शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या फडात नेत्यांच्या दंड, बैठका!

By admin | Updated: May 20, 2015 00:11 IST

आरोप-प्रत्यारोपाने प्रचारात रंगत : नदी प्रदूषणाच्या घटनेवरून राजकारण पेटले

अशोक पाटील - इस्लामपूर -यशवंतराव मोहिते सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येणाऱ्या महिन्याभरात सत्ताधारी अविनाश मोहितेंसह डॉ. इंद्रजित मोहिते आणि डॉ. सुरेश भोसले हे एकमेकांविरोधात उभे असून, ग्रामीण भागातील बैठका आरोप- प्रत्यारोप करून रंगवू लागले आहेत.कृष्णा नदीतील दूषित पाण्याचे राजकारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेटवण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. ‘कृष्णा’च्या सत्ताधाऱ्यांमुळेच कृष्णा नदीतील पाणी दूषित होऊन लाखो मासे मृत झाल्याचा आरोपही केला जात आहे. परंतु अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी या आरोपाचे खंडण करीत, आमच्या कारखान्याचा आणि दूषित पाण्याचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी, गेल्या महिन्याभरापासून कारखान्याच्या आजी-माजी अध्यक्षांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावे पिंजून काढली आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तर गेल्या वर्षभरापासून ‘कृष्णा’च्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. विधानसभा निवडणुकीपासून डॉ. सुरेश भोसले हे ‘कृष्णा’चा ताबा मिळवण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांची बांधणी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते हे, गेल्या पाच वर्षांत आम्ही काय केले, याचा पाढा सभासदांसमोर वाचत, पुन्हा एकदा मला संधी द्या, अशी विनंती करत आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम कसा यशस्वी केला, याचा जाहीरनामाच मांडण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.बोरगाव येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याची घटना घडल्याचे पडसाद ‘कृष्णा’च्या फडावर उमटू लागले आहेत. विरोधकांनी कृष्णा कारखान्याच्या रसायन व मळीमिश्रित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.परंतु अविनाश मोहिते यांनी हा आरोप खोडून काढत, या परिसरात असलेल्या इतर उद्योग, कारखान्यांमुळेही हा प्रकार घडू शकतो, यामध्ये आमच्या कारखान्याचा काहीही संबंध नाही, असा खुलासा केला आहे. एकंदरीत आता कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने वातावरण दिवसेंदिवस तापत जाणार आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. त्यातच सक्षम उमेदवार मिळवण्यासाठी तिन्ही पॅनेलप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.‘त्याच्या’शी कारखान्याचा संबंध नाहीबोरगाव (ता. वाळवा) येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. विरोधकांनी कृष्णा कारखान्याच्या रसायन व मळीमिश्रित पाण्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप केला. अध्यक्ष अविनाश भोसले यांनी मात्र, या घटनेशी आमच्या कारखान्याचा काहीही संंबंध नाही, या परिसरात अनेक उद्योग, कारखाने आहेत. त्यांच्याबद्दल न बोलता केवळ आमच्या कारखान्यावर दोषारोप करू नयेत, असे प्रत्युत्तर दिले आहे.