शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:07 IST

कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव.

ठळक मुद्दे हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉलप्रशासनाच्या बोटी येण्यापूर्वीच साडेतीन हजार लोकांना काढले बाहेर

शरद जाधव भिलवडी : कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव.भुवनेश्वरवाडी (भिलवडी, ता. पलूस) हे त्याचे गाव. कृष्णा नदीच्या महापुरात या पठ्ठ्याने भिलवडी, धनगाव, भुवनेश्वरवाडी या गावातील साडेतीन हजार लोकांना प्रशासनाच्या बोटी येण्यापूर्वीच बाहेर काढले. तरुणांच्या मोबाईलवर, फेसबुकच्या पोस्टवर, स्टेटसवर त्याची छबी झळकू लागली. कृष्णा नदीपात्रात नाव चालविणारा हा नावाडी कृष्णाकाठचा आयडॉल बनला.काडीकाडी गोळा करून उभारलेला स्वत:चा संसार, घर पाण्यात बुडाल्याची जखम बाजूला ठेवली. कुणाला फोन लावावा तर पाण्यात मोबाईल बुडाल्याने संपर्कच नाही. कोणी सांगायचे, हार्ट पेशंट आहे, बीपी, शुगर वाढली, पुराचं पाणी वाढलं, म्हातारी माणसं दम काढनाती... असे निरोप आले की नितीन सांगितलेल्या जागेवर हजर. माणसे सुरक्षित बाहेर पडली की, मिठ्ठी मारायची, हाता-पाया पडायच्या. आयाबाया ढसाढसा रडायच्या.सुटलो एकदाचे या संकटातून म्हणून त्यांनी कृष्णामाईला हात जोडले की, त्यांच्या डोळ्यातून आसवे गळायची.. आपण करत असलेल्या नावाड्याच्या सेवेचे सार्थक झाल्याचं समाधान लाभायचं.

आंबकरी दादा म्हणजे नीतीनचे चुलते बापू आप्पा गुरव यांनी ७० वर्षे भुवनेश्वरवाडी ते औदुंबर अशी काठीच्या नावेतून भाविकांना आल्याड-पल्याड करण्याची सेवा केली. त्यांच्या पश्चात नितीनने १९९१ मध्ये नावेचा सुकाणू हाती धरला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेऱ्या सुरू. २००८ पासून वल्हे गेले नी यांत्रिक बोटीचा हँडल हाती आला. २००५ च्या महापुरात वल्ह्याच्या नावाने दोन हजार माणसे बाहेर काढली.२००६ च्या महापुरात तर एनडीआरएफच्या बोटी नव्हत्याच. या एकट्याने चार हजार माणसे बाहेर काढलेली. २०१९ चा महापूर मोठ्या प्रवाहाचा. यंदा साडेतीन हजार माणसे एकट्याने बाहेर काढली. हे काम करताना कधी स्वत: एखादी सेल्फी किंवा फोटो काढला नाही.

पाण्याच्या प्रवाहाची दिशा, धार कशी पडते, भोवरा कुठे आहे, बोटीच्या पंख्यात पाला कुठे अडकेल, हे त्याला पक्के माहीत आहे. बोटीत प्रमाणापेक्षा जादा भरती केली की, धोका झालाच म्हणून समजा. नितीन नेहमी या गोष्टीची दक्षता घेतो. बोटीत माणसे किती भरली यापेक्षा ती सुरक्षित बाहेर कशी काढता येतील याला नावाड्याने महत्त्व द्यावे,असे तो म्हणतो.यंदा महापुरात प्रशासनाने चौथ्या दिवशी बोटीची सोय केली. प्रत्येक गावाला यांत्रिक बोटी द्याव्यात, तरुण पिढीला आपण बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासही पुढाकार घेणार असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या शौर्याची दखल घेत भिलवडी ग्रामपंचायत, सर्व संस्था, भिलवडी पोलिसांनी यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनी गावातील ध्वजारोहण करण्याचा सन्मान नितीन गुरवला दिला. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSangliसांगली