शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

क्रांतिसिंहांच्या पत्री सरकारची पुन्हा गरज

By admin | Updated: December 9, 2014 23:26 IST

प्रतिमा परदेशी : क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन

विटा : क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकारची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. त्यांनी केलेला संघर्ष हा केवळ गोऱ्या इंग्रजांच्या विरोधातच नव्हता, तर त्यांचा संघर्ष श्रमिक, शेतकरी, बहुजनांसाठी होता. त्यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या काळात महिला पूर्णत: निर्भय होत्या म्हणूनच महिला वर्गाने क्रांतिसिंहांच्या लढ्याला आश्रय दिला, असे प्रतिपादन विद्रोही साहित्य आणि संस्कृती चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंहांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कलमनुरी (ता. हिंगोली) येथील महिला शाहीर अनुसया शिंदे होत्या. यावेळी क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील, संपतराव जाधव, माधवराव मोहिते, उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस प्रा. परदेशी व शाहीर अनुसया शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी अनुसया शिंदे यांनी क्रांतिसिंहांनी मराठवाड्यातील निजामशाही नष्ट करण्यासाठी लढा दिला, मात्र शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या नेत्यांची काँग्रेसने उपेक्षा केल्याचे सांगितले. शाहीर शिंदे यांनी पोवाडा सादर केला, तर नाना पाटील यांच्या विचारांचे प्रचारक संपतराव जाधव यांचा गौरव करण्यात आला, तर एमएस्सीत विद्यापीठात प्रथम आलेल्या दिव्यांगना पाटील हिचा सत्कार करण्यात आला.अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. यवेळी कॉ. किरण माने, स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, शिवाजीराव पवार, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सु. धों. मोहिते, आनंदराव पाटील, धर्मेंद्र पवार, भाई संपतराव पवार, प्रा. लगारे, अ‍ॅड. नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)