर्षी पन्नास हजारापेक्षा जास्त लोक गावी येऊनही रुग्ण संख्या मर्यादित होती. यावर्षी जवळपास दहा हजाराच्यादरम्यान लोक गावी आले. त्यातील बहुतांश परत निघूनही गेले. मात्र ग्रामीण भागातील रुग्ण संख्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे गाव नको शहर बरे म्हणण्याची वेळ आली आहे.