शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

फायद्यातील बॅँकेला राजकारणाचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:12 IST

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेली तीन वर्षे चोख ताळेबंद सादर करून फायद्यात राज्यात अव्वल आलेल्या सांगली जिल्हा बॅँकेला अनुत्पादित भ्रष्ट राजकारणाची कीड लागली आहे. चांगल्या धोरणांची, निखळ राजकारणाची मालमत्ता जमा बाजूवरून गायब झाली असून, त्याची जागा कुरघोड्या, स्वार्थी राजकारण आणि भ्रष्ट विचारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. राजकारणाचा हा ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेली तीन वर्षे चोख ताळेबंद सादर करून फायद्यात राज्यात अव्वल आलेल्या सांगली जिल्हा बॅँकेला अनुत्पादित भ्रष्ट राजकारणाची कीड लागली आहे. चांगल्या धोरणांची, निखळ राजकारणाची मालमत्ता जमा बाजूवरून गायब झाली असून, त्याची जागा कुरघोड्या, स्वार्थी राजकारण आणि भ्रष्ट विचारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. राजकारणाचा हा ताळेबंद सुधारला नाही, तर बॅँकेचा ताळेबंद बिघडू शकतो, याचे भानही अनेकांना राहिलेले नाही.वसंतदादा कारखान्याच्या कराराच्या मुद्द्यावरून ज्यांनी जिल्हा बॅँकेत राजकारण सुरू केले, त्यांनीच कधीकाळी भ्रष्टाचाराचे अनेक इमले याच बॅँकेत बसून बांधले होते. वास्तविक वसंतदादा कारखान्याच्या करारात काही त्रुटी आहेत, असे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाल्यानंतर त्यावरून राजकारण करण्यापेक्षा त्या त्रुटी दूर करण्यासाठी संचालकांनी एक होणे गरजेचे होते, मात्र वसंतदादा कारखान्याचे प्रकरण पुढे करून यातील अनेकांना वेगळाच स्वार्थ साधायचा होता. कारखाना करारपत्राच्या खांद्यावरून पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधण्याचाच हा डाव होता. पट्टीच्या राजकारण्यांनी हे डावपेच राजकीय मैदानात नव्हे, तर वित्तीय संस्थेत सुरू केले आहेत आणि ते अशा संस्थेला घातक आहेत.जिल्हा परिषदेत, महापालिकेत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत कितीही राजकारण केले तरी, त्या संस्थेला काही फरक पडत नसतो, पण वित्तीय संस्थेला अविश्वासाचे, शंकांचे स्पर्श झाले की होत्याचे नव्हते झालेले कोणाला कळणारही नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे आर्थिक मनोरे अनेकदा अशाच राजकारणाने ढासळल्याचा इतिहास आहे.या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी काहीजण सरसावल्याचे दिसते. गुलाबराव पाटील यांच्यासारख्या सहकारतपस्वींच्या पाऊलखुणा जपणाºया बॅँकेत बºयाचजणांच्या वाटा नको त्यांच्या आदर्शाने मळल्या आहेत. गुलाबराव पाटील यांच्या आदर्श कारभाराचे उदाहरण आजही राज्याच्या कानाकोपºयातल्या संस्थांमधून दिले जाते, मात्र त्यांच्याच कर्मभूमीत, जन्मभूमीतील लोकांनी वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालला होता.घोटाळ््यांमध्ये अडकलेले अनेक संचालकही सावध व चांगल्या मार्गाने जाताना दिसत होते. पारदर्शी कारभाराचे रंग जिल्हा बॅँकेच्या भिंतींवर उठून दिसत होते. स्वार्थी राजकारणाने आता या भिंती काळवंडल्या जात आहेत. छुप्या कुरघोड्या करून बॅँकेचा कारभार विस्कळीत करण्याचे एक मोठे कारस्थान बॅँकेत शिजले जात आहे. दुसरीकडे हा कट उधळण्यासाठीही एका गटाचे प्रयत्न सुरू आहेत.एक प्रकरण : वसंतदादा कारखान्याचेचवसंतदादा कारखान्याच्या करारपत्रावरून सध्या गदारोळ सुरू असला तरी, काही वर्षांपूर्वी याच वसंतदादा कारखान्याच्या बॅँक गॅरंटीचे प्रकरण गाजले होते. एका प्रकल्पासाठी जमा केलेली २ कोटी १६ लाखांची बॅँक गॅरंटी तत्कालीन संचालकांनी कारखान्यास परत केली होती. हा घोटाळा म्हणून गणला गेला; पण तत्कालीन संचालकांनी ही चूक दोनच वर्षांपूर्वी सुधारण्यासाठी आटापिटा केला. त्यावेळी सर्व संचालक एकवटले आणि कारखान्याला बॅँक गॅरंटी परत जिल्हा बॅँकेत जमा करण्यास भाग पाडले. ही एकी आताच्या करारपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी का होत नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.ठेच लागूनही पुन्हा तेच!ठेच लागली की माणूस शहाणा होतो, असे म्हणतात; पण जिल्हा बॅँकेत हे तत्त्व लागू होत नाही. ठेच लागलेली अनेक माणसे पुन्हा त्याचठिकाणी बेफिकीरीचे पाऊल टाकण्यास सज्ज होतात. पारदशीपणाची अ‍ॅलर्जी झाल्याने अनेकजण नोकरभरतीसाठी पदाधिकारी बदलाचा घाट घालत आहेत.