शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अरे देवा! देशाला २०४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं; मंत्री सुरेश खाडे यांचं पहिलंच भाषण वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 12:04 IST

खाडे यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांचे देशाबाबतचे अज्ञान दाखवले

सांगली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव असताना त्याचा रौप्य महोत्सव म्हणून उल्लेख तसेच देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असताना २०४७ चा उल्लेख करून कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी स्वातंत्र्य दिनाचा एकप्रकारे अवमान केला आहे. त्यांनी याबाबत जनतेची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

होनमोरे म्हणाले, खाडे यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांचे देशाबाबतचे अज्ञान दाखवले. मंत्री असणाऱ्या व्यक्तीने भान ठेवून जबाबदारीने, अभ्यास करून बोलणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये सुरेश खाडे यांनी भाषण केले. यावेळी ते भान हरपल्यासारखे बोलले. त्यांच्या या वक्तव्यातून अज्ञानपणा दिसून आला.अमृत महोत्सवी वर्षाऐवजी रौप्य महोत्सवी वर्ष असा उल्लेख केला तसेच १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असताना २०४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या त्यांच्या चुकीच्या वक्तव्यातून जिल्ह्याची व तालुक्याची बदनामी झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात खाडे कोणत्या भ्रमात बोलत होते, ते त्यांनाच माहीत असेल. भविष्यात मंत्रिपदाच्या खुर्चीचे भान ठेवूनच त्यांनी वक्तव्ये करावीत.

तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व, पण विकासाकडे दुर्लक्षमिरज विधानसभा मतदारसंघाचे ते तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत, परंतु शहराच्या विकासाकडे त्यांचे लक्ष नाही. मिरज शहर पूर्वीप्रमाणेच बकाल राहिलेले आहे. खाडे यांनी प्रदीर्घ आमदारकी भोगूनही मतदारसंघ मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न तरी वंचित राहिला आहे. त्यांनी किमान मार्गी लावावेत. त्यांना रस्त्याच्या तसेच अन्य प्रश्नांबाबतही अजिबात गांभीर्य नाही. देशाच्या इतिहासाबाबत ज्यांना काही माहिती नाही, त्यांना अन्य गोष्टीचे भान कसे राहणार, असा सवालही होनमोरे यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन