शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘कृष्णा’ गिळतेय जमिनी --: बोरगाव परिसरातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 22:16 IST

कृष्णाकाठावरील नागरिकांना ५ आॅगस्ट हा दिवस महाकाय प्रलय म्हणून उजाडला. याचदिवशी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केले. आभाळ फाटावे असा धो धो पाऊस बरसत होता.

ठळक मुद्देशेती पाण्याखाली गेली. त्याचे पंचनामे चालू झाले, पण ज्यांच्या जमिनीच आता अस्तित्वात राहिल्या नाहीत,

बोरगाव : महापुराने कृष्णा नदीकाठावरील शेकडो एकर जमीन खचून गेली आहे. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन बनण्याची भीती आहे. यात प्रामुख्याने बोरगाव, ताकारी, बहे, रेठरेहरणाक्ष, मसुचीवाडी, नवेखेड, जुनेखेड, फार्णेवाडी, साटपेवाडी, बनेवाडी, गौंडवाडी या गावांचा समावेश आहे.

कृष्णाकाठावरील नागरिकांना ५ आॅगस्ट हा दिवस महाकाय प्रलय म्हणून उजाडला. याचदिवशी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केले. आभाळ फाटावे असा धो धो पाऊस बरसत होता. बघता बघता कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडली. सलग तेरा दिवस पडणाºया पावसामुळे कृष्णामाईलाही आपले अक्राळविक्राळ रूप दाखवावे लागले. बघता बघता पुराचे रूपांतर महापुरात झाले. हिरवागार किनारा जलमय झाला. अनेक कुटुंबे विस्थापित झाली. घराबरोबर शेती तब्बल आठ दिवस पाण्याखाली गेली व होत्याचे नव्हते झाले.

आता पूर ओसरला, पण विदारक चित्र शेतकऱ्यांच्या नजरेत येऊ लागले. हिरवी पिके पिवळी पडल्याचे पाहून शेतकºयांच्या पायाखालची वाळूच सरकली. हाता-तोंडाला आलेली पिके कुजून चाललेली पाहून शेतकºयांच्या डोळ्यांतून अश्रूंचे बांध फुटले. बहे गावापासून जुनेखेडपर्यंतच्या ३० किलोमीटरचा कृष्णा नदीचा पट्टा खचून शेती ओसाड बनली. महापुराच्या पाण्याने पिकांबरोबर मातीही वाहून गेली. या पुराच्या पाण्याने फक्त मातीच नाही, तर दोन वर्षांचे अन्नधान्य वाहून शेतकºयांचे जीवनही वाहून नेले. अनेक शेतकरी तर या महापुराने भूमिहीन झाले.

शेती पाण्याखाली गेली. त्याचे पंचनामे चालू झाले, पण ज्यांच्या जमिनीच आता अस्तित्वात राहिल्या नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अनेक शेतकºयांची शेती बंजर व नापीक बनली आहे. शासन या शेतकºयांना मोबदला देणार का? खचलेल्या मातीचे, जमिनीचे, पिकांचे काय करणार? ज्यांची जमीन राहिली नाही, त्यांनी कोणाच्या व कोणत्या मदतीची वाट पाहायची? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ते कधी सुटणार व शासन कशी मदत करणार, याकडे नदीकाठावरील शेतक-यांच्या नजरा लागून आहेत.अंतरिम : निर्णय शासन घेईलनदीकाठावरील खचलेल्या शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत लवकरात लवकर करू, जे शेतकरी अल्पभूधारक व भूमिहीन झालेत त्यांचे सर्वेक्षण करून शासनाला कळवू, मात्र हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने यावर अंतरिम निर्णय शासन घेईल, असे मत वाळवा तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरriverनदी