शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

‘कृष्णा’च्या फडात नेत्यांच्या दंड, बैठका!

By admin | Updated: May 20, 2015 00:11 IST

आरोप-प्रत्यारोपाने प्रचारात रंगत : नदी प्रदूषणाच्या घटनेवरून राजकारण पेटले

अशोक पाटील - इस्लामपूर -यशवंतराव मोहिते सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येणाऱ्या महिन्याभरात सत्ताधारी अविनाश मोहितेंसह डॉ. इंद्रजित मोहिते आणि डॉ. सुरेश भोसले हे एकमेकांविरोधात उभे असून, ग्रामीण भागातील बैठका आरोप- प्रत्यारोप करून रंगवू लागले आहेत.कृष्णा नदीतील दूषित पाण्याचे राजकारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेटवण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. ‘कृष्णा’च्या सत्ताधाऱ्यांमुळेच कृष्णा नदीतील पाणी दूषित होऊन लाखो मासे मृत झाल्याचा आरोपही केला जात आहे. परंतु अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी या आरोपाचे खंडण करीत, आमच्या कारखान्याचा आणि दूषित पाण्याचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी, गेल्या महिन्याभरापासून कारखान्याच्या आजी-माजी अध्यक्षांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावे पिंजून काढली आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तर गेल्या वर्षभरापासून ‘कृष्णा’च्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. विधानसभा निवडणुकीपासून डॉ. सुरेश भोसले हे ‘कृष्णा’चा ताबा मिळवण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांची बांधणी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते हे, गेल्या पाच वर्षांत आम्ही काय केले, याचा पाढा सभासदांसमोर वाचत, पुन्हा एकदा मला संधी द्या, अशी विनंती करत आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम कसा यशस्वी केला, याचा जाहीरनामाच मांडण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.बोरगाव येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याची घटना घडल्याचे पडसाद ‘कृष्णा’च्या फडावर उमटू लागले आहेत. विरोधकांनी कृष्णा कारखान्याच्या रसायन व मळीमिश्रित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.परंतु अविनाश मोहिते यांनी हा आरोप खोडून काढत, या परिसरात असलेल्या इतर उद्योग, कारखान्यांमुळेही हा प्रकार घडू शकतो, यामध्ये आमच्या कारखान्याचा काहीही संबंध नाही, असा खुलासा केला आहे. एकंदरीत आता कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने वातावरण दिवसेंदिवस तापत जाणार आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. त्यातच सक्षम उमेदवार मिळवण्यासाठी तिन्ही पॅनेलप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.‘त्याच्या’शी कारखान्याचा संबंध नाहीबोरगाव (ता. वाळवा) येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. विरोधकांनी कृष्णा कारखान्याच्या रसायन व मळीमिश्रित पाण्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप केला. अध्यक्ष अविनाश भोसले यांनी मात्र, या घटनेशी आमच्या कारखान्याचा काहीही संंबंध नाही, या परिसरात अनेक उद्योग, कारखाने आहेत. त्यांच्याबद्दल न बोलता केवळ आमच्या कारखान्यावर दोषारोप करू नयेत, असे प्रत्युत्तर दिले आहे.