शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘क्रांती’चा अंतिम ऊसदर ३३५५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उदय लाड, दिलीप लाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, भीमराव महिंद, आदी मान्यवर उपस्थित होते. अरुण लाड म्हणाले, मागील गळीत हंगामात एफआरपीपेक्षा ८१९ रुपये जादा दर दिला आहे. साखर उतारा १२.५५ टक्क्यांप्रमाणे २ हजार ५३६ रुपये होत असताना, ३ हजार ३५५ रुपये दर दिला असून, यापैकी २ हजार ९३६ रुपये शेतकºयांना अदा केले आहेत. आता उर्वरित ३६९ रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत. सभासदांना दहा रुपये दराने दहा किलो साखर देऊ केली आहे. तसेच कर्मचाºयांना २८ टक्के बोनस, तर हंगामी कामगारांना कारखाना बंद काळात निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. याबरोबरच कार्यक्षेत्रात ५८ गावांत ३६ हजार ७९१ वृक्षांची लागवड केली आहे. कार्यक्षेत्रात एलईडी दिव्यांचे वाटप केले आहे. इतर अनेक सामाजिक उपक्रम कारखान्यामार्फत राबविले जात आहेत. गतवर्षी निडवा उसाला अंतिम दरापेक्षा १०० रुपये जास्त दिले आहेत. यावर्षी को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत आहे. एकूण १९.७० मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे. आसवनी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प प्रदूषणविरहित असून, देशातील सर्वोच्च तंत्रज्ञानाचा नमुना आहे. यंदा हा प्रकल्प चालू होणार आहे.ऊसविकास सुविधांचा वापर करुन कार्यक्षेत्रातील शेतकºयांनी एकरी उत्पन्न वाढवले आहे. हुमणी कीड नियंत्रणासाठी कारखान्याने यशस्वी प्रयत्न केले आहेत. शासनाने ऊस पिकासाठी ठिबक अनिवार्य केले आहे. त्यामुळे कारखान्याने ठिबकसाठी एकरी सात हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. शासन ऊस शेतीबाबत उदासीन आहे. त्यामुळे शेतकºयांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही लाड यांनी केले. जयप्रकाश साळुंखे यांनी स्वागत, तर पोपट संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी विषय पत्रिका वाचन, तर वित्त अधिकारी शामराव जाधव व आप्पासाहेब कोरे यांनी अहवाल वाचन केले.दिलीप लाड, हिम्मतराव पवार, अनिल लाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, सचिव वसंतराव लाड, पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार, आर. एम. पाटील, दिनकर लाड, कुंडलिक एडके, अशोक पवार, व्ही. वाय. पाटील, नंदाताई पाटील यांच्यासह पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.वजनात फरक पडल्यास लाभाचे बक्षीस!कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी गळितास येणाºया उसाच्या वजनात फरक पडला, तर एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.