शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नव्या विधेयकाविरोधात कामगार संघटनेचा एल्गार

By admin | Updated: December 1, 2014 00:14 IST

हनुमंत ताटे : एसटी खासगीकरणाला बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न

सांगली : केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या रस्ता वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून खासगीकरणाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न होणार आहे. या विधेयकातील तरतुदींमुळे प्रवाशांच्या प्रदीर्घ सेवेत असणारे महामंडळ अधिक तोट्यात जाण्याबरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या अनेक सेवाही नाहीशा होणार आहेत. त्यामुळे याविरोधात आम्ही १८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे निदर्शने व धरणे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, केंद्र शासनाने रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बिल - २0१४ या नव्या कायद्यातील भाग ७ मध्ये प्रवासी वाहतुकीसंबंधी काही अमूलाग्र बदल केले आहेत. त्यामध्ये खासगी प्रवासी वाहतूक व एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांची गणना एकसारखी केली आहे. सध्या टप्पा वाहतूक फक्त एसटी महामंडळ करीत आहे. परंतु नव्या कायद्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनाही टप्पा वाहतूक करता येणार आहे. यासाठी निविदा पद्धतीने टप्पा वाहतुकीचे परवाने दिले जाणार आहेत. वाहने उभी करण्याच्या तसेच थांबविण्याच्या जागा निवडण्याचे अधिकार राज्य वाहतूक प्राधिकरणास असल्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे. त्यामुळे एसटी स्थानक, आगार येथेही खासगी वाहनांसाठी जागा खुल्या होतील. सध्या एसटी दुर्गम व ग्रामीण भागातील लोकांनाही सेवा पुरविते. ज्याठिकाणी प्रवाशांची संख्या कमी आहे, एसटीला तोटा होतो, अशा ठिकाणीही एसटी बसेस तोट्याची चिंता न करता धावत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने नव्या विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात करू नये व या उपाययोजना करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संदीप शिंदे, बिराज साळुंखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)