शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

‘कृष्णा’ गिळतेय जमिनी --: बोरगाव परिसरातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 22:16 IST

कृष्णाकाठावरील नागरिकांना ५ आॅगस्ट हा दिवस महाकाय प्रलय म्हणून उजाडला. याचदिवशी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केले. आभाळ फाटावे असा धो धो पाऊस बरसत होता.

ठळक मुद्देशेती पाण्याखाली गेली. त्याचे पंचनामे चालू झाले, पण ज्यांच्या जमिनीच आता अस्तित्वात राहिल्या नाहीत,

बोरगाव : महापुराने कृष्णा नदीकाठावरील शेकडो एकर जमीन खचून गेली आहे. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन बनण्याची भीती आहे. यात प्रामुख्याने बोरगाव, ताकारी, बहे, रेठरेहरणाक्ष, मसुचीवाडी, नवेखेड, जुनेखेड, फार्णेवाडी, साटपेवाडी, बनेवाडी, गौंडवाडी या गावांचा समावेश आहे.

कृष्णाकाठावरील नागरिकांना ५ आॅगस्ट हा दिवस महाकाय प्रलय म्हणून उजाडला. याचदिवशी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केले. आभाळ फाटावे असा धो धो पाऊस बरसत होता. बघता बघता कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडली. सलग तेरा दिवस पडणाºया पावसामुळे कृष्णामाईलाही आपले अक्राळविक्राळ रूप दाखवावे लागले. बघता बघता पुराचे रूपांतर महापुरात झाले. हिरवागार किनारा जलमय झाला. अनेक कुटुंबे विस्थापित झाली. घराबरोबर शेती तब्बल आठ दिवस पाण्याखाली गेली व होत्याचे नव्हते झाले.

आता पूर ओसरला, पण विदारक चित्र शेतकऱ्यांच्या नजरेत येऊ लागले. हिरवी पिके पिवळी पडल्याचे पाहून शेतकºयांच्या पायाखालची वाळूच सरकली. हाता-तोंडाला आलेली पिके कुजून चाललेली पाहून शेतकºयांच्या डोळ्यांतून अश्रूंचे बांध फुटले. बहे गावापासून जुनेखेडपर्यंतच्या ३० किलोमीटरचा कृष्णा नदीचा पट्टा खचून शेती ओसाड बनली. महापुराच्या पाण्याने पिकांबरोबर मातीही वाहून गेली. या पुराच्या पाण्याने फक्त मातीच नाही, तर दोन वर्षांचे अन्नधान्य वाहून शेतकºयांचे जीवनही वाहून नेले. अनेक शेतकरी तर या महापुराने भूमिहीन झाले.

शेती पाण्याखाली गेली. त्याचे पंचनामे चालू झाले, पण ज्यांच्या जमिनीच आता अस्तित्वात राहिल्या नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अनेक शेतकºयांची शेती बंजर व नापीक बनली आहे. शासन या शेतकºयांना मोबदला देणार का? खचलेल्या मातीचे, जमिनीचे, पिकांचे काय करणार? ज्यांची जमीन राहिली नाही, त्यांनी कोणाच्या व कोणत्या मदतीची वाट पाहायची? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ते कधी सुटणार व शासन कशी मदत करणार, याकडे नदीकाठावरील शेतक-यांच्या नजरा लागून आहेत.अंतरिम : निर्णय शासन घेईलनदीकाठावरील खचलेल्या शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत लवकरात लवकर करू, जे शेतकरी अल्पभूधारक व भूमिहीन झालेत त्यांचे सर्वेक्षण करून शासनाला कळवू, मात्र हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने यावर अंतरिम निर्णय शासन घेईल, असे मत वाळवा तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरriverनदी