शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘क्रांती’चा अंतिम ऊसदर ३३५५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उदय लाड, दिलीप लाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, भीमराव महिंद, आदी मान्यवर उपस्थित होते. अरुण लाड म्हणाले, मागील गळीत हंगामात एफआरपीपेक्षा ८१९ रुपये जादा दर दिला आहे. साखर उतारा १२.५५ टक्क्यांप्रमाणे २ हजार ५३६ रुपये होत असताना, ३ हजार ३५५ रुपये दर दिला असून, यापैकी २ हजार ९३६ रुपये शेतकºयांना अदा केले आहेत. आता उर्वरित ३६९ रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत. सभासदांना दहा रुपये दराने दहा किलो साखर देऊ केली आहे. तसेच कर्मचाºयांना २८ टक्के बोनस, तर हंगामी कामगारांना कारखाना बंद काळात निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. याबरोबरच कार्यक्षेत्रात ५८ गावांत ३६ हजार ७९१ वृक्षांची लागवड केली आहे. कार्यक्षेत्रात एलईडी दिव्यांचे वाटप केले आहे. इतर अनेक सामाजिक उपक्रम कारखान्यामार्फत राबविले जात आहेत. गतवर्षी निडवा उसाला अंतिम दरापेक्षा १०० रुपये जास्त दिले आहेत. यावर्षी को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत आहे. एकूण १९.७० मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे. आसवनी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प प्रदूषणविरहित असून, देशातील सर्वोच्च तंत्रज्ञानाचा नमुना आहे. यंदा हा प्रकल्प चालू होणार आहे.ऊसविकास सुविधांचा वापर करुन कार्यक्षेत्रातील शेतकºयांनी एकरी उत्पन्न वाढवले आहे. हुमणी कीड नियंत्रणासाठी कारखान्याने यशस्वी प्रयत्न केले आहेत. शासनाने ऊस पिकासाठी ठिबक अनिवार्य केले आहे. त्यामुळे कारखान्याने ठिबकसाठी एकरी सात हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. शासन ऊस शेतीबाबत उदासीन आहे. त्यामुळे शेतकºयांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही लाड यांनी केले. जयप्रकाश साळुंखे यांनी स्वागत, तर पोपट संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी विषय पत्रिका वाचन, तर वित्त अधिकारी शामराव जाधव व आप्पासाहेब कोरे यांनी अहवाल वाचन केले.दिलीप लाड, हिम्मतराव पवार, अनिल लाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, सचिव वसंतराव लाड, पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार, आर. एम. पाटील, दिनकर लाड, कुंडलिक एडके, अशोक पवार, व्ही. वाय. पाटील, नंदाताई पाटील यांच्यासह पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.वजनात फरक पडल्यास लाभाचे बक्षीस!कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी गळितास येणाºया उसाच्या वजनात फरक पडला, तर एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.