शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

ते मजूर अखेर बसने गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:44 IST

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यातून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना त्यांच्या राज्यातून जाण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था झाली. परंतु छत्तीसगड मधून आलेल्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन नाही. या मजुरांना घेऊन आलेले ठेकेदार यापूर्वीच निघून गेले.

ठळक मुद्देमिरज आगार व सांगली आगार च्या एस टी कर्मचाऱ्यांनी मदत केली

सांगली : छत्तीसगड येथील मजूर तीन ते चार आठवड्यापासून सर्व कार्यालयात हेलपाटे मारत होते. परंतु गावाकडे कसे जायचे याचा मार्गच सापडत नसल्याने शेवटी सांगलीमधून त्यांच्या गावी चालत निघाले होते. त्याबाबत सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी या मजुरांची समजूत काढून त्यांना थांबायला सांगितले. चार दिवस सुधार समितीच्या टीम ने त्या सर्व मजुरांच्या कागदपत्रांची पूर्तता करून अखेर ११३ मजुरांना त्यांच्या परिवारासह एस टी महामंडळाच्या बसने गावाकडे काल रवाना केले.उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यातून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना त्यांच्या राज्यातून जाण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था झाली. परंतु छत्तीसगड मधून आलेल्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन नाही. या मजुरांना घेऊन आलेले ठेकेदार यापूर्वीच निघून गेले. ज्या ठिकाणी काम करत होते तेथे कसेबसे दोन महिने काढले. जेवणाची सोय होईना, ठेकेदार निघून गेल्याने कामाला कोठे जायचे हे समजेना. त्यात गावी असणाऱ्या घरच्यांनी लवकर परत या म्हणून सारखे निरोप द्यायला सुरुवात केली. परंतु गावी जायचे कसे हे त्यांना समजत नव्हते. त्यामुळे अखेर त्यांनी चालत गावी जाण्याचा निर्णय घेतला.त्याची माहिती मिळाल्यानंतर अ‍ॅड. अमित शिंदे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना बसने जाण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. शिंदे यांना या मजुरांना एस टी ने गोंदिया जिल्ह्यापर्यंत छत्तीसगडसीमेपर्यंत सोडता येऊ शकते व तेथून छत्तीसगड शासन या मजूरांना त्यांच्या गावी पोहचवू शकते हे समजले.त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय व एस टी महामंडळाकडे संपर्क साधला.

तिथे व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना याची माहिती दिली व त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भेट घेतली. त्यांनी तहसीलदार यांना सूचना करून त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. सुधार समितीचे कार्यकर्ते तहसील कार्यलय सांगेल त्या कागदपत्रांची पूर्तता करत होते. परंतु जिल्हाधिकारी यांनी सांगून देखील दोन दिवस तहसीलदार कार्यालयात कोणी व्यवस्थित दखल घेत नव्हते. त्यामुळे अखेर तहसील कार्यालयात सर्वांना धारेवर धरून त्यांच्या कामाबद्दल जाब विचारल्यानंतर व मजुरांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर सूत्रे हलली व मजुरांना गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

काल या ११३ मजुर व त्यांच्या लहान मुलांना घेऊन चार एस टी गोंदीयकडे रवाना झाल्या.त्या मजुरांनी जाताना समाधान व्यक्त करत सुधार समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. सुधार समितीचे प्रशांत साळुंखे, अ‍ॅड. अरुणा शिंदे, महालिंग हेगडे, रोहित शिंदे, नितीन मोरे, निलेश मोरे, सुधिर भोसले, नितीन शिंदे, रविंद्र काळोखे, जयंत जाधव, सद्दाम खाटीक हे यासाठी चार दिवस झटत होते.या मजुरांच्या राहण्याची सोय मालू हायस्कूल येथे करण्यात आली होती. हॉटेल व्यावसायिक प्रविण शेट्टी यांनी देखील या मजुरांची जेवणाची सोय केली. प्रा.आर. बी. शिंदे यांनी सर्वांना वाटेत जाण्यासाठी पाण्याची सोय केली. हितेश ओंकार यांच्यामुळे कमी वेळेत सर्वांना पाणी उपलब्ध झाले. मिरज आगार व सांगली आगार च्या एस टी कर्मचाऱ्यांनी मदत केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी